विराटने दीड-दोन महिने क्रिकेट थांबवायला हवे

मुंबई (प्रतिनिधी) : लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध मंगळवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात बंगळूरु रॉयल चॅलेंजर्सचा माजी कर्णधार विराट कोहली पहिल्याच चेंडूवर खाते न खोलता बाद झाला. त्यानंतर भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी कोहलीला क्रिकेटमधून ब्रेक घेण्याचा सल्ला दिला आहे.


आयपीएलच्या यंदाच्या हंगामामध्ये कर्णधारपद सोडूनही विराट कोहलीची खराब कामगिरी अद्यापही सुरूच आहे. यंदाच्या हंगामात विराट कोहलीने फारशी चांगली केलेली नाही. टीम इंडियासाठी सुरू असलेला त्याचा खराब फॉर्म बंगळूरु रॉयल चॅलेंजर्ससाठी खेळतानाही सुरूच आहे. बायो बबल पहिल्यांदा सुरू झालं, तेव्हा मी प्रशिक्षक होतो. बायो बबलमध्ये कसं वातावरण असतं, ते मी पाहिलं आहे.


त्यामुळे मला स्पष्टपणे वाटतं की खेळाडूंबद्दल सहानुभूती दाखवावी लागेल. मी थेट मुख्य खेळाडूबद्दल बोलतो. विराट कोहली गेल्या दोन वर्षांत खूप काळ क्रिकेट खेळतोय. तो आता क्रिकेट खेळून खेळून अक्षरश: कंटाळला आहे. त्यामुळे जर कोणाला विश्रांतीची आवश्यकता असेल, तर तो म्हणजे विराट कोहली. त्याला दीड किंवा दोन महिन्यांच्या ब्रेकची गरज आहे. मग तो इंग्लंड दौऱ्यानंतर असेल किंवा इंग्लंड दौऱ्यापूर्वी असेल, असे शास्त्री म्हणाले.


विराट कोहली हा एक अतिशय प्रतिभावान क्रिकेटपटू आहे. त्याच्यात अजूनही किमान सहा ते सात वर्षांचे क्रिकेट शिल्लक आहे. त्यामुळे त्याला आताच इतक्या मोठ्या स्तरावर मानसिक थकवा योग्य नाही. अशाने त्याच्यातील क्रिकेटवर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे, असे शास्त्रींनी पुढे म्हटले.

Comments
Add Comment

Pakistan Player : खेळाडू की हैवान; पाकिस्तानी खेळाडूंकडून मैदानाबाहेर महिलांचा विनयभंग

आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषकातून पाकिस्तानचा संघ बाहेर पडला असला, तरी आता एका नव्या वादामुळे पाकिस्तानी खेळाडू

T20 : दक्षिण आफ्रिका पुन्हा ठरली चोकर्स, फिन एलनचे वादळी शतक आणि न्यूझीलंडची दुसऱ्यांदा फायनलमध्ये धडक

कोलकाता  : न्यूझीलंडने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेला सहज पराभूत केले.

मार्को जेन्सनच्या खेळीमुळे दक्षिण आफ्रिका सुस्थितीत

कोलकाता : न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टी-२० उपांत्य फेरीतील महत्त्वाच्या

T20 World Cup 2026 : इंग्लंड विरुद्धच्या उपांत्य सामन्यापूर्वी खेळाडूंनी घेतला बाप्पाचा आशीर्वाद

मुंबई : टी२० विश्वचषक २०२६ च्या उपांत्य सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघातील काही क्रिकेपटूंनी मुंबईतील

T20 World Cup : खेळाडूवर दुःखाचा डोंगर; रिंकू नंतर आणखी एका खेळाडूच्या वडिलांचे निधन

मुंबई : वर्ल्ड कपचा अंतिम सामना जसजसा जवळ येऊ लागला आहे, तसतशी प्रेक्षकांमध्ये सामन्याबद्दलची उत्सुकता वाढली

Smriti Mandhana : कौतुकास्पद! स्मृती मानधना पुन्हा ठरली आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल

आयसीसी क्रमवारीमध्ये भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधना एकदिवसीय फलंदाजांमध्ये अव्वल स्थानावर