नायगाव उड्डाणपूल पूर्ण होण्याच्या मार्गावर

पालघर (प्रतिनिधी) : नायगाव पूर्व व पश्चिम भागास जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामदेखील युद्धपातळीवर हातावेगळे करण्यात येत आहे. या उड्डाणपुलाचे काम विविध कारणांमुळे रखडले होते. ते लवकरात लवकर मार्गी लागावे, यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न करण्यात येत होते.


त्यास आता यश मिळाले असून हा पूल लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी रेल्वे व संबधित सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस मेहनत करत आहेत. या पुलाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून शिल्लक काम लवकर पूर्ण व्हावे, यासाठी सर्व विभाग प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे.


हा उड्डाणपूल पूर्ण झाल्यास नायगाव पूर्व व पश्चिम भागातील हजारो नागरिकांना दिलासा मिळणार आहे. गेली अनेक वर्षे या परिसरातील नागरिकांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत. त्यातून आता त्यांची सुटका होणार आहे. तसेच इंधन, वेळ व पैशांचीही बचत होणार आहे.

Comments
Add Comment

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल गणेशोत्सव झाला कि वेध लागतात नवरात्रीचे.

दिवाळीनंतर तीन टप्प्यात होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ?

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोग

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र

मुंबई-कोकण ‘रो-रो’ फेरी सेवेला दसऱ्याचा मुहूर्त!

सागरी महामंडळाने कसली कंबर मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेली कोकणातील रो-रो सेवा सुरू होण्याचा

Rain Update: मुंबईसह राज्यात पावसाची शक्यता; मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह सरी

मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाची

राज्यातील डॉक्टर आज संपावर !

मुंबई (प्रतिनिधी) : आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या