पाणी शुद्धतेची तपासणी आता महिलांकडून

  126

पालघर :जिल्ह्यातील प्रत्येक महसूल गावात शाश्वत शुध्द पाणी पुरवठ्यासाठी जल जीवन मिशन योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे पाणी शुद्धतेची तपासणी गावातील महिला स्वत: करणार आहेत. याबाबत प्रत्येक गावातील ५ महिला व जल सुरक्षक यांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे.

पालघर जिल्ह्यातील ८८६ महसूल गावात प्रत्येकी ५ महिलांच्या माध्यमातून जिल्ह्यातील ११,७२७ पाणी स्त्रोतांची तपासणी होणार आहे. जल जीवन मिशन योजने अंतर्गत प्रत्येक व्यक्तीला शुद्ध पाणी पुरवठा करण्याचे शासनाचे ध्येय आहे. शरीरात पाणी शुद्ध गेले तरच आरोग्य चांगले राहते. त्यातच जिल्ह्यात जल जीवन मिशनची कामे वेगात सुरू झाली आहेत. पालघर जिल्हा परिषदेच्या वतीने पाण्याची जैविक तपासणी करण्यासाठी एक किट खरेदी करण्यात आले आहे. यामध्ये २० मिली लहान काचेची बाटली आहे. या बाटलीमध्ये स्त्रोताचे पाणी भरून सामान्य तापमानात ४८ तास ठेवावी लागणार आहे. या बाटलीतील पाण्याचा रंग आहे. तसाच राहिला तर ते पिण्यास योग्य आहे. बाटलीतील पाण्याचा रंग काळा झाला तर पाणी पिण्यास अयोग्य आहे, हे स्पष्ट होणार आहे.

महिलांच्या माध्यमातून जिल्ह्यातील पाण्याच्या स्त्रोतांची तपासणी होणार आहे. तसेच तपासणी झाल्यानंतर त्याच्या अहवालाची नोंद केंद्रशासनाच्या संकेतस्थळावर ग्रामपंचायतीमधील डेटा इन्ट्री ऑपरेटर हे घेणार आहेत. पाण्याची तपासणी करता नमुना घेताना महिला प्रत्यक्ष पाण्याच्या स्त्रोताजवळ जाणार आहेत. त्यामुळे संबधित ठिकाणी अस्वच्छता आढळल्यास ग्रामपंचायतीला कळवून स्त्रोतांची स्वच्छताही करून घेणार, असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या जल जीवन मिशन विभागाकडून देण्यात आली.
Comments
Add Comment

उबाठाचे १० ते १५ माजी नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, महिन्याभरात होणार प्रवेश

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर उबाठा सेनेला आणखी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. येत्या

बेस्ट तोट्यात जाण्यास तत्कालीन सत्ताधारी उबाठा शिवसेनाच जबाबदार, काँग्रेसचा घरचा आहेर!

काँग्रेसचे माजी आमदार मधु चव्हाण यांचा आरोप भाडेतत्वावरील खासगी बसेस बंद करा मुंबई : बेस्ट उपक्रम आर्थिक संकटात

Dadar Kabutar Khana Controversy: कबुतर खानाच्या राड्यानंतर देवेंद्र फडणविसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले "लोकांचे आरोग्य..."

मुंबई: मुंबईतील दादरमधील कबुतरखाना बंद करण्यावरून जैन समाज आज आक्रमक झाल्याचे दिसून आले. मुंबई उच्च

हत्तीण आणि कबुतरखाना प्रकरणात मनसेचा यू टर्न

मुंबई : न्यायालयाच्या आदेशामुळे मुंबईतले कबुतरखाने बंद करण्याची कारवाई महापालिकेने सुरू केली आहे. तसेच

जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसमध्ये गोळीबार केल्याप्रकरणी पोलिसावर खटला

मुंबई : जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेस रेल्वेत गोळीबार आणि हत्या प्रकरणात बडतर्फ कॉन्स्टेबल चेतनसिंह चौधरी

Dadar Kabutar Khana : प्रार्थना संपली... आता प्रतिकार! कबुतरखान्यावर जैन समाज संतप्त, पोलिसांसोबत बाचाबाची

मुंबई : मुंबईतील कबूतरखाना परिसर पुन्हा एकदा तणावाच्या वातावरणात सापडला आहे. जैन समाजाने यापूर्वी जाहीर केलेले