पाणी शुद्धतेची तपासणी आता महिलांकडून

पालघर :जिल्ह्यातील प्रत्येक महसूल गावात शाश्वत शुध्द पाणी पुरवठ्यासाठी जल जीवन मिशन योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे पाणी शुद्धतेची तपासणी गावातील महिला स्वत: करणार आहेत. याबाबत प्रत्येक गावातील ५ महिला व जल सुरक्षक यांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे.

पालघर जिल्ह्यातील ८८६ महसूल गावात प्रत्येकी ५ महिलांच्या माध्यमातून जिल्ह्यातील ११,७२७ पाणी स्त्रोतांची तपासणी होणार आहे. जल जीवन मिशन योजने अंतर्गत प्रत्येक व्यक्तीला शुद्ध पाणी पुरवठा करण्याचे शासनाचे ध्येय आहे. शरीरात पाणी शुद्ध गेले तरच आरोग्य चांगले राहते. त्यातच जिल्ह्यात जल जीवन मिशनची कामे वेगात सुरू झाली आहेत. पालघर जिल्हा परिषदेच्या वतीने पाण्याची जैविक तपासणी करण्यासाठी एक किट खरेदी करण्यात आले आहे. यामध्ये २० मिली लहान काचेची बाटली आहे. या बाटलीमध्ये स्त्रोताचे पाणी भरून सामान्य तापमानात ४८ तास ठेवावी लागणार आहे. या बाटलीतील पाण्याचा रंग आहे. तसाच राहिला तर ते पिण्यास योग्य आहे. बाटलीतील पाण्याचा रंग काळा झाला तर पाणी पिण्यास अयोग्य आहे, हे स्पष्ट होणार आहे.

महिलांच्या माध्यमातून जिल्ह्यातील पाण्याच्या स्त्रोतांची तपासणी होणार आहे. तसेच तपासणी झाल्यानंतर त्याच्या अहवालाची नोंद केंद्रशासनाच्या संकेतस्थळावर ग्रामपंचायतीमधील डेटा इन्ट्री ऑपरेटर हे घेणार आहेत. पाण्याची तपासणी करता नमुना घेताना महिला प्रत्यक्ष पाण्याच्या स्त्रोताजवळ जाणार आहेत. त्यामुळे संबधित ठिकाणी अस्वच्छता आढळल्यास ग्रामपंचायतीला कळवून स्त्रोतांची स्वच्छताही करून घेणार, असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या जल जीवन मिशन विभागाकडून देण्यात आली.
Comments
Add Comment

डोंगरी, मांडवी,मोहम्मद अली रोड परिसरात महापालिकेच्या या अधिकाऱ्याची घुसून कारवाई... महापालिकेच्या नवख्या सहाय्यक आयुक्ताने मुंबईकरांची तोंडे केली गप .

मुंबई : मुंबई महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार मुंबईतील काही विभागांमध्ये महापालिकेच्या वतीने अनधिकृत

दोन प्रवाशांच्या भांडणात तरुणाने कायमचा गमावला डोळा; जाणून घ्या नेमकं प्रकरण

मुंबई : मुंबईची लोकल ही मुंबईची लाईफलाईन आहे. मुंबईची शान आहे, पण याच रेल्वेवर हल्ली प्रवाशांचा ताण वाढत चालला आहे.

Pariksha Pe Charcha 2026: 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात सांगलीच्या मातीचा, महाराष्ट्राच्या लेकराचा गौरव; मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी 'परीक्षा पे चर्चा' च्या निमित्ताने

हार्बर मार्गावरील वातानुकूलित लोकलमुळे वाहतूक विस्कळीत

मुंबई : हार्बर मार्गावर वातानुकूलित लोकल सेवा सुरू झाल्यानंतर, प्रवाशांना दररोज लोकलच्या विस्कळीत झालेल्या

महापौर, उपमहापौरपदासाठी काँग्रेसकडूनही उमेदवार देण्याच्या हालचाली सुरु

मुंबई : मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी येत्या ११ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार असून यासाठी शनिवारी ०७

Mumbai Railway: 'या' स्थानकांदरम्यान लोकल सेवा तीन महिने बंद राहणार; मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल होणार

मुंबई: मुंबईची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या लोकल संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मुंबई सेंट्रल ते बोरीवली