सेनेला निवडणुकीत फटका बसणार

  30

पालघर (प्रतिनिधी) : वसई येथे एका हॉस्पिटलच्या ऑक्सिजन प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी आलेले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महाविकास आघाडी सरकारच्या मराठी पाट्या लावण्यावरून शिवसेनेला लक्ष्य केले. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा फटका बसेल, असे भाकीतही त्यांनी केले.

माध्यमाशी बोलताना सेनेने राज्यात व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानावर मराठी भाषेच्या पाट्या लावण्याच्या निर्णयावर जोरदार टीकास्त्र सोडले. मराठी पाट्यांसोबत हिंदी व इंग्लिश भाषांतील पाट्याही लागल्या पाहिजेत. शिवसेना जर केवळ मराठी पाटीचा आग्रह धरत असेल तर त्यांना येत्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हा मुद्दा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी उचलला होता, त्यावर शिवसेनेने कुरघोडी केली, असे तुम्हाला वाटते का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता आठवले यांनी हा मुद्दा राज ठाकरे यांचाच आहे, पण सेनेने तो आपल्या हाती घेतला आणि त्याबाबतचा आता त्यांनी कायदा केला. पण रिपाइंचा त्यास विरोध आहे. आगामी निवडणूक भाजप व आम्ही एकत्र लढवणार असून या निवडणुकीत सेनेचा पराभव अटळ आहे, असे त्यांनी सांगितले.
Comments
Add Comment

महा मुंबई मेट्रोचा ऐतिहासिक विक्रम; ३९ महिन्यांत ओलांडला २० कोटी प्रवाशांचा टप्पा!

मुंबई : मुंबईच्या मेट्रोने आज खराखुरा इतिहास रचला आहे. अवघ्या ३९ महिन्यांत तब्बल २० कोटी प्रवाशांचा टप्पा पार करत

Mumbai Building Collapse: मदनपुरात चार मजली इमारत कोसळली, परिसरात एकच खळबळ

मुंबई: मुंबईच्या गजबलेल्या परिसरात येत असलेली एक जुनी इमारत कोसळल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील मदनपुरा

कोल्हापूर सर्किट बेंचचे लोकार्पण होणार सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत

मुंबई  : कोल्हापूर सर्किट बेंचचा लोकार्पण सोहळा सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्ये आणि

मुंबईत सापडले ‘हे’ दुर्मीळ कासव

मुंबई : चेंबूर परिसरातील एका स्थानिक रहिवाशाला नुकतेच एक दुर्मीळ ल्युसिस्टिक कासव सापडले होते. संबंधित

आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत धावणार मेट्रो

मुंबई : मुंबईतील मुख्य पर्यटन आकर्षणांपैकी एक असलेल्या 'गेट वे ऑफ इंडिया'ला भुयारी मेट्रोतून जाता येणार आहे. गेट

आठवा वेतन आयोग लवकरच

केंद्र सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना मिळणार दिलासा मुंबई : देशभरातील सुमारे एक कोटींहून अधिक केंद्र सरकारी