नायगाव उड्डाणपूल पूर्ण होण्याच्या मार्गावर

पालघर (प्रतिनिधी) : नायगाव पूर्व व पश्चिम भागास जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामदेखील युद्धपातळीवर हातावेगळे करण्यात येत आहे. या उड्डाणपुलाचे काम विविध कारणांमुळे रखडले होते. ते लवकरात लवकर मार्गी लागावे, यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न करण्यात येत होते.


त्यास आता यश मिळाले असून हा पूल लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी रेल्वे व संबधित सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस मेहनत करत आहेत. या पुलाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून शिल्लक काम लवकर पूर्ण व्हावे, यासाठी सर्व विभाग प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे.


हा उड्डाणपूल पूर्ण झाल्यास नायगाव पूर्व व पश्चिम भागातील हजारो नागरिकांना दिलासा मिळणार आहे. गेली अनेक वर्षे या परिसरातील नागरिकांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत. त्यातून आता त्यांची सुटका होणार आहे. तसेच इंधन, वेळ व पैशांचीही बचत होणार आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्र सागरी मंडळाचे २६० कोटींचे सामंजस्य करार

हरित बंदर विकास विषयी डेन्मार्कच्या कंपनीसोबत मंत्री नितेश राणे यांची सविस्तर चर्चा मुंबई : नेस्को गोरेगाव

बोगस आधार कार्ड प्रकरणी आ. रोहित पवारांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे बोगस आधार कार्ड तयार केल्याप्रकरणी राष्ट्रवादी

मोबाईल ग्राहकवाढीत जिओ आघाडीवर; एअरटेल दुसऱ्या क्रमांकावर

रायगड : महाराष्ट्रात मोबाईल ग्राहकांची संख्या सातत्याने वाढत असून, सप्टेंबर महिन्यात रिलायन्स जिओने सर्वाधिक

मुंबईतील खासगी कोचिंग क्लासना लावणार चाप! तपासणीसाठी समिती गठित

मुंबई : मुंबई शहरात सुरू असलेल्या खासगी कोचिंग क्लासची तपासणी करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने सर्व संबधित

शिल्पा शेट्टीच्या आईची तब्येत अचानक बिघडली, लीलावती रुग्णालयात दाखल...

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीची आई सुनंदा शेट्टी यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना मुंबईच्या लीलावती

मुंबईकरांचा प्रवास गारेगार , आजपासून २० वातानुकूलित बसमार्ग सुरू

मुंबई : मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार आणि प्रदूषणमुक्त करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व