मुंबई-आग्रा महामार्गाला कचऱ्याचा विळखा

  142

शहापूर  : मुंबई-आग्रा महामार्गालगत पडघा ते कसारा दरम्यान रस्त्यालगत दोन्ही बाजूस कचऱ्याचा वेढा पडल्याने या कचऱ्यावर उंदीर, घुशी, डुकरांचा मुक्त संचार सुरू असतो, तर कुजलेल्या कचऱ्याने नागरिकांसोबत प्रवाशांना दुर्गंधीचा सामाना करावा लागत आहे.
याबाबत महामार्ग प्रशासन कोणतीही ठोस उपाययोजना करत नसल्याने प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

प्रामुख्याने महामार्गालगत असलेल्या ग्रामपंचायतीकडे हक्काचे डम्पिंग ग्राऊड नाही, त्यामुळे बहुतांशी ग्रामपंचायती कचऱ्याची विल्हेवाट महामार्गालगत लावताना दिसतात. अगदी खडावली फाट्यापासून ते वासिंद, आसनगांव, शहापूर, खर्डी, कसाराजवळील महामार्गालगत अनेक ठिकाणी प्लास्टिक, दुकानातील टाकाऊ पदार्थ, शिल्लक राहिलेले मांस, कोंबडीचे पंख, सडलेली अंडी, हॉटेलमधील शिल्लक राहीलेले अन्न यांची विल्हेवाट लावली जाते. या कचऱ्यावर मोठ्या प्रमाणात उंदीर, घुशी, डुकरे फिरताना दिसतात़ तर कुजलेल्या कचऱ्याने दुर्गंधीसोबत विविध आजारांची लागण होत आहे़

हा कचरा टाकण्यासाठी अनेक ग्रामपंचायतींना हक्काची जागाच नसल्याने पर्यायी जागा म्हणजे मुंबई-आग्रा महामार्गाच्या दोन्ही बाजूस त्याची विल्हेवाट लावली जात आहे़ यामुळे या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नेहमीच दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
महामार्ग प्राधिकरण याकडे डोळेझाक करत असल्याने वाहनचालकांसह प्रवासीवर्गात प्रचंड संताप व्यक्त करत आहेत़
Comments
Add Comment

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

ST : राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर (भंगार केंद्र) एसटीच्या जागेवर उभारले जाणार, 'एसटी'साठी उत्पन्नाचा नवा स्त्रोत...

मुंबई : एसटी विभागीतल जुनी वाहने  स्क्रॅप करून त्याचे सुटे भाग पुन्हा वापरात येणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांची

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या