महिलांची पाण्यासाठी वणवण

  480

जव्हार ग्रामीण (वार्ताहर) :देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असला तरी जव्हारच्या ग्रामीण आदिवासी भागात पाणीपुरवठ्याच्या मुलभूत सुविधा अद्याप पोहचलेल्या नाहीत. जव्हार तालुक्याच्या पिंपळशेत खरोंडा ग्रामपंचायतीतील अतिदुर्गम भाग असलेल्या हुंबरण येथे याचे विदारक वास्तव पाहायला मिळते. हुंबरण गावातील आदिवासी महिलांना पाण्यासाठी दीड किलोमीटर पायपीट करून, डोंगर चढउतार करून पाणी आणावे लागत आहे.

पालघर जिल्ह्यातील आदिवासी भगिनींचा पाण्यासाठीची वणवण आजही सुरूच आहे. गावात पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी ग्रामस्थांनी अनेकदा प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. पण या अधिकाऱ्यांनी त्याची दखलच कधी घेतली नाही. यापार्श्वभूमीवर जव्हार बहुजन विकास आघाडीचे तालुका अध्यक्ष एकनाथ दरोडा यांनी हुंबरण गावाला भेट देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या. यावेळी बहुजन विकास आघाडीचे जव्हार तालुका अध्यक्ष एकनाथ दरोडा, उपाध्यक्ष अनंता धनगरे, मोहन हिरकुडा, युवा उपाध्यक्ष गणपत भेसकर, कासटवाडी गटाचे प्रमुख कार्यकर्ते निलेश घेगड, साकुर ग्रामपंचायत माजी सदस्य सुनील वळवी, हेमंत गिरांधले, मंदार खिरारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

 पाण्यासाठी वणवण- सरीता सीताराम रावते, हुंबरण


गावात पाणी नसल्याने या खड्यातून डोंगर चढून पाणी न्यावे लागते. आम्हाला आजही पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करत फिरावे लागत आहे.

७५ वर्षांपासून हीच परिस्थिती - गणपत भेसकर, ग्रामपंचायत माजी सदस्य, पिंपळशेत खरोंडा


गेल्या ७५ वर्षांपासून हीच परिस्थिती आम्ही भोगतो आहे. दीड किलोमीटर डोंगर चढून पाणी न्यावे लागते. प्राथमिक सोयीसुविधा नसल्याने गेल्या वर्षी एक महिला डिलिव्हरीसाठी नेताना दगावली होती.


 पाणीपुरवठा योजनेसाठी पाठपुरावा  -एकनाथ दरोडा, अध्यक्ष बहुजन विकास आघाडी, जव्हार तालुका


गावात पाण्याची आणि रस्त्याची दुरवस्था आहे. तरी जलजीवन मिशनअंतर्गत हुंबरण गावात पाणीपुरवठा योजना मिळावी यासाठी पाठपुरावा करणार आहे.
Comments
Add Comment

आशिष शर्मा यांच्याकडेच बेस्टची जबाबदारी

मुंबई : आर्थिक डबघाईस आलेल्या बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक पदाची जबाबदारी आपल्या मर्जीतील सनदी अधिकाऱ्यावर

उबाठाचे १० ते १५ माजी नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, महिन्याभरात होणार प्रवेश

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर उबाठा सेनेला आणखी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. येत्या

बेस्ट तोट्यात जाण्यास तत्कालीन सत्ताधारी उबाठा शिवसेनाच जबाबदार, काँग्रेसचा घरचा आहेर!

काँग्रेसचे माजी आमदार मधु चव्हाण यांचा आरोप भाडेतत्वावरील खासगी बसेस बंद करा मुंबई : बेस्ट उपक्रम आर्थिक संकटात

Dadar Kabutar Khana Controversy: कबुतर खानाच्या राड्यानंतर देवेंद्र फडणविसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले "लोकांचे आरोग्य..."

मुंबई: मुंबईतील दादरमधील कबुतरखाना बंद करण्यावरून जैन समाज आज आक्रमक झाल्याचे दिसून आले. मुंबई उच्च

हत्तीण आणि कबुतरखाना प्रकरणात मनसेचा यू टर्न

मुंबई : न्यायालयाच्या आदेशामुळे मुंबईतले कबुतरखाने बंद करण्याची कारवाई महापालिकेने सुरू केली आहे. तसेच

जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसमध्ये गोळीबार केल्याप्रकरणी पोलिसावर खटला

मुंबई : जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेस रेल्वेत गोळीबार आणि हत्या प्रकरणात बडतर्फ कॉन्स्टेबल चेतनसिंह चौधरी