मुंबई-आग्रा महामार्गाला कचऱ्याचा विळखा

शहापूर  : मुंबई-आग्रा महामार्गालगत पडघा ते कसारा दरम्यान रस्त्यालगत दोन्ही बाजूस कचऱ्याचा वेढा पडल्याने या कचऱ्यावर उंदीर, घुशी, डुकरांचा मुक्त संचार सुरू असतो, तर कुजलेल्या कचऱ्याने नागरिकांसोबत प्रवाशांना दुर्गंधीचा सामाना करावा लागत आहे.
याबाबत महामार्ग प्रशासन कोणतीही ठोस उपाययोजना करत नसल्याने प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

प्रामुख्याने महामार्गालगत असलेल्या ग्रामपंचायतीकडे हक्काचे डम्पिंग ग्राऊड नाही, त्यामुळे बहुतांशी ग्रामपंचायती कचऱ्याची विल्हेवाट महामार्गालगत लावताना दिसतात. अगदी खडावली फाट्यापासून ते वासिंद, आसनगांव, शहापूर, खर्डी, कसाराजवळील महामार्गालगत अनेक ठिकाणी प्लास्टिक, दुकानातील टाकाऊ पदार्थ, शिल्लक राहिलेले मांस, कोंबडीचे पंख, सडलेली अंडी, हॉटेलमधील शिल्लक राहीलेले अन्न यांची विल्हेवाट लावली जाते. या कचऱ्यावर मोठ्या प्रमाणात उंदीर, घुशी, डुकरे फिरताना दिसतात़ तर कुजलेल्या कचऱ्याने दुर्गंधीसोबत विविध आजारांची लागण होत आहे़

हा कचरा टाकण्यासाठी अनेक ग्रामपंचायतींना हक्काची जागाच नसल्याने पर्यायी जागा म्हणजे मुंबई-आग्रा महामार्गाच्या दोन्ही बाजूस त्याची विल्हेवाट लावली जात आहे़ यामुळे या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नेहमीच दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
महामार्ग प्राधिकरण याकडे डोळेझाक करत असल्याने वाहनचालकांसह प्रवासीवर्गात प्रचंड संताप व्यक्त करत आहेत़
Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये