बैलगाडा शर्यतीत देवरुखच्या बने यांची गाडी प्रथम

वैभववाडी : बंड्या मांजरेकर मित्रमंडळ नाधवडे आयोजित पार पडलेल्या बैलगाडा शर्यतीत समीर बने, देवरुख ता. संगमेश्वर यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक द्वारकानाथ माने ता. लांजा यांनी पटकावला. तर तृतीय क्रमांक राजाराम चव्हाण ता. संगमेश्वर यांनी पटकावला. या स्पर्धेत रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्पर्धकांनी भाग घेतला होता.



बैलगाडा शर्यतीला परवानगी शासनाकडून मिळाल्यानंतर कोकणात पहिली स्पर्धा नाधवडे येथे पार पडली. स्पर्धा जाहीर होताच प्रशासन खडबडून जागे झाले होते. स्पर्धेच्या ठिकाणी सकाळपासून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, वैभववाडी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्यासह सहाय्यक पोलीस निरिक्षक, पोलीस उपनिरीक्षक व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेचे उद्घाटन तसेच बक्षीस वितरण अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या हस्ते पार पडले.



यावेळी वैभववाडी सभापती अक्षता डाफळे, देवगड सभापती रवी पाळेकर, कणकवली सभापती मनोज रावराणे, पोलीस निरीक्षक अतुल जाधव, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई, तुळशीदास रावराणे, कानडे, बाळा जठार, बाप्पी मांजरेकर, प्रकाश पारकर, सरपंच कुडतरकर, बंड्या मांजरेकर, सुधीर नकाशे व नाधवडेतील पदाधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

गोखले बिल्डर्सच्या कंपन्यांमधून बाहेर पडल्याची कागदपत्रे सार्वजनिकरित्या उपलब्ध आहेत, मुरलीधर मोहोळ यांचे स्पष्टीकरण

पुणे: पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीनीच्या व्यवहारावरून केंद्रीय राज्यमंत्री तथा भारतीय

अमरावतीत सलग २५ तासांत १५ हजार ७७३ डोसे !

विख्यात शेफ विष्णू मनोहर यांचा विक्रम अमरावती : विख्यात शेफ विष्णू मनोहर यांनी अमरावती शहरात सलग २५ तासांत एकूण

घोडबंदर रोडवर भीषण अपघात; एका महिलेचा जागीच मृत्यू, दुचाकीचालक गंभीर जखमी

ठाणे : घोडबंदर वाहिनीवरील विजय गार्डन स्काय वॉक ब्रिजखाली, रविवार रात्री

प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलमध्ये ५१ टक्के मतांचा संकल्प करा - बावनकुळे

नागपूर : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत प्रत्येक सर्कल मध्ये ५१ टक्के मते मिळतील असा संकल्प करा, असे आवाहन

मुंबईसह विविध ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश

ठाणे : मुंबईतील वाकोला प्रभाग क्रमांक ९१ चे उबाठा गटाचे माजी नगरसेवक सगुण नाईक त्यांची कन्या युवासेना कॉलेज कक्ष

पावणेचार वर्षात राज्यात ६७९ वाघ आणि बिबट्यांचा मृत्यू, अपघाताने २३ वाघांचा मृत्यू

चंद्रपूर : मागील पावणेचार वर्षात राज्यात ६७९ वाघ आणि बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. त्यात नैसर्गिक मृत्यू असले तरी,