दिल्लीत बॉम्बस्फोटाचा होता कट

नवी दिल्ली: दिल्लीत पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण पसरले आहे. गाझीपूर फूल मार्केट येथे शुक्रवारी एका बॅगेत आयईडी बॉम्ब आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली. याप्रकरणी तपासाला वेग आला असून दिल्लीत बॉम्बस्फोट घडवण्याचा कट होता व रेकी करून हा बॉम्ब प्लांट करण्यात होता, अशी धक्कादायक माहिती प्राथमिक तपासातून पुढे येत आहे. दिल्लीतील गाझीपूर फूल मार्केटच्या गेट नंबर एकबाहेर एक बेवारस बॅग आढळून आली होती. बॅगमध्ये तीन किलो आरडीएक्स आणि अमोनियम नायट्रेट होते. त्यात टायमरही लावण्यात आला होता. हा स्फोट घडला असता तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असती. त्यामुळेच हा घातपाताचा कट असल्याची शक्यता लक्षात घेऊन त्यादिशेने तपास केला जात आहे. फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पोहचली होती. त्याशिवाय एनएसजीकडूनही याप्रकरणी तपास करण्यात येत आहे.याबाबत माहिती मिळताच पोलीस, बॉम्ब शोधक व नाशक पथक तसेच अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर एनएसजी टीमलाही पाचारण करण्यात आले. बॉम्ब स्क्वाडने तपासले असता बॅगमध्ये आयईडी बॉम्ब असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर बॅग निर्जनस्थळी नेऊन एका खड्ड्यामध्ये या आयईडीचा नियंत्रित स्फोट घडवून आणण्यात आला. वेळीच याबाबत पावले उचलली गेल्याने मोठा अनर्थ टळला. त्यानंतर आता हा बॉम्ब कुणी ठेवला होता, हा सर्वात कळीचा प्रश्न असून पोलीस आणि इतर यंत्रणा युद्धपातळीवर तपास करत आहेत.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात हा बॉम्बस्फोट घडवण्याचा कट होता, असे स्पष्टपणे दिसून येत आहे. संपूर्ण परिसराची रेकी करून, सर्व माहिती घेऊन त्यानंतर हा बॉम्ब प्लांट करण्यात आला, असेही उपलब्ध पुराव्यांवरून दिसत आहे. मार्केटच्या मुख्य प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही कॅमेरा आहे. त्यात कॅप्चर होणार नाही, याची दक्षता बॉम्ब प्लांट करणाऱ्या हल्लेखोराने घेतल्याचेही दिसत आहे. गेट नंबर एकजवळचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यातून महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment

फास्टॅग वार्षिक पास १ एप्रिलपासून महाग होणार

नवी दिल्ली : पुढील महिन्यापासून म्हणजेच १ एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना थोडा

युद्धामुळे महागणार विमान प्रवास?

नवी दिल्ली : मध्य पूर्वेतील तणावाचे चटके आता विमान प्रवासालाही बसणार आहेत. इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात

Dharmantar Bandi Kayda : सावधान! बळजबरीने किंवा आमिषाने धर्मांतर केल्यास...राज्य सरकारचा धर्मांतर बंदी कायद्याचा नवा प्रस्ताव सादर

मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्यातील सक्तीच्या आणि फसव्या धर्मांतरांना लगाम घालण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे.

भारताच्या जहाजांना धोका नाही

इराणकडून मैत्रीचा हात पुढे नवी दिल्ली : पश्चिम आशियात इराण-इस्रायल तणावामुळे जागतिक सागरी व्यापार धोक्यात आला

इराण युद्धामुळे भरपूर नफा ?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा नवी दिल्ली  : ज्या देशांमध्ये युद्ध होते, त्यांचे अतोनात

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २२ वा हप्ता वितरित

मुंबई: सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देत असून किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांना आर्थिक