भाजप आमदार गणेश नाईकांवर लैंगिक शोषणाचे आरोप

मुंबई : ऐरोलीचे आमदार व नवी मुंबईचे भाजपा नेते गणेश नाईक यांच्यावर एका महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. याबाबत नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी तपास करून दोन दिवसात अहवाल द्यावा, असा आदेश राज्य महिला आयोगाने दिला आहे.


या महिलेने यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी आयोगाकडे तक्रार केली होती. तिने पोलिसांत तक्रार करूनही त्याची दखल न घेतल्याने या महिलेने आयोगाकडे तक्रार केली आहे. या संबंधातून आपल्याला पंधरा वर्षाचा मुलगाही असल्याचा दावा या महिलेने केला आहे.


१९९३ पासून नाईक आपले लैंगिक शोषण करत आहेत. त्यांनी लग्नाचे आमिष देऊन तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन आपले लैंगिक शोषण केले. नाईक यांच्या धमक्यांमुळे आपल्याला त्यांच्याबरोबर लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये रहावे लागत आहे. आपल्याला वैवाहिक अधिकार मिळावेत तसेच या मुलाकरता पितृत्वाचा अधिकार मिळावा यासाठी या महिलेने नाईक यांच्याकडे सतत तगादा लावला होता. मात्र त्यावर गणेश नाईक यांनी या महिलेला व मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. तर गणेश नाईक यांचा मुलगा संदीप हादेखील या महिलेला गणेश नाईक यांच्याशी असलेले संबंध सोडून इतरत्र निघून जावे यासाठी या महिलेला व तिच्या मुलाला जीवे मारण्याच्या धमक्या देत होता, असा या महिलेचा आरोप आहे.


या महिलेने पोलिसांना लेखी तक्रार देऊनही पोलिसांनी कारवाई केली नाही, तसेच या महिलेला व तिच्या मुलाला सुरक्षाही पुरवली नाही. त्यामुळे नाईक यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करावा व आपल्याला पोलिस संरक्षण द्यावे अशी तक्रार या महिलेने राज्य महिला आयोगाकडील अर्जात केली होती. भारतीय दंडसंहितेच्या कलम ३७६, ४२०, ५०४, व ५०६ नुसार गुन्हा नोंदवावा, अशी तिची मागणी आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी त्या तक्रारीची गंभीर दखल घेतली. अध्यक्षांच्या सूचनेनुसार नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी दोन दिवसात याप्रकरणी तपास करून त्याचा अहवाल राज्य महिला आयोगाला सादर करावा असे निर्देशही महिला आयोगाने दिले आहेत.

Comments
Add Comment

महाराष्ट्रासाठी पुढील २४ तास महत्त्वाचे! कुठे कोसळणार मुसळधार पाऊस, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरात पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. नोव्हेंबर उजाडला तरी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 'या' दिवशी लागणार आचारसंहिता, सूत्रांची माहिती

मुंबई: राज्यात सध्या सर्वांनाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यात

मुंबई महापालिकेचा मोठा उपक्रम, गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या कामाला सुरुवात

मुंबई: महापालिकेमार्फत राबविण्यात येणारा गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पांतर्गंत गोरेगावच्या दादासाहेब

खोदलेले चर बुजवण्यात कंत्राटदारांची हातचलाखी

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील अनेक रस्ते आणि पदपथाखालून विविध सेवा सुविधांचे जाळे जात असून यामध्ये तांत्रिक

वांद्रे पश्चिममधील एस. व्ही. रोडवरील त्या तुंबणाऱ्या पावसाच्या पाण्यापासून मिळणार मुक्ती

मुंबई (सचिन धानजी) : वांद्रे पश्चिम येथील एस व्ही रोड आणि के.सी मार्गावर पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या वारंवारच्या

ब्रिटिशकालीन १२ वर्षांच्या पुलाचा शेवट; रेल्वे ट्रॅकवरील काम जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई: मुंबईतील ११२ वर्षांचा जुना आणि महत्त्वाचा ब्रिटिशकालीन रस्ता पूल, एलफिन्स्टन पूल पाडण्याच्या कामाचा