उस्मान ख्वाजाची दोन्ही डावांत शतके

सिडनी: ऑस्ट्रेलियाचा मधल्या फळीतील फलंदाज उस्मान ख्वाजाने अॅशेस मालिकेतील चौथ्या सामन्यांत दोन्ही डावांत शतके ठोकण्याची करामत साधली. अशी कामगिरी करणारा तो जगातील दहावा फलंदाज ठरला.
दुसऱ्या डावात ६९व्या षटकात डॅविड मॅलनच्या गोलंदाजीवर पहिल्या चेंडूवर दोन धावा घेत ख्वाजाने चौथ्या कसोटीतील सलग दुसऱ्या शतकाला गवसणी घातली. त्याने १३८ चेंडूंचा सामना करताना नाबाद १०१ धावा काढल्या. त्यात १० चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. ख्वाजा हा अॅशेस मालिकेत दुहेरी शतक झळकावणारा नववा बॅटर आहे. सिडनी मैदानात डग वॉल्टर्स आणि रिकी पाँटिंगनंतरचा तो तिसरा डबल सेंच्युरियन आहे.



अडीच वर्षांनंतर पुनरागमन केलेल्या ३५ वर्षीय डावखुऱ्या फलंदाजाने ४५वी कसोटी खेळताना सलग दोन शतकांची नोंद केली. पहिल्या डावात १३७ धावांची खेळी करताना ऑस्ट्रेलियाला चारशेपार नेण्यात मोलाची भूमिका बजावली. दुसऱ्या डावातही इंग्लंडच्या गोलंदाजांवर वर्चस्व राखताना केवळ वैयक्तिक खेळ उंचावला नाही तर सांघिक कामगिरी उंचावण्यात सिंहाचा वाटा उचलला. दुसऱ्या डावात कॅमेरून ग्रीनसह पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी करताना ऑस्ट्रेलियाला अडीचशेपार नेले. तसेच एकूण आघाडी चारशेच्या घरात नेली.
ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवशी चौथ्या सत्रात दुसरा डाव ६ बाद २६५ धावांवर घोषित करताना इंग्लंडसमोर ३८८ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले. सद्य:स्थितीत यजमानांचे पारडे जड असून चौथ्या आणि पाचव्या दिवसातील जवळपास १०० षटके खेळून काढण्यासह सलग चौथा पराभव टाळण्याचे आव्हान पाहुण्या इंग्लिश संघासमोर आहे.

Comments
Add Comment

Shashi Tharoor : 'आमच्यात सर्वकाही अलबेल',राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांना भेटल्यानंतर शशी थरूर यांचं विधान

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी आज, गुरुवारी (२९ जानेवारी) पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि विरोधी

Supreme Court On UGC: सर्वोच्च न्यायालयाकडून यूजीसीच्या नवीन नियमांना स्थगिती

सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्रीय विद्यापीठ आयोगाच्या  म्हणजेच यूजीसीच्या नवीन नियमांना स्थगिती देण्यात आली

भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नाबाबत 'महाराष्ट्र पॅटर्न'चे सर्वोच्च न्यायालयाने केले कौतुक

अन्य राज्यांच्या उपाययोजनांवर ओढले ताशेरे नवी दिल्ली :देशातील भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या आणि नागरिकांना

भारतीय उद्योगांसाठी युरोपीयन बाजारपेठ

९० टक्के वस्तूंवर शुल्क माफ करारामुळे दोन्ही देशांच्या आर्थिक संबंधांना बळ नवी दिल्ली : भारत आणि युरोपीयन

भारताला नुकसान पोहोचवणे, हाच पाकिस्तानचा अजेंडा

नवी दिल्ली : भारताने संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘पाकिस्तानने नेहमीच विनाकारण

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात

१ फेब्रुवारीला सादर होणार अर्थसंकल्प गुरुवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक सर्वेक्षण सादर