नाशिक शहरातील ९३ टक्के रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे

नाशिक (प्रतिनिधी ):कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत शहरातील बाधितांचा आकडा वाढतच असून अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ४,०६४ पर्यंत पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे रुग्णालयात रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण अवघे सात टक्के असून, ९३ टक्के रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. सद्यस्थितीत २१५ रुग्ण महापालिका, तसेच खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असून, यातील ६७ रुग्णांना ऑक्सिजनची गरज लागत आहे. रुग्णालयात दाखल रुग्णांमध्ये कोमार्बिड रुग्णांसह लस न घेतलेल्या रुग्णांचा समावेश आहे.

गेल्या आठवड्यापासून शहरात कोरोनाने उसळी घेतली असून, दररोज बाधितांचा आकडा हा हजारापर्यंत पोहचला आहे. त्यामुळे नागरिक तसेच यंत्रणेत धडकी भरली असली तरी यातील बहुतांश बाधितांमध्ये करोनाची सौम्य लक्षणे असल्याचे समोर आले आहे. शहरातील करोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा हा पर्यंत ४,०६४ पर्यंत पोहचला आहे. परंतु, यातील ९३ टक्के रुग्ण हे अलगीकरणात असून, ते घरी राहूनच उपचार घेत आहेत. त्यांना करोनाची सौम्य लक्षणे असून, या रुग्णांच्या प्रकृतीवर महापालिका लक्ष ठेवून आहे, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली. विशेष म्हणजे शहरातील करोनातून बरे होण्याची टक्केवारी ही ९७ टक्यांपर्यंत आहे. करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत हेच प्रमाण हे सुरुवातीला ९० टक्क्यांपर्यंत होते. त्यामुळे शहरात सध्या तरी कोरोनाची तिसरी लाट ही सौम्य ठरल्याचे चित्र आहे.


लसवंतांना दिलासा


शहरातील अॅक्टिव्ह ४,०६४ रुग्णांपैकी २१५ रुग्ण हे महापालिका तसेच इतर रुग्णालयात दाखल आहेत. यातील २१ रुग्ण हे डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात, तर ६२ रुग्ण हे बिटको रुग्णालयात दाखल आहेत. त्यात ६७ रुग्ण ऑक्सिजनवर असून, १९ रुग्ण हे आयसीयूत अपचार घेत आहे. अकरा रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत. विशेष म्हणजे दाखल रुग्णांमधील रुग्ण हे लस न घेतलेले तसेच कोमार्बिड रुग्ण आहेत. त्यामुळे लसवंतांना कोरोनाचा धोका सध्या कमी असून, लस न घेतलेल्यांसाठी तिसरी लाट तापदायक ठरत असल्याचे चित्र आहे.
Comments
Add Comment

चक्क व्हॉट्सअ‍ॅप वरून बारावीचा पेपर मुलांपर्यंत पोहोचला? नागपुरातील धक्कादायक प्रकार समोर

मुंबई : राज्यात सध्या परीक्षेचे वारे वाहत आहेत, दहावी आणि बारावीची मुले आपल्या आयुष्यातील निर्णायक परीक्षा देत

भिगवण प्रकरणाला कलाटणी; मुलीने फिरवली बाजी निवडली पोलिसांची गाडी

पुणे : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका मधील भिगवण येते घडलेल्या अपहरण प्रकरणाचे दिवसेंदिवस नवीन पैलू उलघडत जात

कानिफनाथ यात्रेत वादाची ठिणगी; मुस्लिम व्यावसायिकांची दुकाने करणार बंद

अहिल्यानगर : राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि भटक्यांची पंढरी म्हणेजच श्री क्षेत्र मढीची कानिफनाथ

Beed: बीडमधील संतापजनक प्रकार; दहावीच्या विद्यार्थ्यांचा पेपर चक्क मंडपात

बीड: राज्यात इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेला आजपासून सुरू झाली आहे. याच दरम्यान बीड जिल्ह्यामध्ये शिक्षण

नरहरी झिरवाळ यांच्याकडून खासगी सचिवाची हकालपट्टी

मुंबई: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केलेल्या कारवाईनंतर अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी

...तर एसटी तिकीट दर भरावा लागेल; तिकीट सवलतींसाठी एसटीचे नवे नियम काय?, जाणून घ्या

पुणे: महाराष्ट्रातील एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची समोर येत आहे. एसटी प्रवासात विविध सवलत योजनांचा लाभ घेताना