प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल योजनांना चालना द्यावी

अहमदनगर- केंद्र सरकारच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत देशभर नागरिकांचे स्वतःच्या हक्काचे घराचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी विविध योजना केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून राबविली जात आहे.परंतु स्थानिक पातळीवर अहमदनगर महानगरपालिकेच्या मार्फत सुरू असलेल्या घरकुल योजनेच्या कामात विविध अडचणी निर्माण होत आहे.या अडचणी सोडविण्यासाठी १८ जानेवारी रोजी पदाधिकारी अधिकारी व ठेकेदारां ची संयुक्त बैठकीच्या योजना अहमदनगर महापालिकेत करण्यात आली असल्याची माहिती महापौर रोहिणी शेंडगे व उपमहापौर गणेश भोसले यांनी दिली.

शहरी गृहनिर्माण व व्यवहार मंत्रालय,मुंबई यांच्या आदेशान्वये आखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था,मुंबई यांच्या मार्फत प्रधानमंत्री आवास योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होणेकरीता सर्व नगरसेवकांसाठी ऑन लाईन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ४ घटक असुन यामध्ये प्रामुख्याने एएचपी,बीएलसी,आयएसएसआर,रमाई योजनेचे काम महानगरपालिकेमार्फत सुरु आहे.या योजना गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचविण्या साठी व त्यांना या योजनेची सविस्तर माहिती मिळावी याकरीता हे प्रशिक्षण आयोजित केले होते.या प्रशिक्षणात पंतप्रधान आवास योजने अंतर्गत होणारी कामे व त्याचा फायदा व मिळणारी सवलत याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली.पंत प्रधान आवास योजना सन २०१५ मध्ये सुरु झाली असुन अहमदनगर महानगरपालिकेमार्फत केडगांव व नालेगाव येथे योजना राबविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणामध्ये महापौर रोहिणी शेंडगे म्हणाल्या की,या पुर्वी महानगरपालिके मार्फत राबविण्यात आलेल्या घरकुल योजनेबाबत आलेल्या अनुभवातुन यापुढील योजना नागरिकांना सर्वसुविधा मिळतील अशा प्रकारे चांगल्या पध्दतीने राबवाव्यात.यावेळेस उपमहापौर गणेश भोसले म्हणाले की,घरकुल योजना प्रभावीपणे राबविण्याकरीता व या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याकरता १८ जानेवारी रोजी महानगरपालिकेचे पदाधिकारी,अधिकारी व संबंधित ठेकेदार यांच्या समवेत मिटिंगचे आयोजन करण्यात यावे.

Comments
Add Comment

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी डॉक्टर तरुणी आणि प्रशांत बनकरमध्ये काय घडलं ?

सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालय येथे कार्यरत डॉक्टर तरुणीने एका हॉटेलच्या रुममध्ये आत्महत्या केली. या प्रकरणात

Nanded Mumbai Flight : प्रतीक्षा संपली! नांदेड-मुंबई, गोवा विमानसेवेचा 'मुहूर्त' ठरला, मुंबई, गोव्याचा प्रवास तासाभरात; पहिलं उड्डाण कधी?

नांदेड : नांदेडमधील प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. बहुप्रतीक्षित नांदेड-मुंबई (Nanded-Mumbai) आणि नांदेड-गोवा

राज्यातील 'या' पाच समुद्रकिनाऱ्यांना मिळणार 'ब्लू फ्लॅग'? नामांकनासाठी किनाऱ्यांचे सुरक्षा ऑडीट होणार लवकरच पूर्ण

महाराष्ट्र: राज्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'ब्ल्यू फ्लॅग'साठी प्रायोगिक तत्त्वावर

कल्याण-डोंबिवलीला फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषणाचा विळखा

केडीएमसीतील नागरिक श्वसनाच्या आजाराने त्रस्त कल्याण (प्रतिनिधी) : नुकताच दिवाळी सण सर्वत्र मोठ्या उत्साहात

परतीच्या पावसाने भातपिके उद्ध्वस्त, बळीराजा आर्थिक अडचणीत

रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले

मुदखेडमध्ये संतप्त शेतकऱ्याचा तहसीलदारांच्या गाडीवर हल्ला: पोलिसांनी घेतले ताब्यात

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे एका संतप्त शेतकऱ्याने तहसीलदारांच्या वाहनाची काच फोडल्याची घटना घडली,