नायगाव उड्डाणपूल पूर्ण होण्याच्या मार्गावर

  80

पालघर (प्रतिनिधी) : नायगाव पूर्व व पश्चिम भागास जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामदेखील युद्धपातळीवर हातावेगळे करण्यात येत आहे. या उड्डाणपुलाचे काम विविध कारणांमुळे रखडले होते. ते लवकरात लवकर मार्गी लागावे, यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न करण्यात येत होते.


त्यास आता यश मिळाले असून हा पूल लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी रेल्वे व संबधित सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस मेहनत करत आहेत. या पुलाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून शिल्लक काम लवकर पूर्ण व्हावे, यासाठी सर्व विभाग प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे.


हा उड्डाणपूल पूर्ण झाल्यास नायगाव पूर्व व पश्चिम भागातील हजारो नागरिकांना दिलासा मिळणार आहे. गेली अनेक वर्षे या परिसरातील नागरिकांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत. त्यातून आता त्यांची सुटका होणार आहे. तसेच इंधन, वेळ व पैशांचीही बचत होणार आहे.

Comments
Add Comment

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अध्यापन कारकीर्दही प्रेरणादायी – सरन्यायाधीश भूषण गवई

डॉ.आंबेडकर यांच्या अध्यापन कारकीर्दीस ९० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शासकीय विधि महाविद्यालय येथे स्मृतिपटलाचे

मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज सोमवारपासून थेट पाहता येणार!

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज सोमवारपासून थेट पाहता येणार आहे. कामकाजाचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह

मनसैनिकांनी कार्यालय फोडल्यानंतर व्यावसायिक सुशील केडियांनी मागितली माफी

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी प्रसिद्ध व्यावसायिक सुशील केडिया यांच्या

Eknath Shinde : "आजचा मेळावा म्हणजे द्वेष, जळजळ, मळमळ..."; उपमुख्यमंत्री शिंदेचा राज-उद्धव मेळाव्याला टोला

"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा" : उपमुख्यमंत्री शिंदे मुंबई : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे २०

मराठीप्रेम म्हणजे निवडणुका जवळ आल्या की राजकीय नौटंकी!

भाजपा नेत्यांनी उडवली ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची खिल्ली! मुंबई: गेल्या दोन महिन्यांपासून ठाकरे बंधूंच्या

संचमान्यतेमुळे राज्यातील ८८४ शाळा बंद पडण्याच्या मार्गावर

कोकणातील ९९ शाळांनाही बसणार फटका मुंबई : शिक्षण विभागाने संचमान्यतेचा निर्णय घेतल्यानंतर त्याचा फटका