कुतुब मीनार जवळची २७ मंदिरे पाडून उभारली मशिद –के.के. मोहम्मद

नवी दिल्ली(हिं.स.) : दिल्लीतील कुतुब मीनारजवळील २७ मंदिरे पाडून कुव्वत-उल-इस्लाम मशीद बांधण्यात आली होती. कुतुब मीनारजवळ अनेक मंदिरांचे अवशेष सापडले आहेत. ज्यामध्ये जवळच गणेश मंदिर आहे. यावरून सिद्ध होते की, तेथे गणेश मंदिरे होती, असा दावा इतिहासकार आणि पुरातत्वशास्त्रज्ञ के. के. मोहम्मद यांनी केला आहे.


कुतुब मीनारजवळ भगवान गणेश यांच्या एक नाही तर अनेक मूर्ती आहेत. ही जागा पृथ्वीराज चौहान यांची राजधानी होती. कुव्वत-उल-इस्लाम मशीद बांधण्यासाठी तेथील सुमारे २७ मंदिरे पूर्णपणे नष्ट करण्यात आली. मंदिरे पाडल्यानंतर निघालेल्या दगडांपासून कुव्वत-उल-इस्लाम मशीद बनवण्यात आली होती. इतकेच नव्हे तर त्या ठिकाणी अरबी भाषेत लिहिलेल्या शिलालेखांमध्येही याचा उल्लेख आढळतो. यामध्ये २७ मंदिरे पाडून मशीद बांधल्याचे लिहिले आहे. हे ऐतिहासिक सत्य आहे. कुतुब मीनार केवळ भारतातच बांधला गेला नाही तर त्याआधी तो समरकंद आणि गुफारामध्येही बांधला गेला होता, असेही के. के. मोहम्मद यांनी सांगितले.


के. के. मोहम्मद हे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे माजी प्रादेशिक संचालक राहिले आहेत. बाबरी मशिदीच्या खाली मंदिराचे अवशेष असल्याचे त्यांनी प्रथम शोधून काढले होते. त्यांचे संशोधन १९९० मध्ये प्रथम प्रकाशित झाले. अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयात के. के. मोहम्मद यांच्या संशोधनाने महत्त्वाची भूमिका बजावली.

Comments
Add Comment

जैसलमेरमध्ये भीषण अपघात, बसला आग लागल्याने २० जणांचा मृत्यू

मुंबई : जैसलमेरहून जोधपूरकडे निघालेल्या एका खासगी बसला जैसलमेर-जोधपूर महामार्गावर थईयात

योगी सरकारची उत्तर प्रदेशातील १.८६ कोटी महिलांना 'ही' दिवाळी भेट!

लखनऊ: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील १.८६ कोटी माता-भगिनींना

गुगलची भारतात $१५ अब्ज गुंतवणूक; विशाखापट्टणममध्ये देशातील पहिले गिगावॅट-स्केल एआय हब उभारणार

नवी दिल्ली : भारताच्या डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा गाठत, गुगलने भारतात आपल्या

डॉक्टरांनी लाच घेऊन मुलांच्या जीवाशी खेळ केला, पोलिसांचा कोल्ड्रिफ प्रकरणात गंभीर आरोप

छिंदवाडा : खोकल्यावरचे औषध म्हणून कोल्ड्रिफ कफ सिरप प्यायलेल्या मध्य प्रदेशमधील अनेक लहान मुलांचा मृत्यू झाला.

IND vs WI : वेस्ट इंडिजचा सुपडा साफ! टीम इंडियाचा वेस्ट इंडिजवर ७ विकेट्सने दणदणीत विजय, सलग १०वी कसोटी मालिका खिशात!

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या (India vs West Indies) दुसऱ्या कसोटी सामन्यात शानदार विजय मिळवून

ला निनामुळे नोव्हेंबरपासून तीव्र थंडीचा अंदाज

राज्यातून मान्सून माघारी परतलाय, पण ऑक्टोबर हीटमुळे सध्या अंगातून घामाच्या धारा निघत आहे. पहाटे हवेत प्रचंड