‘आदिवासी महिलांचे लसीकरणाचे काम कौतुकास्पद’

  62

नाशिक : कोरोना काळात नागरिकांचे जीवन सुसह्य करणाऱ्या अनेक योजना शासनामार्फत राबविण्यात आल्या आहेत. अशा योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहचवाव्यात. तसेच नाशिक जिल्हा परिषदेने आदिवासी भागात व महिलांच्या लसीकरणाबाबत करण्यात आलेले काम कौतुकास्पद असून त्याची राज्यस्तरावर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले आहे.

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नाशिक, धुळे, जळगांव, पुणे, पालघर व जालना या जिल्ह्यांनी कोरोना काळात केलेल्या विविध कामांचा दूरदृष्यप्रणालीद्वारे आढावा घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. कोविड सेंटर्समध्ये महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिने गृहविभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यांची सर्वच जिल्ह्यातील पोलिस विभागाने चांगल्या प्रकारे अंमलबजावणी केलेली आहे. तसेच कोविड काळात सर्व सामान्य नागरिकांनी मास्कचा नियमित वापर करून योग्य काळजी घेण्यासाठी करण्यात आलेली दंडात्मक कार्यवाही योग्यच आहे. त्याचप्रमाणे कोरोनामुळे घरातील कर्ता पुरुष गेल्याने विधवा झालेल्या महिलांना त्यांच्याशी संबंधित शासनाच्या विविध योजनांचा लाभ व्हावा व कायद्यांची माहिती देण्यासाठी तालुकास्तरावर ऑनलाईन पद्धतीने बैठकांचे नियोजन करण्यात यावे. महिलांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी महिला दक्षता समितीच्या नियमित बैठका घेण्यात याव्यात. तसेच या काळात ज्या मुलींचे अपहरण झाले आहे अथवा ज्या घरी परत आल्या आहेत अशा महिला व मुलींशी संवाद साधून त्यांचे समुपदेशन करण्यात यावे, अशा सूचनाही यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.

कोरोनाच्या काळात शासनाने केलेल्या कामांची माहिती देणारी ‘दोन वर्ष जनसेवेची’ ही पुस्तिका माहिती व जनसंपर्क विभागाच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेली आहे. ही पुस्तिका जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व अधिकारी यांना उपलब्ध करून देण्यात यावी, जेणे करून लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्यामार्फत शासनाने केलेल्या नागरिकांच्या हिताची कामे सर्वसामान्यांनापर्यंत पोहचून त्यांची माहिती नागरिकांना मिळेल. महसुल, पोलिस, कृषी, महिला व बाल विकास, कामगार अशा विविध विभागांनी कोरोना कालावधीत केलेल्या नाविन्यपूर्ण कामांचा डेटाबेस तयार करून त्याबाबत सविस्तर अहवाल येत्या पंधरा दिवसांत सादर करण्यात यावा. या सादरीकरणाच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या नाविन्यपूर्ण कल्पनांची अंमलबजावणी इतर जिल्ह्यांत राबविण्यास
Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती

Eknath Shinde : लाडक्या बहिणीला 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन'चा आधार! उपचारासाठी किडनीग्रस्त महिलेला एकनाथ शिंदेंनी केली मदत

जळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल मुक्ताईनगरला संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित