पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली अजिंक्य खेळणार रणजी करंडक

मुंबई (प्रतिनिधी) : भारताच्या सीनियर संघातील जागा पुन्हा एकदा मजबूत करण्याच्या निर्धाराने माजी कसोटी कर्णधार अजिंक्य रहाणे हा रणजी करंडक स्पर्धेत खेळणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) जाहीर केलेल्या मुंबई संघात अजिंक्यचा समावेश करण्यात आहे. पृथ्वी शॉ याच्या नेतृत्वाखालील संघात महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन याचाही समावेश आहे. १७ फेब्रुवारीपासून रणजी करंडक स्पर्धेला सुरुवात होणार आहे.


राष्ट्रीय संघातील दावेदारी पेश करण्यासाठी अजिंक्यला रणजी करंडक स्पर्धेत खेळावे लागणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात अजिंक्य रहाणेला ६ डावांत १३६ धावा करता आल्या आहेत. तीन सामन्यांच्या मालिकेत रहाणेनं ४८, २०, ०, ५८, ९ व १ अशा धावा केल्या होत्या. रहाणेनं २०२० मध्ये अखेरचं शतक झळकावलं होते. रहाणेनं २०२० व २०२१ मध्ये अनुक्रमे ३८.८५ व १९.५७च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. त्याने मागील १४ सामन्यांत २०.८४च्या सरासरीनं ५२१ धावा केल्या आहेत. त्यामुळे रहाणेसह चेतेश्वर पुजारा यांना रणजी करंडक स्पर्धेत खेळण्याचा सल्ला बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने दिला होता.


दोघे खूप चांगले खेळाडू आहेत. पुन्हा फॉर्म मिळवताना रणजी करंडक स्पर्धेत खेळून खोऱ्यानं धावा करतील, अशी मला खात्री आहे. इतकी वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळल्यानंतर पुन्हा स्थानिक स्पर्धेत खेळण्यात काहीच समस्या नाही. तशी मला तरी जाणवत नाही. रणजी करंडक स्पर्धा ही मोठीच स्पर्धा आहे आणि आम्ही सर्व या स्पर्धेत खेळलो आहोत. त्यामुळे या दोघांनीही जावं आणि दमदार कामगिरी करावी. त्यांनी आधीही रणजी करंडक स्पर्धा खेळली आहे, असे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी म्हटले आहे.


मुंबईचा रणजी संघ : पृथ्वी शॉ ( कर्णधार), अजिंक्य रहाणे, यशस्वी जैस्वाल, आकर्षित गोमेल, अरमान जाफर, सर्फराज खान, सचिन यादव, आदित्य तरे ( यष्टिरक्षक), हार्दिक तामोरे ( यष्टिरक्षक), शिवम दुबे, अमन खान, शाम्स मुलानी, तनुष कोटियान, प्रशांत सोलंकी, शशांक अत्तार्डे, धवल कुलकर्णी, मोहित अवस्थी, प्रिन्स बदियानी, सिद्धार्थ राऊत, रॉयस्टन डायस, अर्जुन तेंडुलकर.



रणजी स्पर्धेची रूपरेषा


१० फेब्रुवारीला रिपोर्टिंग
१० ते १४ फेब्रुवारी क्वारंटाईन
१५ व १६ फेब्रुवारी सराव
१७ ते २० फेब्रुवारी पहिल्या फेरीचे सामने
२४ ते २७ फेब्रुवारी दुसऱ्या फेरीचे सामने
३ ते ६ मार्च तिसऱ्या फेरीचे सामने
७ ते १० मार्च उपांत्यपूर्वपूर्व फेरीपूर्वी क्वारंटाईन
११ मार्च सराव
१२ ते १६ मार्च उप उपांत्यपूर्व फेरीचे सामने

Comments
Add Comment

युवराज सिंगनं काय केलं... ? ईडीनं विचारला जाब

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याला बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप 1xBet प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे.

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या

IND vs PAK: भारताने पाकड्यांना धुतले, ७ विकेट राखत मिळवला विजय

दुबई: आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने