अपात्र घरकुलांचे पुन्हा सर्वेक्षण करा

विक्रमगड (वार्ताहर) : विक्रमगड तालुक्यामधील पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अपात्र घरकुल यांचे पुन्हा सर्वेक्षण करण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.


प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाचे उद्दिष्ट होते त्यापैकी ‘ड’ सर्वेक्षणामध्ये अनेक जाचक अटी व शर्ती आणि गरजू लोकांना डावळून सर्वेक्षण करण्यात आले व पात्र लाभार्थी निकषात बसत असूनही काहींची नावे सर्वेक्षणातून गायब झाली आहेत. तरी जी गरजू आणि पात्र तिच्या सर्व निकषांमध्ये बसतात, असे गरजू-गरीब पक्क्या घरापासून अपात्र ठरवून त्यांच्यावर अन्याय करण्याचे काम प्रशासनाने केले आहे.


धनदांडग्यांना या यादीत समाविष्ट करण्यात आल्याचे अनेक प्रकरणे बाहेर आली होती. या आणि अशा अनेक घरकुलांच्या प्रश्नांवर गरजूंना घरकुले मिळाली पाहिजे व अपात्र लोकांचे पुन्हा सर्वेक्षण झाले पाहिजे, यासाठी कॉ. किरण गहला यांनी मागणी केली आहे. अजूनही अनेक पंचायतीने आपल्या ‘ड’ याद्या सबमिट केलेल्या नाहीत. प्रत्येकाला घरकुल मिळाले पाहिजे, यासाठी शासनाने काही निकष लावून दिलेले आहेत; परंतु या निकषाप्रमाणे यांना घरकुल मिळत नसल्याचे दिसून येत आहे.


परिपत्रकाप्रमाणे बेघर, विधवा, अपंग यांना प्राधान्याने घरकुल मिळाले पाहिजे असतानाही अनेक लाभार्थी या घरकुलापासून वंचित आहेत. तरी या प्राधान्याने या व्यक्तींचा समाविष्ट करावा, अशी मागणी किरण गहला यांनी केली आहे.


तरी याबाबत प्रशासनाने व ग्रामपंचायतीने घरकुलांच्या संदर्भात योग्य पावले उचलावीत, अशी विनंती केली आहे. तसेच येणाऱ्या दिवसांत घरकुलांच्या संदर्भात योग्य ते सारे निकष लावूनच घरकुले मंजूर करावीत, अशी मागणी केली आहे. जेणेकरून खरोखर गरजू या योजनेपासून वंचित राहणार नाहीत व त्यांना हक्काचे घर मिळेल.

Comments
Add Comment

नालासोपाऱ्यात ५० लाखांचा मेफेड्रोन जप्त

वसई : नालासोपाऱ्यामध्ये अमली पदार्थ तस्करीसाठी आलेल्या तीन जणांना गुन्हे प्रकटीकरण शाखा २ ने अटक केली आहे.

वसई स्काय वॉकचा काही भाग कोसळला

वसई : वसई - विरार महानगरपालिका हद्दीत सध्या धोकादायक बांधकामे,उद्यान, नाल्यावरील स्लॅब कोसळण्याचा घटना सतत घडत

पालघरच्या किनाऱ्यावर ३ संशयास्पद कंटेनर आढळले! सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा

पालघर: जिल्ह्यातील किनारपट्टी भागात तीन संशयास्पद कंटेनर वाहून आल्याची बातमी समोर येत आहे. महामंडळाचे अधिकारी

Ganeshotsav 2025 : घोणसईत गणपतीबरोबर देशभक्ती! 'ऑपरेशन सिंदूर' देखावा ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

गणेशोत्सवात देशभक्तीचा संगम – हर्षल पाटील यांचा देखावा ठरत आहे आकर्षणाचा केंद्रबिंदू पालघर : गणेशोत्सव २०२५

विरार इमारत दुर्घटनेत या १७ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये एक वर्षाच्या चिमुरडीचाही समावेश

विरार : विरार पूर्व येथील चामुंडानगरमधील रमाबाई अपार्टमेंट कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू

विरारमधील जुनी इमारत कोसळली, वाढदिवसाच्या कार्यक्रमावर काळजात धस्स करणारी घटना

विरार: गणेशोत्सवाचा आनंद सर्वत्र साजरा होत असताना, मुंबईजवळील विरारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. विरार