भारतासाठी मालिका विजय दूरच

केपटाऊन (वृत्तसंस्था): दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचे भारताचे स्वप्न पुन्हा एकदा धुळीस मिळाले. तिसरी आणि अंतिम कसोटी चौथ्या दिवशी ७ विकेटनी जिंकताना यजमानांनी २-१ अशा फरकाने फ्रीडम ट्रॉफीवर नाव कोरले. दोन्ही डावांमध्ये अर्धशतके ठोकणारा तिसऱ्या क्रमांकावरील कीगॅन पीटरसन (७१ आणि ८२ धावा) यजमानांच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

२१२ धावांचे विजयी लक्ष्य गाठताना दक्षिण आफ्रिकेला उर्वरित दोन दिवसांत आणखी १११ धावांची आवश्यकता होती. त्याच ८ विकेट शिल्लक असल्याने यजमानांना विजयाची संधी होती. त्यांनी केवळ एक विकेट गमावताना लक्ष्य साध्य केले. आयडन मर्करमला (१६) लवकर माघारी पाठवून वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने चांगली सुरुवात करून दिली. मात्र, पीटरसनसह कर्णधार डीन एल्गर तसेच रॉसी वॅन डर ड्युसेनने भारताच्या स्वप्नांचा चुराडा केला.

पीटरसनने एल्गरसह दुसऱ्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी करताना यजमानांचा विजय अधिक सुकर केला. एल्गरने ९६ चेंडू खेळून ३० धावा काढताना पीटरसनला चांगली साथ दिली. त्यानंतर रॉसी वॅन डर ड्युसेनसह तिसऱ्या विकेटसाठी ५४ धावा जोडताना संघाला आणखी विजयासमीप आणले. चेतेश्वर पुजाराकडून जीवदान लाभलेल्या पीटरसनने ११३ चेंडूंत १० चौकारांसह ८२ धावा करताना विजयात मोलाचा वाटा उचलला. पॅव्हेलियनच्या दिशेने परतणाऱ्या पीटरसनचे सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात उभं राहुन कौतुक केले. शार्दूल ठाकूरने घेतलेल्या विकेटने भारताच्या चाहत्यांना थोडा आनंद झाला तरी ड्युसेनने (नाबाद ४१) आणि टेम्बा बवुमासह (नाबाद ३२) चौथ्या विकेटसाठी ५७ धावांची नाबाद भागीदारी करताना संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. दोन्ही डावांमध्ये हाफ सेंच्युरी मारणाऱ्या कीगॅन पीटरसनला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. मालिकावीराचा बहुमानही त्यानेच मिळवला.

पहिल्या डावात भारताने २२३ धावा केल्या. त्यानंतर दक्षिण अफ्रिकन संघाला २१० धावांमध्ये रोखून १३ धावांची नाममात्र आघाडी मिळवली. आघाडी फळी ढेपाळली तरी रिषभ पंतच्या नाबाद शतकाने भारताने यजमानांसमोर विजयासाठी २१२ धावांचे लक्ष्य निर्धारित केले. उपकर्णधार लोकेश राहुलसह मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे यांचे अपयश भारताच्या मालिका पराभवासाठी कारणीभूत ठरले.
Comments
Add Comment

ग्रँड स्लॅम ४०० व्या विजयाच्या उंबरठ्यावर नोव्हाक जोकोविच!

ऑस्ट्रेलियन ओपनच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश मेलबर्न : टेनिस जगतातील महान खेळाडूंपैकी एक असलेल्या नोव्हाक

भारताचे विजयी आघाडीकडे लक्ष्य

रायपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध आज दुसरी टी-२० लढत रायपूर : नागपूरमध्ये मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर, भारतीय

T20 World Cup मध्ये नव्या संघाची एन्ट्री होणार, बांगलादेशच्या बहिष्कारानंतर ICC लवकरच घोषणा करणार

ढाका : बांगलादेश क्रिकेट बोर्डाने भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या आगामी T20 वर्ल्ड कप २०२६ वर बहिष्कार घालत असल्याची

नागपुरात किवींचा धुव्वा उडवत भारताचा दमदार विजय

अभिषेक शर्मा, रिंकू सिंगच्या वादळी खेळीने मालिकेत १-० ने आघाडी नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही

ICC ODI Rankings: कोहलीचा अव्वल सिंहासनावरून पायउतार, डॅरिल मिशेल नंबर-वन

ICC ODI Rankings : आयसीसी वनडे क्रमवारीत मोठा आणि मनाला वेदना देणारा बदल पाहायला मिळाला असून भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी

ड्रीम-११ आणि माय-११ नंतर गुगलचा बीसीसीआयला आधार

मुंबई : बीसीसीआय पूर्वी ऑनलाइन गेमिंग कंपन्यांकडून भरपूर उत्पन्न मिळवत होते. मात्र आता अशावेळी बोर्ड हे नुकसान