एसटीच्या ‘लेखा’ विभागाने निवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन गिळून टाकली

Share

मुंबई (प्रतिनिधी) : सेवानिवृत्त झालेल्या मुंबई विभागातील तसेच एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयातील कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना त्यांच्या हक्काची पेन्शन योजना मिळवून देण्यामध्ये एसटी प्रशासनाच्या ‘लेखा’ विभागाने दिरंगाई केल्यामुळे गेली तीन वर्षे निवृत्त झालेले हजारो एसटी कर्मचारी त्यांच्या हक्काच्या पेन्शन पासून वंचित आहेत. ही पेन्शन संबंधित लेखा विभागाने गिळंकृत केल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.

बरगे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना श्रम आणि रोजगार मंत्रालय, भारत सरकार यांची कर्मचारी पेन्शन योजना १५ नोव्हेंबर १९९५ पासून लागू करण्यात आली. त्यामुळे केंद्र सरकार निश्चित करेल ती रक्कम पेन्शन अंशदान म्हणून कर्मचाऱ्यांच्या पगारातून दर महा कपात करून ती कर्मचारी भविष्य निधी संघटनेकडे महामंडळ जमा करत असते. कर्मचाऱ्यांच्या अंशदानात रकमेत केंद्र सरकारने वेळोवेळी वाढ केलेली असून सध्या रुपये १,२५० एवढी रक्कम एसटी महामंडळातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पगारातून दर महा अंशदान स्वरूपात कपात करण्यात येत आहे. कर्मचारी सेवानिवृत्त होण्यापूर्वी पेन्शनचे दावे संबंधित प्रादेशिक कर्मचारी भविष्य निधि संगठन कार्यालयाकडे महामंडळाकडून पाठवले जातात व त्याची पडताळणी करुन संबंधित कार्यालय पेंशन पेमेंट ऑर्डर प्रसारित करत असते. महामंडळाच्या सर्वच विभागात किमान २ ते ३ महिन्यांच्या कालावधीत पेन्शन सुरू करण्यात आली आहे याला अपवाद, मुंबई विभाग आहे, असे बरगे म्हणाले.

आयुक्त, प्रादेशिक कर्मचारी भविष्य निधी संगठन, बांद्रा, मुंबई येथील डेक्स ७६ कडे मुंबई विभाग व मध्यवर्ती कार्यालय, मुंबई यांचे मिळून सन २०१७ पासून अद्यापपर्यंत सुमारे २,२५० कर्मचाऱ्यांचे पेन्शन दावे वेगवेगळ्या कारणांनी प्रलंबित आहेत अशी माहीती आहे. पैकी ४६५ कर्मचाऱ्यांचे पेन्शन लागू होण्यापूर्वी दुःखद निधन झाले आहे. निधन झालेल्या कर्मचाऱ्यांची पत्नी तसेच सेवानिवृत्त कर्मचारी प्रादेशिक कर्मचारी भविष्य निधी कार्यालय, बांद्रा कार्यालयात येराझार घालत आहेत. परंतू, कर्मचाऱ्यांना पेंशन पेमेंट ऑर्डर अद्यापही मिळालेले नाहीत, असे बरगे म्हणाले.

Recent Posts

ड्रग्ज डॉनच्या बापाची आत्महत्या! आत्महत्येच्या चिठ्ठीत धक्कादायक आरोप! नवी मुंबईत खळबळ

नवी मुंबई : भारतातील मोस्ट वॉन्टेड ड्रग्ज सिंडिकेटचा म्होरक्या नवीन चिचकरचे वडील आणि नामांकित बांधकाम…

37 minutes ago

‘उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करून ‘बेस्ट’ व्हावे’

मुंबई : मुंबईतील नागरिकांची जीवनवाहिनी म्हणून बेस्टची ओळख आहे. नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर, आरामदायी होण्यासाठी…

55 minutes ago

Kartik Aaryan Naagzilla Movie : फन फैलाने आ रहा हू… कार्तिक आर्यनचा नागराज अवतार!

'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला मुंबई : करण जोहरने (Karan Johar) नुकतेच त्याच्या नव्या चित्रपटाची…

1 hour ago

वक्फ कायद्यात बदल गरजेचाच; केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केले प्रतिज्ञापत्र

नवी दिल्ली : वक्फ (दुरुस्ती) कायदा २०२५ ला (Waqf Amendment Act 2025) आव्हान देणाऱ्या याचिकांवर…

1 hour ago

Sugercane Juice : उसाचा रस प्या अन् गारेगार राहा!

उन्हाळा सुरु झाला की अनेकांना उष्णतेचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो. शरीरात डिहायड्रेशन होण्याची भीती असते.…

2 hours ago

प्रत्येक पाकिस्तानी नागरिकावर १.४५ लाख रुपयांच्या कर्जाचे ओझे

इस्लामाबाद : पहलगाम येथे पर्यटकांवर पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी हल्ला केला. या घटनेनंतर भारत आणि पाकिस्तान…

2 hours ago