चिपळुणात वाळू उत्खननाची मिळेना परवानगी

  32

चिपळूण :पावसाळा संपून तीन महिने ओलांडले आहेत. येथील वाळू व्यावसायिकांनी वाळू उत्खननासाठी परवाने मिळविण्यासाठी प्रशासनाकडे कागदपत्रांच्या पूर्ततेसह पैसेही भरले आहेत. या प्रक्रियेला महिना ओलांडून गेला तरी शासन स्तरावरून वाळू उत्खननासाठी परवानगी मिळाली नसल्याने येथील वाळू व्यावसायिक कमालीचे अडचणीत सापडले आहेत.

दरम्यान, वाळू व्यवसायासाठी परप्रांतातून आणलेल्या कामगारांना बसून पगार द्यावा लागत असल्याने वाळू व्यावसायिकांची दमछाक होऊ लागली आहे. वाशिष्ठी खाडीमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणावर वाळूचे उत्खनन केले जाते. यातून लाखोंचा महसूल शासनाला मिळतो. दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर वाळू परवान्यासाठी व्यावसायिक प्रशासनाकडे अर्ज करतात. मात्र यावर्षी बहुतांशी कार्यालयातील अधिकारी याकडे तितकेसे लक्ष देताना दिसत नाहीत.

वाळू उत्खननाला परवानगी मिळत नसल्याने काहीजण रात्रीच्यावेळी बेकायदा उत्खनन करून वाळूची चोरटी विक्री करत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे शासनाचा महसूल बुडत आहे. काही दिवसांपूर्वी गोवळकोट परिसरातही अशाच प्रकारची घटना घडली होती. पाच व्यावसायिकांनी महिनाभरापूर्वीच वाळू उत्खननाचे परवाने मिळावेत म्हणून खनिकर्म विभागाकडे सर्व कागदपत्रांसह अर्ज केले आहेत. मात्र, त्यांच्या तहसीलदार चौकशीपासून पुढील सर्वच प्रक्रिया धीम्यागतीने सुरू असल्याचे या व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
Comments
Add Comment

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत

Pune Airport: प्रवाशांना घेऊन विमान पुण्यात तर आलं, पण सामान मागेच राहीलं!

स्पाइसजेटच्या दुबई-पुणे विमानाने इंधन भारामुळे प्रवाशांचे सामान न घेताच पुण्यात लँडिंग केले.  पुणे:  दुबईहून