बैलगाडा शर्यतीत देवरुखच्या बने यांची गाडी प्रथम

वैभववाडी : बंड्या मांजरेकर मित्रमंडळ नाधवडे आयोजित पार पडलेल्या बैलगाडा शर्यतीत समीर बने, देवरुख ता. संगमेश्वर यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक द्वारकानाथ माने ता. लांजा यांनी पटकावला. तर तृतीय क्रमांक राजाराम चव्हाण ता. संगमेश्वर यांनी पटकावला. या स्पर्धेत रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्पर्धकांनी भाग घेतला होता.



बैलगाडा शर्यतीला परवानगी शासनाकडून मिळाल्यानंतर कोकणात पहिली स्पर्धा नाधवडे येथे पार पडली. स्पर्धा जाहीर होताच प्रशासन खडबडून जागे झाले होते. स्पर्धेच्या ठिकाणी सकाळपासून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, वैभववाडी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्यासह सहाय्यक पोलीस निरिक्षक, पोलीस उपनिरीक्षक व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेचे उद्घाटन तसेच बक्षीस वितरण अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या हस्ते पार पडले.



यावेळी वैभववाडी सभापती अक्षता डाफळे, देवगड सभापती रवी पाळेकर, कणकवली सभापती मनोज रावराणे, पोलीस निरीक्षक अतुल जाधव, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई, तुळशीदास रावराणे, कानडे, बाळा जठार, बाप्पी मांजरेकर, प्रकाश पारकर, सरपंच कुडतरकर, बंड्या मांजरेकर, सुधीर नकाशे व नाधवडेतील पदाधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार