शनिवारी या विषयवार माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, "नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाची रेकी ही अतिशय गंभीर बाब आहे. याचा मला विश्वास आहे की, केंद्रीय यंत्रणा आणि महाराष्ट्र पोलिस याबाबत योग्य खबरदारी घेतील. मात्र यास अतिशय गांभीर्याने घेतले पाहिजे असे माझे मत आहे. "