सिंधुदुर्गचा पॉझिटिव्हिटी रेट वाढला

  75

सिंधुदुर्ग : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हयाची आरोग्य आणि प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे, अशी महिती जिल्ह्यचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिली. जिल्ह्यातल्या पत्रकारांशी त्यांनी दूर दृश्य प्रणाली द्वारे संवाद साधला.

जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट जो शुन्या पर्यंत आला होता तो आता झपाट्यानं वाढून १४.६५ टक्क्यावर पोहोचला आहे. हि गोष्ट चिंतादायक असली तरी यासाठी जिल्हा यंत्रणा सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात १ हजार ९०० बेड, पुरेसे ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध असल्याचे ते म्हाणाले. १५ ते १८ वयोगटातल्या ४० हजार मुलांना लस देण्याचं उद्दिष्ट असून १० दिवसात हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार आहे.


त्याच बरोबर येत्या १० जानेवारी पासून ६० वर्षावरील नागरिकांना बूस्टर डोस देण्यात येणार असल्याचे पालक मंत्र्यांनी सांगितलं. जिल्ह्यात लसीची कमतरता नाही. ६६ हजर ८०० लस साठा उपलब्ध असून तो पुरेसा असल्याचे पालकमंत्री म्हणाले. लॉकडाऊन बाबत जिल्ह्यातल्या सर्व यंत्रणांशी, लोक प्रतिनिधींशी, व्यवसायकांशी चर्चा करूनच निर्णय घेण्यात येईल असे श्री. सामंत म्हणाले. रात्रीची संचारबंदी कडक करा आणि मास्क वापरणे बंधनकारक करा अशा सूचना पोलिसांना दिल्याचे पालकमंत्री म्हणाले.

Comments
Add Comment

शिक्षकाने लॉजमध्ये जाऊन का केली आत्महत्या?

नांदेड : नांदेड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कंधार तालुक्यातील एका खासगी शिक्षण संस्थेत कार्यरत

महादेवी हत्तिणीला ‘वनतारा’मध्ये पाठवण्याबाबतचा अहवाल

पेटा संस्थेमार्फत सत्यपरिस्थिती नमूद कोल्हापूर : महादेवी या हत्तिणीला कोल्हापूर मधील एका मठातून वनतारा येथे

हुंड्याऐवजी मुलींसाठी फिक्स डिपॉझिट

मराठा समाजाची लग्न आचारसंहिता अहिल्यानगर : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणानंतर मराठा समाजातील

डॉक्टरांसाठी ‘क्यूआर कोड’ प्रणाली अनिवार्य

बोगस डॉक्टरांना बसणार आळा पुणे : राज्यातील बोगस डॉक्टरांच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी आता

भाऊरायांना राखी पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिस सज्ज, पावसाची चिंता मिटली; राखीसाठी वॉटरप्रूफ लिफाफा

पुणे (वार्ताहर) : दूरगावी असणाऱ्या भावाला आपली प्रेमाची राखी पाठविण्यासाठी सध्या बहिणींची लगबग सुरू आहे. तसेच

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग