नवी दिल्ली : भारतातील कोरोना संसर्गाचा वेग वाढत असून केंद्राने कोरोनाच्या चाचण्या वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. गेल्या आठवडाभरात कोरोना रुग्णांची संख्या दर दिवशी अडीच लाख आणि त्याहून जास्त आढळत आहे. गेल्या २४ तासात भारतात २ लाख ८२ हजार ९७० इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली. तर ४४१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
काल दिवसभरात १ लाख ८८ हजार १५७ जणांनी कोरोनावर मात केली. सध्या देशात १८ लाख ३१ हजार इतके सक्रीय रुग्ण आहेत. दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट हा १५.१३ टक्क्यांवर पोहोचला आहे. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी देशात तब्बल ४४ हजार ८८९ नवे रुग्ण आढळून आले.
देशात कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरिअंटच्या रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत चालली आहे. आतापर्यंत ८ हजार ९६१ जणांना ओमायक्रॉनची बाधा झाली आहे. मंगळवारी ०.७९ टक्के नवे रुग्ण आढळल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली.
पुणे : हवाई प्रवास करताना योग्य दरात आणि गुणवत्तापूर्ण अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने पुणे…
फ्रांन्सशी झाला ६४ हजार कोटी रुपयांचा करार नवी दिल्ली: भारत सरकार नौदलासाठी 26 राफेल मरीन…
नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर भारत- पाकिस्तानात तणावपूर्ण वातावरण आहे. हे संबंध आणिखी ताणले जाऊ…
मागील पाच वर्षांत लागले एक हजार वणवे; ९० टक्के मानवनिर्मित; वनसंपदेला वाढता धोका अलिबाग :…
पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २५ हिंदू पर्यटक आणि एक स्थानिक…
मुंबई : लखनऊ सुपर जायन्ट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात काल ( दि .२७) पार पडलेल्या…