चंदिगड : पंजाबमध्ये (Punjab) १४ फेब्रुवारीला होणारी निवडणूक पुढे ढकलण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे (Election Comission) धाव घेतली आहे. १४ फेब्रुवारीला होणारे मतदान पुढे ढकलण्याची मागणी भाजप (BJP), काँग्रेससह (Congress) अनेक पक्षांनी केली आहे. मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी, भाजप आणि बसपा यांनी निवडणूक आयोगाला या संदर्भात पत्र लिहिले आहे.
निवडणूक पुढे ढकलण्याबाबत लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, १६ फेब्रुवारीला संत रविदास जयंती आहे. पंजाबमध्ये लाखो भाविक त्यांची पूजा करण्यासाठी वाराणसीला जातील. अशा स्थितीत ते मतदान करू शकणार नाहीत. त्यामुळे निवडणुकीची तारीख बदलण्यात यावी.
राजकीय पक्षांनी केलेल्या विनंतीवर आज निवडणूक आयोग निर्णय घेण्याची शक्यता आहे. यावर निवडणूक आयोग सध्या चर्चा करत असून निवडणूक पुढे ढकलणार की आहे त्याच दिवशी होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
कामांसाठी नेमलेल्या कंपन्यांची होणार चौकशी मुंबई (प्रतिनिधी): मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामांमध्ये अनियमिता दिसून आल्याने…
मुंबई: मुले असो वा वयस्कर...प्रत्येकालाच आईस्क्रीम खायला आवडते. उन्हाळ्याच्या दिवसांत तर आईस्क्रीमचे सेवन सर्वाधिक केले…
मुंबई (खास प्रतिनिधी): भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालयात आता पेंग्विन…
मोखाडा : तालुक्यातील मातामृत्यू आणि बालमृत्यूच्या घटना थांबविण्यासाठी हवे तसे प्रयत्न होत नसल्याचे आता समोर…
मुंबई महापालिकेने बेस्टच्या भाडेवाढीला मंजुरी दिली असून यामुळे बेस्टला ५९० कोटी रुपयांचा वार्षिक महसूल प्राप्त…
अनिल आठल्ये, निवृत्त कर्नल, ज्येष्ठ अभ्यासक अमेरिकेच्या अध्यक्षांकडून नवनवीन धोरणांचा धडाका उडवला जात असताना जागतिक…