नवी दिल्ली : आयसीसी महिला वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा पराभव करून दणदणीत विजय मिळवला. भारतीय महिला संघाने 155 धावांनी वेस्ट इंडिज महिला संघावर विजय मिळवला. या विजयामुळे भारत गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे.
हा सामना हॅमिल्टन सेडन पार्क येथे खेळण्यात आला. नाणेफेक जिंकत भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने 50 षटकात 8 विकेट्स गमावून वेस्ट इंडिजला 318 धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र, वेस्ट इंडिज महिला संघाला हे लक्ष्य पूर्ण करण्यात अपयश आले. वेस्ट इंडिजने 40.3 षटकांत 162 धावा केल्या.
हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना या सामन्याच्या शिल्पकार ठरल्या. हरमनप्रीतने 107 बॉल्समध्ये 109 धावा केल्या. तर, मंधानाने 119 बॉलमध्ये 123 धावा केल्या. यामध्ये 13 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे.
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…