शेखर भोसले
मुलुंड : कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने शासनाची अनलॉक प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे; परंतु कोरोनाबाबत नागरिकांची चिंता कमी होऊ लागल्याने लसीकरण करून घेण्याचे प्रमाण सध्या घसरताना दिसत आहे. परिणामी लसीकरण केंद्र रिकामी पडल्याचे आढळून येत आहेत. लसीकरणातील जनतेची उदासीनता बघता मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दुःख व्यक्त केले असून लसीकरणाचे प्रमाण वाढवण्यासाठी या लसीकरण केंद्राचे मोबाईल लसीकरण युनिट कॅम्पमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. तसेच जम्बो लसीकरण सेंटर्सबाबतही लवकरच निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
ज्या लसीकरण केंद्राचे शिबिरात रूपांतर होत आहे, त्यांचा उपयोग महाविद्यालये आणि गृहसंकुलांमध्ये करण्यात येणार आहे. लसीकरण केंद्राचे कर्मचारी तेथे जाऊन शिबिराचे आयोजन करून विद्यार्थ्यांचे लसीकरण करतील. हीच प्रक्रिया गृहसंकुलातही केली जाणार आहे. ज्या सोसायट्यांमध्ये किशोरवयीन व इतर नागरिक मोठ्या प्रमाणात लसीकरणाविना आहेत, तेथे लसीकरण शिबिरे आयोजित करण्यात येणार असल्याचे काकाणी यांनी सांगितले.
ज्या लसीकरण केंद्राचे मोबाइल लस युनिटमध्ये रूपांतर करण्यात आले आहे, ते युनिट दिवसभर परिसरात फिरून उर्वरित लोकांना लसीकरण करतील, असे काकाणी म्हणाले.
दिवसभरातील (Prahaar Bulletin) महत्वाच्या बातम्या… टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीत काही चाहते आजारी तर काही झाले…
राज्य मंत्रिमंडळाने घेतला मोठा निर्णय मुंबई : सरकारने माझी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर आता…
प्रश्नपत्रिका तयार करतानाच घेणार 'ही' खास काळजी मुंबई : NEET PG परीक्षा रद्द झाल्यानंतर जवळपास…
यांचा वारीतला सहभाग केवळ राजकीय फायद्यासाठी भाजपाच्या माजी खासदारांची विरोधकांवर बोचरी टीका सोलापूर : आषाढी…
आमदार नितेश राणे यांचा रोहित पवारांना अप्रत्यक्ष टोला कोणाची बुद्धी लहान याबाबत राहुल गांधी आणि…
भोलेबाबा करायचा दुधाची अंघोळ; खीर बनवून वाटला जायचा प्रसाद लखनऊ : काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या…