कुतुब मीनार जवळची २७ मंदिरे पाडून उभारली मशिद –के.के. मोहम्मद

  79

नवी दिल्ली(हिं.स.) : दिल्लीतील कुतुब मीनारजवळील २७ मंदिरे पाडून कुव्वत-उल-इस्लाम मशीद बांधण्यात आली होती. कुतुब मीनारजवळ अनेक मंदिरांचे अवशेष सापडले आहेत. ज्यामध्ये जवळच गणेश मंदिर आहे. यावरून सिद्ध होते की, तेथे गणेश मंदिरे होती, असा दावा इतिहासकार आणि पुरातत्वशास्त्रज्ञ के. के. मोहम्मद यांनी केला आहे.


कुतुब मीनारजवळ भगवान गणेश यांच्या एक नाही तर अनेक मूर्ती आहेत. ही जागा पृथ्वीराज चौहान यांची राजधानी होती. कुव्वत-उल-इस्लाम मशीद बांधण्यासाठी तेथील सुमारे २७ मंदिरे पूर्णपणे नष्ट करण्यात आली. मंदिरे पाडल्यानंतर निघालेल्या दगडांपासून कुव्वत-उल-इस्लाम मशीद बनवण्यात आली होती. इतकेच नव्हे तर त्या ठिकाणी अरबी भाषेत लिहिलेल्या शिलालेखांमध्येही याचा उल्लेख आढळतो. यामध्ये २७ मंदिरे पाडून मशीद बांधल्याचे लिहिले आहे. हे ऐतिहासिक सत्य आहे. कुतुब मीनार केवळ भारतातच बांधला गेला नाही तर त्याआधी तो समरकंद आणि गुफारामध्येही बांधला गेला होता, असेही के. के. मोहम्मद यांनी सांगितले.


के. के. मोहम्मद हे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे माजी प्रादेशिक संचालक राहिले आहेत. बाबरी मशिदीच्या खाली मंदिराचे अवशेष असल्याचे त्यांनी प्रथम शोधून काढले होते. त्यांचे संशोधन १९९० मध्ये प्रथम प्रकाशित झाले. अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयात के. के. मोहम्मद यांच्या संशोधनाने महत्त्वाची भूमिका बजावली.

Comments
Add Comment

२५ जुलैपासून रेल्वेची रामायण यात्रा पर्यटन ट्रेन सुरू

मुंबई: भगवान रामाशी संबंधित धार्मिक स्थळांना भेट देऊ इच्छिणाऱ्या यात्रेकरूंसाठी इंडियन रेल्वे केटरिंग अँड

अ‍ॅपलच्या योजनेला ब्रेक; ३०० चिनी अभियंते भारतातून माघारी

मुंबई : भारताची जागतिक उत्पादन केंद्र होण्याच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या अ‍ॅपलच्या 'आयफोन १७' प्रकल्पाला

भारतीय सैन्याला मिळणार १.०३ लाख कोटी रुपयांची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि वाहने

नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने १.०३ लाख कोटी रुपयांची शस्त्रे आणि लष्करी उपकरणे खरेदी

दलाई लामांचा उत्तराधिकारी ठरवण्याचा अधिकार केवळ तिबेटी परंपरेलाच: किरेन रिजिजू

तिबेटीयन धर्मगुरू दलाई लामा यांच्या उत्तराधिकारी निवडीबाबत चीनच्या हस्तक्षेपाच्या प्रयत्नांना भारताचे

ब्रिटिश रॉयल नेव्हीचे बंद पडलेले F35 B लढाऊ विमान, भारतातून तुकडे करुन परत पाठवणार

केरळमध्ये अडकलेल्या लढाऊ विमानाची अखेर दुरुस्ती झालीच नाही, शेवटी तुकड्यांमध्ये ब्रिटनला

बेदरकार गाडी चालवणाऱ्यांना विमा भरपाई नाही - सर्वोच्च न्यायालय

स्वतःच्या चुकीमुळे झालेल्या अपघातात मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना भरपाई मिळणार नाही नवी दिल्ली : भारताच्या