देशात दिवसभरात २ लाख ८२ हजार नवे रुग्ण; ४४१ जणांचा मृत्यू

Share

नवी दिल्ली : भारतातील कोरोना संसर्गाचा वेग वाढत असून केंद्राने कोरोनाच्या चाचण्या वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. गेल्या आठवडाभरात कोरोना रुग्णांची संख्या दर दिवशी अडीच लाख आणि त्याहून जास्त आढळत आहे. गेल्या २४ तासात भारतात २ लाख ८२ हजार ९७० इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली. तर ४४१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

काल दिवसभरात १ लाख ८८ हजार १५७ जणांनी कोरोनावर मात केली. सध्या देशात १८ लाख ३१ हजार इतके सक्रीय रुग्ण आहेत. दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट हा १५.१३ टक्क्यांवर पोहोचला आहे. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी देशात तब्बल ४४ हजार ८८९ नवे रुग्ण आढळून आले.

देशात कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरिअंटच्या रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत चालली आहे. आतापर्यंत ८ हजार ९६१ जणांना ओमायक्रॉनची बाधा झाली आहे. मंगळवारी ०.७९ टक्के नवे रुग्ण आढळल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली.

Recent Posts

पुणे विमानतळावर १० रुपयांत चहा, २० रुपयांत कॉफी

पुणे : हवाई प्रवास करताना योग्य दरात आणि गुणवत्तापूर्ण अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने पुणे…

59 minutes ago

भारत खरेदी करणार २६ मरीन राफेल फायटर्स

फ्रांन्सशी झाला ६४ हजार कोटी रुपयांचा करार नवी दिल्ली: भारत सरकार नौदलासाठी 26 राफेल मरीन…

1 hour ago

Breaking News : पाकिस्तानी युट्यूब चॅनल बंदी नंतर सरकारचा ‘बीबीसीला’ इशारा

नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर भारत- पाकिस्तानात तणावपूर्ण वातावरण आहे. हे संबंध आणिखी ताणले जाऊ…

1 hour ago

Raigad: रायगड जिल्ह्यात वणव्यांमुळे तीन हजार हेक्टर वनक्षेत्राची हानी

मागील पाच वर्षांत लागले एक हजार वणवे; ९० टक्के मानवनिर्मित; वनसंपदेला वाढता धोका अलिबाग :…

2 hours ago

पहलगाम अतिरेकी हल्ल्याचे दोन धक्कादायक व्हिडीओ

पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २५ हिंदू पर्यटक आणि एक स्थानिक…

2 hours ago