रत्नागिरी जिल्हा थंडीने कुडकुडला

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच भागात गोठवणारी थंडी पडल्याने ग्रामीण भागातील जनतेसह शहरी भागातही स्वेटरचा वापर वाढला आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे थंडीचा मोसम वाढला असल्याचे जाणकारांकडून बोलले जात आहे. मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोलीत तर पारा ९.७ अंशावर आला होता.

रत्नागिरी तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात पारा कमालीचा खाली आल्याने हुडहुडी भरणारी थंडी दिवसा जाणवत आहे. सूर्य डोक्यावर आला तरी थंडीचा कहर मात्र कमी होत नाही. त्याचा परिणाम सर्वांवरच होताना दिसून येत आहे. मात्र, पडलेल्या थंडीमुळे आंबा बागायतदारांसह काजू बागायतदारही खूश झाले आहेत. यावर्षी आंब्याचे चांगले पीक येईल, असा अंदाज आंबा शेतकऱ्यांकडून वर्तविला जात आहे. कडाक्याच्या थंडीमुळे आजारपणामध्ये वाढ होण्याची शक्यता विविध डॉक्टरांकडून वर्तविली जात आहे.
Comments
Add Comment

थेट शर्यतीत पळणाऱ्या बैलांवर भानामती! कोल्हापूरातील स्मशानात आढळून आला अंधश्रद्धेचा प्रकार

कोल्हापूर: अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार कोल्हापूरातून समोर आला आहे. कोल्हापूरातील हातकणंगले तालुक्यातील

घरगुती ग्राहकांसाठी प्रीपेड मीटर नाही : मुख्यमंत्री

नागपूर : राज्यात स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत घेण्यात आला आहे. मात्र, सामान्य

हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले, पुढील अधिवेशन २३ फेब्रुवारीला मुंबईत

नागपूर : नागपुरच्या गुलाबी थंडीत गेल्या एक आठवड्यापासून सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचे सूप अखेर वाजले. पुढील

मुंबईकरांना हक्काचं घर आणि विदर्भाला विकासाचं वैभव!

अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही "मुंबई फास्ट, महाराष्ट्र

मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे 'रेहमान डकैत' कोण..?

महानगरपालिका निवडणूक जिंकून महायुतीच ठरेल असली ' धुरंधर ' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उबाठावर घणाघाती

Winter Session : पाच वर्षे एकही योजना बंद करणार नाही!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; चंद्र-सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच राहणार मुंबई : “निवडणुका