भारताकडून आचारसंहितेचे उल्लंघन नाही

  89

केपटाऊन (वृत्तसंस्था):भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या आणि अंतिम कसोटीतील डीआरएस वादासाठी भारतीय संघावर कोणताही आरोप किंवा दंड लावण्यात आलेला नाही. आयसीसीच्या अधिकाऱ्यांनी इशारा दिला असला तरी पाहुण्या क्रिकेटपटूंचे वर्तन आचारसंहितेचे उल्लंघन करणारे नाही, असे आयसीसीच्या सामनाधिकाऱ्यांना वाटते.

दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावाच्या २१व्या षटकात रवीचंद्रन अश्विनच्या चेंडूवर डीन एल्गरला मैदानी पंचांनी पायचीत घोषित केले. एल्गरने यावेळी डीआरएस घेतला. रिप्लेमध्ये असे दिसून आले की चेंडू स्टंपवरून जात होता आणि या कारणास्तव मैदानावरील अंपायरला त्यांचा निर्णय मागे घ्यावा लागला. कर्णधार विराट कोहली आणि भारतीय संघाच्या सर्व क्षेत्ररक्षकांचा या निर्णयावर विश्वास बसत नव्हता. मैदानावरील अंपायर मॅराईस इरॅस्मस यांनाही चेंडू इतका उसळी घेईल, यावर विश्वास बसत नव्हता.

यानंतर भारताच्या क्रिकेटपटूंनी नाराजी व्यक्त करत होस्ट ब्रॉडकास्टर सुपरस्पोर्टला काही गोष्टी सांगितल्या. विराटही संतापला. तो स्टम्प माइकच्या जवळ गेला आणि म्हणाला, तुमच्या संघावरही लक्ष केंद्रित करा, फक्त विरोधी संघावर लक्ष केंद्रित करू नका. सर्वच लोकांना पकडण्याचा प्रयत्न करा. संपूर्ण देश ११ लोकांच्या विरोधात खेळत आहे, असे लोकेश राहुल म्हणाला.
भारताला केपटाऊन कसोटीत सात विकेटनी पराभव स्वीकारावा लागला आणि त्यासोबतच पाहुण्यांनी मालिका १-२ अशी गमावली. परिणामी, दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकण्याचे भारताचे स्वप्न धुळीस मिळाले.
Comments
Add Comment

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार

इंग्लंडचा दुसऱ्या कसोटीसाठीचा संघ जाहीर, आर्चरचे पुनरागमन

Archer included in England squad for second Test लंडन : इंग्लंड आणि भारत यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला