Friday, May 9, 2025

अध्यात्म

रामनाम स्वामीनाम

गोपाळबुवा रामचंद्र केळकर हे त्यावेळची इंग्रजी तिसरी शिकलेले होते. ते सुरुवातीस नास्तिक होते; परंतु त्यांना आस्तिक बनविण्यासाठी श्री स्वामींना वरील लीला करावी लागली. ‘नरदेही नरसिंह। प्रकटला तरू पोटी। नास्तिकाच्या कश्यपूला। आस्तिकाची देण्या गती।।’ हाच तर श्री स्वामी समर्थांच्या अवतार कार्याचा गाभा आणि हेतू आहे.

गोपाळबुवांसारख्या सुशिक्षित नास्तिकाला गती देण्यासाठी आणि त्यांच्याकडून बखरीचे लिखाण करून घेण्यासाठीच श्री स्वामींना ही लीला करावी लागली. जीवघेण्या दुखण्याला कंटाळून बुवा निर्वाणीचे बोलले, “जो कोणी या जगताचा ईश्वर असेल त्याने आठ दिवसांत माझी पोटदुखीची व्याधी दूर केली, तर उरलेल्या माझ्या आयुष्यात त्या एका भगवंताशिवाय अन्य कुणाचीही मी चाकरी करणार नाही.’’ बुवांच्या या घोर प्रतिज्ञेने त्यांच्या जीवनाचा कायापालट झाला. श्री स्वामींनी बुवांची व्याधी दूर केली. आता प्रतिज्ञा पूर्ण करण्याची जबाबदारी गोपाळबुवा केळकरांची होती. ती त्यांनी श्री स्वामी समर्थांच्या प्रत्यक्ष पाहिलेल्या, अनुभवलेल्या, ऐकून खात्री करून घेतलेल्या लीलांची मोडी भाषेत बखर लिहून पार पाडली. तीच श्री स्वामी समर्थ बखर.

रामनवमीला स्वामी चरणी अर्पण
स्वामी म्हणे दिनरात म्हणा राम
मनात जनात कामात ठेवा राम ।। १।।
रक्ताच्या थेंबाथेंबात राहतो राम
तुमच्यासाठी राम जेव्हा म्हणेल राम ।। २।।
तुमची सारी कामे होतील तमाम
रामासारखे व्हा तुम्ही पितृभक्त ।। ३।।
रामासारखे व्हा तुम्ही मातृभक्त
रामासारखे व्हा तुम्ही गुरुभक्त ।। ४।।
रामासारखे व्हा तुम्ही स्वामीभक्त
रामश्याम दत्तभक्त मातृभक्त ।। ५।।
स्वामीभक्त रामाचे पाळा नियम
पाळा एक वचनी एक बाणी नियम ।।६।।
एक पत्नी, एक व्रती उत्तम नियम
बंधुप्रेम, देशप्रेम, प्राणी प्रेम नियम ।।७।।
निसर्गप्रेम नदिनाली प्रेम नियम
प्रेमवचन, पितृवचन सत्य नियम ।।८।।
साऱ्या जगात पाना पाण्यात राम
रानावनात फुलाफळात सुगंधी राम ।।९।।
चांगल्या कार्यात हसण्या-बोलण्यात राम
लंकादहनात रावणा मारणात राम ।।१०।।
लक्ष्मण भरत शत्रुघ्न सारे राम
सुग्रीव अंगद जांभुवत, हनुमान सारे राम ।।११।।
नर, वानर, जटायू, खार सारे राम
सुवर्ण हरिण, विभीषण एकक्षण राम ।।१२।।
तत्काळ पूर्ण करा चांगले काम
स्वच्छ ठेवा नदी-नाले देवधाम ।।१३।।
गंगा यमुना, जमुन, सीता, देवीधाम
भरपूर फुले फळे झाडे लावा काम ।।१४।।
सर्व पृथ्वीच जगवणे रामाचे काम
अणुयुद्ध टाळणे मानवजात वाचवणे काम ।।१५।।

विलास खानोलकर

[email protected]
Comments
Add Comment