कोरोना काळात कर्नाटकची भूमिका आडमुठीच

सोलापूर : नागरिकांना कर्नाटक राज्यात प्रवेश देण्याबाबत कर्नाटक सरकारची भूमिका नेहमीच आडमुठेपणाची राहिली आहे. कोरोना लसीचे दोन डोस घेतलेले असतील देशात, परदेशांतही प्रवेश दिला जात असताना आरटीपीसीआरची सक्ती करून नागरिकांना परत पाठवण्याची कर्नाटक सरकारचा निर्णय योग्य नाही. याबाबत मी स्वत: कर्नाटक सरकारला पत्र पाठवून विनंती करणार आहे, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

कर्नाटक सरकारकडून कोगनोळी टोल नाक्यावर कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांनाही आरटीपीसीआर चाचणीची सक्ती करून परत पाठवले जात आहे. याबाबत पालकमंत्री सतेज पाटील बोलत होते. ते म्हणाले, केंद्र सरकारने राज्यांमधील प्रवेशाबाबत काही निकष घालून दिलेले आहेत. दोन डोस किंवा आरटीपीसीआर चाचणी अहवाल असा निकष आहे. दोन डोस झाले असतील देशात, परदेशात कुठेही फिरता येते, मग कर्नाटकात प्रवेश का दिला जात नाही? कर्नाटकमध्ये नागरिकांना रोज ये-जा करावी लागते, व्यवहार करायचे असतात. गडहिंग्लज, चंदगडला कोगनोळीवरून जावे लागते. असे असताना राष्ट्रीय महामार्ग बंद करणे चुकीचे आहे. याबाबत मी स्वत: कर्नाटक सरकारशी पत्र व्यवहार करून विनंती करणार आहे.
Comments
Add Comment

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन घ्यायला जात असाल तर आधी हे वाचा

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन आज दिवसभर राहणार बंद मुंबई: कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर हे प्रसिद्ध

देशभरात उद्यापासून “स्वस्थ नारी, सशक्त परिवार" अभियानाला सुरूवात

पालघर : केंद्र सरकारतर्फे महिलांच्या आरोग्याची तपासणी, जनजागृती आणि पोषण सेवांचा प्रसार करण्यासाठी “स्वस्थ

नागपुर पोलिसांची ‘ऑपरेशन शक्ती' अंतर्गत मोठी कारवाई, OYO मध्ये चालला होता भलताच प्रकार

ओयो हॉटेलमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, तिघांना अटक, एक फरार नागपूर: नागपूर शहर पोलिसांच्या ‘ऑपरेशन शक्ती’

श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला महाराष्ट्राच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा

महोत्सवात स्थानिक लोकपरंपरांचे होणार सादरीकरण मुंबई : श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जानेवारी अखेरपर्यंत घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी अखेरपर्यंत होणार मुंबई:  स्थानिक स्वराज्य संस्था

आई म्हणाली अभ्यास कर, मुलीने घेतला गळफास

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अगदी लहान कारणामुळे एका १८ वर्षीय