साळवी स्टॉप परिसरात जागोजागी कचरा

  109

रत्नागिरी (वार्ताहर) : रत्नागिरी शहरामध्ये रस्त्याच्या किनारी प्लास्टिकचा कचरा जागोजागी पाहायला मिळतो. साळवी स्टॉप परिसरात तर जागोजागी प्लास्टिकचा कचरा पसरलेला दिसत आहे. त्यामुळे स्वच्छ रत्नागिरी सुंदर रत्नागिरी करण्याचे जनतेचे स्वप्न नगर परिषदेने धुळीला मिळवले आहे. प्लास्टिकचा कचरा नगर परिषद परिसरसह शहरातील विविध रस्त्यांच्या आजूबाजूला पडलेला दिसतो.

रत्नागिरी नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी प्लास्टिकबंदी असतानाही कोणतीच कारवाई केली जात नसल्याने प्लास्टिकचा कचरा गावभर पसरलेला दिसतो. तीच स्थिती रत्नागिरी शहराची झाली आहे. रत्नागिरी शहरातील नगर परिषदेने व मागील सत्ताधाऱ्यांनी मोठा गाजावाजा करून साळवी स्टॉप येथे घनकचरा प्रकल्प प्रोसेसिंग युनिट सुरू असल्याची बतावणी केली. मात्र प्रत्यक्षात या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला दिसून येतो. त्याची विल्हेवाट का लावली जात नाही. तेथे साचलेल्या कचऱ्यामुळे या परिसरातील इमारती आणि उंच वाढलेल्या झाडावर बगळेच बगळे पहायला मिळतात.  हे बगळे अनेकवेळा पाण्याच्या टाकीवर जाऊन बसतात तेथेच पिण्याच्या पाण्यात बगळ्यांची विष्ठा पडते आणि ती विष्ठा संपूर्ण शहरभर पिण्याच्या पाण्यातून पसरते की काय? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या