सिंधुदुर्गचा पॉझिटिव्हिटी रेट वाढला

सिंधुदुर्ग : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हयाची आरोग्य आणि प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे, अशी महिती जिल्ह्यचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिली. जिल्ह्यातल्या पत्रकारांशी त्यांनी दूर दृश्य प्रणाली द्वारे संवाद साधला.

जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट जो शुन्या पर्यंत आला होता तो आता झपाट्यानं वाढून १४.६५ टक्क्यावर पोहोचला आहे. हि गोष्ट चिंतादायक असली तरी यासाठी जिल्हा यंत्रणा सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात १ हजार ९०० बेड, पुरेसे ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध असल्याचे ते म्हाणाले. १५ ते १८ वयोगटातल्या ४० हजार मुलांना लस देण्याचं उद्दिष्ट असून १० दिवसात हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार आहे.


त्याच बरोबर येत्या १० जानेवारी पासून ६० वर्षावरील नागरिकांना बूस्टर डोस देण्यात येणार असल्याचे पालक मंत्र्यांनी सांगितलं. जिल्ह्यात लसीची कमतरता नाही. ६६ हजर ८०० लस साठा उपलब्ध असून तो पुरेसा असल्याचे पालकमंत्री म्हणाले. लॉकडाऊन बाबत जिल्ह्यातल्या सर्व यंत्रणांशी, लोक प्रतिनिधींशी, व्यवसायकांशी चर्चा करूनच निर्णय घेण्यात येईल असे श्री. सामंत म्हणाले. रात्रीची संचारबंदी कडक करा आणि मास्क वापरणे बंधनकारक करा अशा सूचना पोलिसांना दिल्याचे पालकमंत्री म्हणाले.

Comments
Add Comment

माकडांची मस्ती बेतली तरुणीच्या जीवावर; राजगडावर घडली भयंकर घटना

पुणे : राजगड किल्ला सर करण्यासाठी गेलेल्या मुंबईच्या तरुणीच्या डोक्यात दगड पडल्याने तरुणी जखमी झाली आहे.

वोट चोरीचे आरोप खोट्या आख्यायिकांवर आधारित

मुख्यमंत्री फडणवीस यांची काँग्रेसवर टीका छत्रपती संभाजीनगर : काँग्रेस फक्त वोट चोरीचे आरोप खोट्या आख्यायिकेवर

छत्रपती संभाजीनगर : फडणवीसांच्या दौर्‍याने राजकीय वातावरण तापलं

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या भाजपच्या कार्यक्रमामुळे संपूर्ण शहरात राजकीय हालचालींना

येणारा काळ आयुर्वेदाचा सुवर्णकाळ : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : आयुर्वेद या निसर्गाशी अनुरुप उपचार पद्धतीचे महत्त्व जगभरात मान्य झाले आहे. आयुष

स्वामी रामनंद तीर्थ यांचे मराठवाडा मुक्ती संग्रामात अमूल्य योगदान : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांनी तरुणाईमध्ये देशभक्ती जागृत

सततच्या अपघातांमुळे नवले पूल परिसर ‘मृत्यूचा सापळा’

पाच वर्षांत २५७ अपघात; ११५ जणांचा बळी पुणे  : नवले पूल परिसरातील प्राणांतिक अपघातांची साखळी थांबण्याचे नाव घेत