मुंबई : पाच राज्यांच्या निवडणुका होत असताना उत्तर प्रदेश आणि गोवा या राज्यांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांनीही आपले नशीब आजमावले होते. परंतु दोन्ही ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांचे डिपॉजिट जप्त झाले आहे. यावर भाजप नेते नितेश राणे यांनी गोवा आणि उत्तर प्रदेशातील निकालांवरुन खोचक टोला लगावला आहे.
“गोवा आणि उत्तर प्रदेशात ‘म्याव-म्याव’चा आवाजच ऐकू आला नाही. खुपच वाईट, अत्यंत दु:ख झालं,” असं म्हणत नितेश राणेंनी खोचक टोला लगावला. त्यांनी यासंदर्भात एक ट्वीट केले आहे.
यापूर्वी नितेश राणे यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पाहून ‘म्याव-म्याव’ असा आवाज काढला होता. त्यांच्या या कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियातून समोर आला होता. तसंच आपण आदित्य ठाकरे यांना पाहूनच आपण म्याव, म्याव केलं. कारण आधी वाघाची डरकाळी देणाऱ्या शिवसेनेची अवस्थाच म्याव, म्याव सारखी झाली आहे, असे नितेश राणे यांनी सांगितले होते.
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…