घणसोलीतील मुख्य रस्त्याच्या काँक्रिटीकरणाची मागणी

  92

नवी मुंबई (वार्ताहर) : घणसोली विभाग कार्यालय परिसरातील घणसोली गावाच्या आजूबाजूला सिमेंट काँक्रिटीकरणाचे रस्ते तयार करण्यात आले आहेत; परंतु घणसोली गावातील मुख्य रस्त्याला फक्त दरवर्षी डांबराचा मुलामा दिला जात आहे. त्यामुळे वारंवार रस्त्याचे काम निघत आहे. यामुळे दरवर्षी लाखो रुपयांचा चुराडा होत आहे.


म्हणून सर्व प्रकारच्या सुविधायुक्त रस्त्याचे काम करावे, ही मागणी जोर धरत आहे. तर काहींनी ऑनलाइन पत्रव्यवहार करून सिमेंट काँक्रिटीकरणाची मागणी केली आहे. तसेच रस्ता वारंवार खराब होऊ नये यासाठी युटिलिटी डक्टची व्यवस्था प्राधान्याने करावी, अशी आग्रही मागणी संजय अंकल सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गणेश सकपाळ यांनी केली आहे.


घणसोली नाका ते हनुमान मंदिर हा मुख्य रस्ता सिमेंट काँक्रिटीकरणापासून आजही वंचित आहे. पावसाळा आला की पालिकेकडून या रस्त्याची डागडुजी केली जाते. पावसाळा आला की तीच कामे पुन्हा पुन्हा केली जात असल्याचे ऑनलाइन तक्रारीत म्हटले आहे.


घणसोली गावातील मुख्य रस्त्यावर काँक्रिटीकरण व्हावे म्हणून आयुक्तांना ऑनलाइन पत्रव्यवहार केला आहे. हा रस्ता बनविताना युटिलिटी डक्ट अनिवार्य करावे. कारण इतर रस्त्यांना युटिलिटी डक्ट न बसविल्याने रस्त्याच्या शेजारील भाग खोदल्याने रस्त्याची अवस्था चाळणी सारखी झाली आहे. यामुळे पुन्हा पुन्हा रस्ता बनविला जात आहे. यात कोट्यवधी रुपये वाया जात आहेत.- गणेश सकपाळ, अध्यक्ष, संजय अंकल सामाजिक संस्था


चालू अर्थसंकल्पात घणसोली गावातील मुख्य रस्त्याच्या काँक्रिटीकरणासंबंधी आर्थिक तरतूद केली आहे. त्यामुळे हे नागरी काम होईल. तसेच युटिलिटी डक्ट यंत्रणासुद्धा कार्यान्वित केली जाईल. -मदन वाघचौडे, कार्यकारी अभियंता, घणसोली

Comments
Add Comment

रवींद्र चव्हाण नवे भाजपा प्रदेशाध्यक्ष, बिनविरोध निवड

भाजपाची कोकणातील ताकद आणखी वाढणार मुंबई : भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी

RailOne ॲप लाँच, आता सर्व सुविधा एकाच जागी मिळणार, तिकीट बुकिंगपासून ते लाईव्ह ट्रेन ट्रॅकिंग

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी आता आनंदाची माहिती आहे. रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने एक नवीन

ज्या कंपन्यांमुळे पिण्याचे पाणी प्रदूषित होत असेल त्यांच्यावर कारवाई करू

मुंबई : कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमधून रसायन मिश्रीत पाणी नदीत सोडले जाते. यामुळे पिण्याचे पाणी

Devendra Fadanvis : "...नंतर गाशा गुंडाळून गायब होतात", CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन

'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही'- मुख्यमंत्री फडणवीस मुंबई : आज विधानसभेत टोरेस कंपनीच्या (Torres Company)

Maharashtra Monsoon Session 2025 : पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत मोठा गदारोळ, नाना पटोलेंचे दिवसभरासाठी निलंबन, राहुल नार्वेकर भडकले अन् थेट

मुंबई : राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळतंय.

मराठी भाषेबाबत तडजोड, गळचेपी सहन करणार नाही

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली शिवसेनेची भूमिका मुंबई : मराठी भाषेबाबत आपण कधीही तडजोड सहन करणार नाही,