महावितरणच्या वागळे इस्टेट उपविभागाने पकडली ३७ लाखांची वीजचोरी

मुंबई (प्रतिनिधी) : सध्या महावितरणच्या सर्व परिमंडलात वीज बिलाच्या थकबाकीची वसुली तसेच वीजचोरी विरुद्ध धडक मोहीम सुरु आहे. अशा एक तपासणीमध्ये महावितरणच्या भांडूप परिमंडलातील वागळे इस्टेट उपविभागाने नुकतीच ३७,२९,५०० रुपयांची वीजचोरी पकडली आहे. यापुढेही ही मोहीम अजून तीव्र होणार आहे असा इशारा भांडूप परिमंडलचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी दिला.



या वीजचोरीबाबत कंपनीचे मालक दिनेश कटीयाल यांच्याविरुद्ध कोपरी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. ०५ जानेवारी २०२२ रोजी वागळे इस्टेट उपविभागातील सहाय्यक अभियंता विजय पाटील आपल्या दोन सहकाऱ्यांसोबत नेहमीप्रमाणे वीज मीटरची तपासणीसाठी गेले होते. वागळे इस्टेट येथील मेसर्स श्रीराम इंडस्टरीस येथे गेले असता हा वीजग्राहक बेकायदेशीर वीज वापर करीत असल्याचा संशय सहाय्यक अभियंता पाटील यांना आला. त्यांच्या वीजमीटरची तपासणी केली असता वीजमीटरचे सील उघड्या अवस्थेत आढळून आले.


दि. ०६ जानेवरी रोजी या वीज मीटरचा घेण्यात आलेला एम.आर.आय. अहवाल व ग्राहक असलेल्याच्या रोहीत्रावरील दुसऱ्या ग्राहक याचा मागील सहा महिन्यांच्या अहवालाची तपासणी केली असता हा ग्राहक जामर वापरून वीज चोरी करीत असल्याचे स्पष्ट झाले. जामरच्या मदतीने वीज वापराची नोंद होत नाही अथवा कमी होते. या प्रकारे, दिनेश कटीयाल यांनी महावितरण कंपनीची मागील सहा महिन्यांत अंदाजे एकूण ३७,२९,५०० रुपयांची चोरी केल्याचे निष्पन्न झाले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

मुंबई मेट्रो-३ च्या वेळापत्रकात १५ सप्टेंबरपासून बदल

मुंबई : मुंबई मेट्रो-३ या शहरातील अॅक्वा लाईनने नुकतेच सुधारित सेवा वेळापत्रक जाहीर केले आहे. आज सोमवारपासून

दिवाळीनिमित्त जादा बसगाड्या सोडणार

मुंबई : दसरा दिवाळी सणानिमित्त प्रवाशांची गर्दी लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे राज्यभरात

'दशावतार' सिनेमा पाहिल्यावर काय म्हणाले राज ठाकरे? पाहा Video

मुंबई: सध्या महाराष्ट्राच्या सिनेमाघरांमध्ये दशावतार या सिनेमाची चर्चा सुरू आहे. दशावतार सिनेमा

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात