भारतासाठी मालिका विजय दूरच

  72

केपटाऊन (वृत्तसंस्था): दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचे भारताचे स्वप्न पुन्हा एकदा धुळीस मिळाले. तिसरी आणि अंतिम कसोटी चौथ्या दिवशी ७ विकेटनी जिंकताना यजमानांनी २-१ अशा फरकाने फ्रीडम ट्रॉफीवर नाव कोरले. दोन्ही डावांमध्ये अर्धशतके ठोकणारा तिसऱ्या क्रमांकावरील कीगॅन पीटरसन (७१ आणि ८२ धावा) यजमानांच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

२१२ धावांचे विजयी लक्ष्य गाठताना दक्षिण आफ्रिकेला उर्वरित दोन दिवसांत आणखी १११ धावांची आवश्यकता होती. त्याच ८ विकेट शिल्लक असल्याने यजमानांना विजयाची संधी होती. त्यांनी केवळ एक विकेट गमावताना लक्ष्य साध्य केले. आयडन मर्करमला (१६) लवकर माघारी पाठवून वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने चांगली सुरुवात करून दिली. मात्र, पीटरसनसह कर्णधार डीन एल्गर तसेच रॉसी वॅन डर ड्युसेनने भारताच्या स्वप्नांचा चुराडा केला.

पीटरसनने एल्गरसह दुसऱ्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी करताना यजमानांचा विजय अधिक सुकर केला. एल्गरने ९६ चेंडू खेळून ३० धावा काढताना पीटरसनला चांगली साथ दिली. त्यानंतर रॉसी वॅन डर ड्युसेनसह तिसऱ्या विकेटसाठी ५४ धावा जोडताना संघाला आणखी विजयासमीप आणले. चेतेश्वर पुजाराकडून जीवदान लाभलेल्या पीटरसनने ११३ चेंडूंत १० चौकारांसह ८२ धावा करताना विजयात मोलाचा वाटा उचलला. पॅव्हेलियनच्या दिशेने परतणाऱ्या पीटरसनचे सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात उभं राहुन कौतुक केले. शार्दूल ठाकूरने घेतलेल्या विकेटने भारताच्या चाहत्यांना थोडा आनंद झाला तरी ड्युसेनने (नाबाद ४१) आणि टेम्बा बवुमासह (नाबाद ३२) चौथ्या विकेटसाठी ५७ धावांची नाबाद भागीदारी करताना संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. दोन्ही डावांमध्ये हाफ सेंच्युरी मारणाऱ्या कीगॅन पीटरसनला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. मालिकावीराचा बहुमानही त्यानेच मिळवला.

पहिल्या डावात भारताने २२३ धावा केल्या. त्यानंतर दक्षिण अफ्रिकन संघाला २१० धावांमध्ये रोखून १३ धावांची नाममात्र आघाडी मिळवली. आघाडी फळी ढेपाळली तरी रिषभ पंतच्या नाबाद शतकाने भारताने यजमानांसमोर विजयासाठी २१२ धावांचे लक्ष्य निर्धारित केले. उपकर्णधार लोकेश राहुलसह मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे यांचे अपयश भारताच्या मालिका पराभवासाठी कारणीभूत ठरले.
Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार