नायगाव उड्डाणपूल पूर्ण होण्याच्या मार्गावर

पालघर (प्रतिनिधी) : नायगाव पूर्व व पश्चिम भागास जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामदेखील युद्धपातळीवर हातावेगळे करण्यात येत आहे. या उड्डाणपुलाचे काम विविध कारणांमुळे रखडले होते. ते लवकरात लवकर मार्गी लागावे, यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न करण्यात येत होते.


त्यास आता यश मिळाले असून हा पूल लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी रेल्वे व संबधित सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस मेहनत करत आहेत. या पुलाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून शिल्लक काम लवकर पूर्ण व्हावे, यासाठी सर्व विभाग प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे.


हा उड्डाणपूल पूर्ण झाल्यास नायगाव पूर्व व पश्चिम भागातील हजारो नागरिकांना दिलासा मिळणार आहे. गेली अनेक वर्षे या परिसरातील नागरिकांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत. त्यातून आता त्यांची सुटका होणार आहे. तसेच इंधन, वेळ व पैशांचीही बचत होणार आहे.

Comments
Add Comment

Bhandup Bus Accident : भांडुप बस दुर्घटना; बस अपघातातील मृतांची नावं समोर, अवघ्या २५ वर्षांच्या तरुणीसह चौघांचा करुण अंत!

मुंबई : भांडुप पश्चिमेला रेल्वे स्थानकाजवळ काल रात्री १० च्या सुमारास काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली.

Snehal Jadhav : मुंबईत 'मनसे'ला मोठा धक्का; स्नेहल जाधव आणि सुधीर जाधव यांचा शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश!

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, महाराष्ट्र नवनिर्माण

पश्चिम रेल्वेचे प्रवासी-केंद्रित विकासाचे ऐतिहासिक वर्ष

२०२५ मुंबई : २०२५ हे वर्ष पश्चिम रेल्वेसाठी एक ऐतिहासिक आणि परिवर्तनकारी वर्ष म्हणून उदयास आले. हे वर्ष

राष्ट्रपतींचा 'आयएनएस वाघशीर'मधून प्रवास

मुंबई : भारतीय सशस्त्र दलांच्या सर्वोच्च कमांडर आणि भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रविवारी अरबी

पश्चिम रेल्वेवर आजपासून विविध मार्गांवर रेल्वे ब्लॉक

मुंबई : पश्चिम रेल्वेने कांदिवली आणि बोरिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गाच्या बांधकामासाठी १८ जानेवारी २०२६

आरे ते कफ परेड मेट्रो रात्रभर धावणार

बुधवारी मेट्रोच्या विशेष फेऱ्यांचे नियोजन मुंबईकरांचा प्रवास होणार सुखकर मुंबई : नववर्षाच्या स्वागतासाठी