आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यात रिफायनरीवरून भडकले 'बॅनर वॉर'

राजापूर, रत्नागिरी : कोकणात पुन्हा एकदा नाणार रिफायनरी प्रकल्पावरून राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेचे युवानेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे आज राजापूर दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वीच रिफायनरी प्रकल्पाविरोधात रत्नागिरीत बॅनर युद्ध भडकले आहे.


आदित्य ठाकरे राजापूरचा दौरा करणार असल्याने तालुक्यातील पश्चिम भागात रिफायनरी प्रकल्पावरून बॅनरबाजी दिसून येत आहे. रिफायनरीच्या बाजूने आणि रिफायनरीच्या विरोधात अशा दोन्ही बाजूने रस्त्यांवर बॅनर लावण्यात आले आहेत. राजापुरात प्रदूषणकारी रिफायनरी आणू नका, अशी विनंती आदित्य ठाकरे यांना बॅनरमधून नागरिकांनी केली आहे. दुसरीकडे खारेपाटणपासून राजापूरपर्यंत स्वागताचे बॅनर लावले आहेत. रस्त्यांवर अशा प्रकारे समर्थनाचे आणि विरोधाचे बॅनर लावलेले दिसत आहेत.


नाणारमधील रिफायनरी प्रकल्पाला विरोध झाल्याने तो कोकणात इतर ठिकाणी हलविण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे आज रत्नागिरी जिल्ह्यात दौऱ्यावर आले आहेत. नागरिकांमधून रिफायनरिला विरोध आणि समर्थन देखील दिसून येत आहे. यामुळे शिवसेनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.


राजापूरमध्ये आदित्य ठाकरे यांनी प्रकल्प समर्थकांशी संवाद साधला. आदित्य ठाकरे यांनी महिला समर्थकांशी संवाद साधत त्यांची मतं जाणून घेतली. महिलांच्या प्रश्नांना आदित्य ठाकरेंनी उत्तरही दिले. आदित्य ठाकरे यांनी रिफायनरी समर्थकांची भेट घेतली आणि त्यांचे निवेदन स्वीकारले आहे.

Comments
Add Comment

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

उद्यापर्यंत ब्लॉक रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून पुढील

‘वलसाड हापूस’ या नावाने स्वतंत्र मानांकनांसाठी गुजरात प्रयत्नशील

मुंबई : हापूस आंबा म्हटले की, कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा सर्वांच्या

Anganewadi Jatra 2026 : भराडी देवीचा 'कौल' मिळाला! लाखो भाविकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; आंगणेवाडी जत्रेची तारीख अखेर ठरली!

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण

Eknath Shinde : शिंदेंकडून निलेश राणेंचं तोंडभरून कौतुक! "इलाका किसी का भी हो, धमाका निलेश राणेच करणार"; मालवण हा सेनेचाच बालेकिल्ला

मालवणमध्ये झालेल्या एका जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदार निलेश राणे यांचे

मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव येथे धुक्यामुळे भीषण अपघात

शिवशाही बस, ट्रकमध्ये धडक; १ ठार, ११ जखमी प्रमोद जाधव माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे.

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार; पहिल्या टप्प्यातील संकल्पचित्राचे सादरीकरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक