आयपीएलचा १४वा हंगाम कुठे खेळवायचा?

नवी दिल्ली:  कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवरून आयपीएलचा १४वा हंगाम खेळवण्याबाबत बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ सावध पावले उचलत आहे.

बीसीसीआयकडे आयपीएल आयोजित करण्याचे दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे १० संघांसह होम-अवे मॅच फॉरमॅटमध्ये सामने खेळणे. जे स्टेडियम संघाच्या मालकीचे असेल तेथेच सामने झाले पाहिजेत. बीसीसीआयसाठी आणखी एक मार्ग म्हणजे हंगामातील संपूर्ण सामने मुंबईतील तीन स्टेडियममध्ये (वानखेडे, सीसीआय आणि डीवाय पाटील स्टेडियम) आयोजित करणे. जिथे सर्व संघ आपले सर्व सामने खेळतील.

यूएई हा बीसीसीआयचा शेवटचा पर्याय आहे


बीसीसीआयकडे शेवटचा पर्याय म्हणजे सलग तिसऱ्या वर्षी आयपीएल यूएईमध्ये आयोजित करणे. जिथे त्यांनी खेळाडूंच्या पूर्ण सुरक्षेसह स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले आहे. मात्र या पर्यायावर सध्या कोणतीही चर्चा झालेली नाही.

स्पर्धेच्या वेळापत्रकात बदल

बीसीसीआय कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर वेळापत्रकात बदल करून डबल हेडर सामन्यांची संख्या कमी करण्याचा विचार करत आहे. पूर्व नियोजित वेळापत्रकानुसार, आयपीएल २०२२ स्पर्धा २ एप्रिलपासून सुरू होणार आहे. अशा स्थितीत स्पर्धेच्या सुरुवातीची तारीख एक आठवडा मागे ढकलली जाऊ शकते. अशा स्थितीत ही स्पर्धा २५ मार्चपासून सुरू होऊ शकते. मात्र कोरोनाची परिस्थिती पाहून या सर्व योजना अमलात आणल्या जातील.

आयपीएल २०२२साठी खेळाडूंच्या लिलावाच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. ते कधी आणि कुठे होणार, हे स्पष्ट नाही. मात्र करोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने राज्य सरकार विविध प्रकारचे निर्बंध लादत आहेत. अशा परिस्थितीत लिलावाचे ठिकाणही बदलू शकते.
Comments
Add Comment

बीसीसीआयकडून धोनीला दरमहा ७० हजार रुपये पेन्शन

मुंबई : १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतरही धोनीची क्रेझ तसूभरही कमी झालेली नाही.

वैभव सूर्यवंशीचा टी-२० विश्वचषक संघात समावेश होणार?

भारताचा माजी कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची मागणी मुंबई : माजी भारतीय कर्णधार आणि राष्ट्रीय निवड समितीचे

पहिल्याच दिवशी मेलबर्नमध्ये ७५ षटकांत २० बळी

चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला ४२ धावांची आघाडी नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील ॲशेस

भारतीय महिलांचा श्रीलंकेवर एकतर्फी मालिका विजय

शफाली वर्माची ७९ धावांची वादळी खेळी नवी दिल्ली : भारतीय महिला संघाने श्रीलंकेविरुद्धचा तिसरा सामना ८ विकेट्सने

श्रीलंकेविरूद्धच्या खेळीत शेफाली अव्वल! भारतीय महिला क्रिकेट 'टी 20'च्या इतिहासात ठरली वेगवान अर्धशतक करणारी तिसरी फलंदाज

तिरुवनंतपुरम: भारतीय महिला क्रिकेट संघाने एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यानंतर टी 20 मध्येही उत्कृष्ट कामगिरी कायम

क्रिकेट विश्वात जेमिमाच्या मैत्रीचीच चर्चा!

वाईट काळामधून स्मृती मानधनाला बाहेर काढायला मदत नवी दिल्ली : मैत्रीण कशी असावी, याचे उत्तम उदाहरण जेमिमा