गुरू हे परब्रह्म

Share

राजाधिराज श्री भालचंद्र महाराज की जय!

भालचंद्र महाराजांचा नामघोष काही केल्या बंद होईना. घरातील सर्व मंडळी नाना प्रयत्न करून दमली. असे काही दिवस गेल्यावर ते एके दिवशी गारगोटीला पसार झाले. तिथे संपूर्ण शहरभर वेड्यासारखे भटकू लागले. सुमारे सहा महिने ते गारगोटीला फिरत होते. त्यावेळी त्यांची अवस्था फार केविलवाणी झाली होती.

भालचंद्र गारगोटीस आहेत, असा घरातील मंडळींस ज्यावेळी पत्ता लागला, त्यावेळी त्यांना परत घरी आणण्याच्या इराद्याने गावातील बरीच माणसे, त्यांचे स्वत: चुलते वगैरे गेले होते; पण स्वारी नेमकीच कुठेतरी दडी मारून बसत असे. त्यावेळी गारगोटीला मुळे महाराज नावाचे साक्षात्कारी योगी पुरुष राहत असत. त्यांच्या तावडीत भालचंद्र एकदा सापडले. उत्तानपाद राजाचा मुलगा ध्रुव जसा परमेश्वरप्राप्तीसाठी वनात जाऊन बसला असता ब्रह्मर्षी नारदमुनींनी भेट देऊन सांगितले की, गुरुमंत्राशिवाय देव भेटत नाही. तसेच मुळे महाराजांच्या तावडीत भालचंद्र सापडले तेव्हा त्यांनी त्याला सांगितले की, तू येथे न थांबता, सरळ दाणोलीला जा व योगीराज साटम महाराजांची सेवा कर.
संत नामदेवाला गोरोबा काकांनी कच्चा ठरविल्याने भालचंद्रांना जणू आपला अपमान झाल्यासारखे वाटले, म्हणून त्यांनी अन्नपाण्याचा त्याग करून आपल्या आवडत्या दैवताची विठ्ठलाची जोरदार आराधना सुरू केली. त्यावेळी साक्षात पांडुरंगाने त्याला भेटून सांगितले की, तू विसोबा खेचराची सेवा कर, म्हणजे पूर्णत्व पावशील.

नामदेवांनी देवाची आज्ञा शिरसावंद्य मानून ते विसोबा खेचर ज्या गावी राहत असत त्या गावी शोध करीत गेले व त्यांची काही काळ सेवा केली व ते पूर्णत्व पावले. तद्वतच मुळे महाराजांनी भालचंद्राची केविलवाणी दशा पाहून दाणोलीला साटम महाराजांच्या सेवेला जा, असे सांगितले होते. ते त्यांचे वचन नामदेवाप्रमाणेच भालचंद्रानी पूज्य मानून सुख, दु:ख, भूक, तहान यांची तमा न बाळगता उभा कोल्हापूर जिल्हा पादाक्रांत करून गारगोटीहून ते अंबोली घाटाने दाणोलीला गेले. तिथे गेल्यावर साटम महाराजांची अवलिया अवस्था पाहून भालचंद्र नामदेवाप्रमाणे चकित झाले व त्यांच्या सेवेत रमले. सद्गुरूवाचून जगात कोणीच तरला नाही. संत शिरोमणी तुकोबांनी जाहीर सांगितले आहे की, ‘सद्गुरू वाचोनी सापडेना सोय’ सद्गुरू हे जीवननौकेचे जणू सुकाणू आहे! सार्थ गुरूचरित्रकार म्हणतात, ‘गुरू एवढा श्रेष्ठ आहे की ब्रह्मा तोच! विष्णूही तोच!! आणि महेशही तोच!!!

किंबहुना गुरू हे परब्रह्म आहेत!’ तरी अशा थोर परब्रह्मरूपी साटम महाराजांची काही काळ सेवा केल्यावर गुरूंच्या आज्ञेवरूनच पुन्हा सावंतवाडी, कुडाळ, कसालमार्गे मालवण येथे काही काळ राहून पुन्हा कसालातून कणकवलीकडे भालचंद्र महाराजांनी वाटचाल केली.
(क्रमश:)

Recent Posts

पोप फ्रान्सिस ८८ व्या वर्षी ख्रिस्तवासी

व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…

31 minutes ago

Beautiful Anklets : चांदीच्या अँकलेटचे सुंदर ८ डिझाईन्स पहा!

महिलांना त्यांच्या पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अँकलेट परिधान करायला फार आवडते. विवाहित महिलांसोबतच अविवाहित मुलींनाही अँकलेट…

45 minutes ago

Devmanus Film : ‘देवमाणूस’ चित्रपटातील ’सोबती’ गाणे प्रदर्शित

मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…

59 minutes ago

घरातच घडली धक्कादायक घटना, पत्नीने केली माजी पोलीस महासंचालकांची हत्या

बंगळुरू : कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक अर्थात माजी डीजीपी ओम प्रकाश यांची राहत्या घरातच हत्या…

59 minutes ago

Summer Tips : उन्हाळ्यात कशी घ्यावी डोळ्यांची काळजी, जाणून घ्या ‘या’ गोष्टी!

मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…

2 hours ago