आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यात रिफायनरीवरून भडकले 'बॅनर वॉर'

  62

राजापूर, रत्नागिरी : कोकणात पुन्हा एकदा नाणार रिफायनरी प्रकल्पावरून राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेचे युवानेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे आज राजापूर दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वीच रिफायनरी प्रकल्पाविरोधात रत्नागिरीत बॅनर युद्ध भडकले आहे.


आदित्य ठाकरे राजापूरचा दौरा करणार असल्याने तालुक्यातील पश्चिम भागात रिफायनरी प्रकल्पावरून बॅनरबाजी दिसून येत आहे. रिफायनरीच्या बाजूने आणि रिफायनरीच्या विरोधात अशा दोन्ही बाजूने रस्त्यांवर बॅनर लावण्यात आले आहेत. राजापुरात प्रदूषणकारी रिफायनरी आणू नका, अशी विनंती आदित्य ठाकरे यांना बॅनरमधून नागरिकांनी केली आहे. दुसरीकडे खारेपाटणपासून राजापूरपर्यंत स्वागताचे बॅनर लावले आहेत. रस्त्यांवर अशा प्रकारे समर्थनाचे आणि विरोधाचे बॅनर लावलेले दिसत आहेत.


नाणारमधील रिफायनरी प्रकल्पाला विरोध झाल्याने तो कोकणात इतर ठिकाणी हलविण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे आज रत्नागिरी जिल्ह्यात दौऱ्यावर आले आहेत. नागरिकांमधून रिफायनरिला विरोध आणि समर्थन देखील दिसून येत आहे. यामुळे शिवसेनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.


राजापूरमध्ये आदित्य ठाकरे यांनी प्रकल्प समर्थकांशी संवाद साधला. आदित्य ठाकरे यांनी महिला समर्थकांशी संवाद साधत त्यांची मतं जाणून घेतली. महिलांच्या प्रश्नांना आदित्य ठाकरेंनी उत्तरही दिले. आदित्य ठाकरे यांनी रिफायनरी समर्थकांची भेट घेतली आणि त्यांचे निवेदन स्वीकारले आहे.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी

मुसळधार पावसामुळे दुचाकीस्वार गेला वाहून, एनडीआरएफकडून तरुणाचा शोध सुरु...

सावंतवाडी : सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साठल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा

Ganesh Festival 2025 : चला गणपतीक गावाक जाऊचा असा; नियमित गाड्यांचे आरक्षण सुरु होतला…

कोकण मार्गावरील नियमित गाड्यांच्या आरक्षणाचे वेळापत्रक जारी झाल्याने रेल्वेच्या नियमांप्रमाणे ६० दिवसांचे

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर, माणगाव बायपास रस्त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चार पर्यायी रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बायपास

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाण्याखालील संग्रहालयाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

सेवानिवृत्त युद्धनौकेचे नवे स्वरूप, सागरी संवर्धन व पर्यटनाला चालना  मुंबई: आयएनएस गुलदार या नौदलातून

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक १७ तासांनंतर सुरू

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa highway) निवळी घाटात सीएनजी टँकर आणि खासगी मिनी बस यांच्यात झालेल्या भीषण