रत्नागिरी जिल्हा थंडीने कुडकुडला

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच भागात गोठवणारी थंडी पडल्याने ग्रामीण भागातील जनतेसह शहरी भागातही स्वेटरचा वापर वाढला आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे थंडीचा मोसम वाढला असल्याचे जाणकारांकडून बोलले जात आहे. मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोलीत तर पारा ९.७ अंशावर आला होता.

रत्नागिरी तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात पारा कमालीचा खाली आल्याने हुडहुडी भरणारी थंडी दिवसा जाणवत आहे. सूर्य डोक्यावर आला तरी थंडीचा कहर मात्र कमी होत नाही. त्याचा परिणाम सर्वांवरच होताना दिसून येत आहे. मात्र, पडलेल्या थंडीमुळे आंबा बागायतदारांसह काजू बागायतदारही खूश झाले आहेत. यावर्षी आंब्याचे चांगले पीक येईल, असा अंदाज आंबा शेतकऱ्यांकडून वर्तविला जात आहे. कडाक्याच्या थंडीमुळे आजारपणामध्ये वाढ होण्याची शक्यता विविध डॉक्टरांकडून वर्तविली जात आहे.
Comments
Add Comment

राजमाता जिजाऊ बदनामी प्रकरणात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने २२ वर्षांनंतर मागितली माफी

पुणे : जेम्स लेनच्या 'शिवाजी-हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया' या पुस्तकावरून दोन दशकांपूर्वी

पुणे : कोथरुडमध्ये उबाठा उमेदवाराचा भाजपमध्ये प्रवेश

पुणे : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत कोथरुड विधानसभा मतदारसंघात उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे. प्रभाग

पुण्यात हायव्होल्टेज सामना; आंदेकर कुटुंबाकडे किती मालमत्ता? प्रतिज्ञापत्रातून खुलासा

आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर प्रभाग क्रमांक २३ मध्ये जोरदार सामना पहायला मिळणार

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर धावत्या खाजगी बसला भीषण आग

बुलढाणा : समृद्धी महामार्गावर भीषण अपघातांचे आणि आगीच्या घटनांचे सत्र थांबता थांबत नाहीये. आज पुन्हा एकदा

भटक्या कुत्र्यांचा हैदोस; पुण्यात पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यामुळे ४० जण जखमी

पुणे : पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशः हैदोस माजवत अनेक जणांना चावा घेतला आहे. या

उसतोड पूर्ण झाली आणि घरी परतताना रस्त्यातच परिवाराचा अपघात ; काळीज पिळवटणारी घटना

महाराष्ट्रात गेल्या काही महीन्यांपासून वाहनांच्या अपघातीच्या घटना होत असल्याच पहायला मिळत आहेत. तसंच एका