भारताकडून आचारसंहितेचे उल्लंघन नाही

केपटाऊन (वृत्तसंस्था):भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या आणि अंतिम कसोटीतील डीआरएस वादासाठी भारतीय संघावर कोणताही आरोप किंवा दंड लावण्यात आलेला नाही. आयसीसीच्या अधिकाऱ्यांनी इशारा दिला असला तरी पाहुण्या क्रिकेटपटूंचे वर्तन आचारसंहितेचे उल्लंघन करणारे नाही, असे आयसीसीच्या सामनाधिकाऱ्यांना वाटते.

दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावाच्या २१व्या षटकात रवीचंद्रन अश्विनच्या चेंडूवर डीन एल्गरला मैदानी पंचांनी पायचीत घोषित केले. एल्गरने यावेळी डीआरएस घेतला. रिप्लेमध्ये असे दिसून आले की चेंडू स्टंपवरून जात होता आणि या कारणास्तव मैदानावरील अंपायरला त्यांचा निर्णय मागे घ्यावा लागला. कर्णधार विराट कोहली आणि भारतीय संघाच्या सर्व क्षेत्ररक्षकांचा या निर्णयावर विश्वास बसत नव्हता. मैदानावरील अंपायर मॅराईस इरॅस्मस यांनाही चेंडू इतका उसळी घेईल, यावर विश्वास बसत नव्हता.

यानंतर भारताच्या क्रिकेटपटूंनी नाराजी व्यक्त करत होस्ट ब्रॉडकास्टर सुपरस्पोर्टला काही गोष्टी सांगितल्या. विराटही संतापला. तो स्टम्प माइकच्या जवळ गेला आणि म्हणाला, तुमच्या संघावरही लक्ष केंद्रित करा, फक्त विरोधी संघावर लक्ष केंद्रित करू नका. सर्वच लोकांना पकडण्याचा प्रयत्न करा. संपूर्ण देश ११ लोकांच्या विरोधात खेळत आहे, असे लोकेश राहुल म्हणाला.
भारताला केपटाऊन कसोटीत सात विकेटनी पराभव स्वीकारावा लागला आणि त्यासोबतच पाहुण्यांनी मालिका १-२ अशी गमावली. परिणामी, दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकण्याचे भारताचे स्वप्न धुळीस मिळाले.
Comments
Add Comment

World Athletics Championships 2025 : नीरज चोप्रा अजिंक्यपद कायम राखण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार

टोकियो : भारताचा अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्रा आपले विजेतेपद कायम राखण्याच्या उद्देशानेच जागतिक अ‍ॅथलेटिक्स

अपोलो टायर्स टीम इंडियाचा नवीन स्पॉन्सर; प्रत्येक सामन्यासाठी बीसीसीआयला देणार ४.५ कोटी रुपये

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेट संघासाठी नवीन जर्सी स्पॉन्सर म्हणून अपोलो

युवराज सिंगनं काय केलं... ? ईडीनं विचारला जाब

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याला बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप 1xBet प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे.

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने