साळवी स्टॉप परिसरात जागोजागी कचरा

  113

रत्नागिरी (वार्ताहर) : रत्नागिरी शहरामध्ये रस्त्याच्या किनारी प्लास्टिकचा कचरा जागोजागी पाहायला मिळतो. साळवी स्टॉप परिसरात तर जागोजागी प्लास्टिकचा कचरा पसरलेला दिसत आहे. त्यामुळे स्वच्छ रत्नागिरी सुंदर रत्नागिरी करण्याचे जनतेचे स्वप्न नगर परिषदेने धुळीला मिळवले आहे. प्लास्टिकचा कचरा नगर परिषद परिसरसह शहरातील विविध रस्त्यांच्या आजूबाजूला पडलेला दिसतो.

रत्नागिरी नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी प्लास्टिकबंदी असतानाही कोणतीच कारवाई केली जात नसल्याने प्लास्टिकचा कचरा गावभर पसरलेला दिसतो. तीच स्थिती रत्नागिरी शहराची झाली आहे. रत्नागिरी शहरातील नगर परिषदेने व मागील सत्ताधाऱ्यांनी मोठा गाजावाजा करून साळवी स्टॉप येथे घनकचरा प्रकल्प प्रोसेसिंग युनिट सुरू असल्याची बतावणी केली. मात्र प्रत्यक्षात या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला दिसून येतो. त्याची विल्हेवाट का लावली जात नाही. तेथे साचलेल्या कचऱ्यामुळे या परिसरातील इमारती आणि उंच वाढलेल्या झाडावर बगळेच बगळे पहायला मिळतात.  हे बगळे अनेकवेळा पाण्याच्या टाकीवर जाऊन बसतात तेथेच पिण्याच्या पाण्यात बगळ्यांची विष्ठा पडते आणि ती विष्ठा संपूर्ण शहरभर पिण्याच्या पाण्यातून पसरते की काय? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
Comments
Add Comment

वादग्रस्त विधाने करू नयेत, सर्वांनी समन्वयाने काम करावे - आमदार दीपक केसरकर

सिंधुदुर्ग - महायुतीची सध्याची राजकीय परिस्थिती चांगली असून, कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची वादग्रस्त

समृद्धीवर वेगमर्यादेचे उल्लंघन, आता असणार सीसीटीव्हीची नजर

अमरावती : नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गावर सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात, महिलेचा मृत्यू

सिंधुदुर्ग : मुंबई गोवा महामार्गावर कसाल येथील खालसा धाब्यासमोर एका मोपेडला ईर्टीका कारने जोरदार धडक

Sambhajinagar Illegal Construction: छत्रपती संभाजीनगरमध्ये अवैध बांधकामावर हातोडा; विरोध करणाऱ्यावर होणार कायदेशीर कारवाई

विरोध करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश  संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने दोन दिवसांच्या

OBC reservation : सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार!

२७ टक्के ओबीसी आरक्षणाला आव्हान देणारी याचिका फेटाळली नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात गेल्या अनेक

शिक्षकाने लॉजमध्ये जाऊन का केली आत्महत्या?

नांदेड : नांदेड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कंधार तालुक्यातील एका खासगी शिक्षण संस्थेत कार्यरत