कोरोना काळात कर्नाटकची भूमिका आडमुठीच

सोलापूर : नागरिकांना कर्नाटक राज्यात प्रवेश देण्याबाबत कर्नाटक सरकारची भूमिका नेहमीच आडमुठेपणाची राहिली आहे. कोरोना लसीचे दोन डोस घेतलेले असतील देशात, परदेशांतही प्रवेश दिला जात असताना आरटीपीसीआरची सक्ती करून नागरिकांना परत पाठवण्याची कर्नाटक सरकारचा निर्णय योग्य नाही. याबाबत मी स्वत: कर्नाटक सरकारला पत्र पाठवून विनंती करणार आहे, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

कर्नाटक सरकारकडून कोगनोळी टोल नाक्यावर कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांनाही आरटीपीसीआर चाचणीची सक्ती करून परत पाठवले जात आहे. याबाबत पालकमंत्री सतेज पाटील बोलत होते. ते म्हणाले, केंद्र सरकारने राज्यांमधील प्रवेशाबाबत काही निकष घालून दिलेले आहेत. दोन डोस किंवा आरटीपीसीआर चाचणी अहवाल असा निकष आहे. दोन डोस झाले असतील देशात, परदेशात कुठेही फिरता येते, मग कर्नाटकात प्रवेश का दिला जात नाही? कर्नाटकमध्ये नागरिकांना रोज ये-जा करावी लागते, व्यवहार करायचे असतात. गडहिंग्लज, चंदगडला कोगनोळीवरून जावे लागते. असे असताना राष्ट्रीय महामार्ग बंद करणे चुकीचे आहे. याबाबत मी स्वत: कर्नाटक सरकारशी पत्र व्यवहार करून विनंती करणार आहे.
Comments
Add Comment

परतीच्या पावसाने भात कापणी उद्ध्वस्त

रायगड : रायगड जिल्ह्यासह कोकणात सध्या भात कापणीचा हंगाम सुरू असतानाच परतीच्या पावसाने बळीराजाचे हाल केले आहेत.

कल्याणमध्ये धुंवाधार पाऊस, ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, दिवाळीच्या उत्साहावर पाणी, वीज गायब!

ठाणे: ऐन दिवाळीच्या धामधुमीत, मंगळवारी (२१ ऑक्टोबर २०२५) कल्याण शहरात हवामानाने अचानक रूप बदलले आणि जोरदार

संगमनेरमध्ये ९५०० बोगस मतदारांची नोंद!

बाळासाहेब थोरात यांचा खळबळजनक आरोप संगमनेर : संगमनेर विधानसभा निवडणुकीत साडे नऊ हजार बोगस मतदारांची नोंद झाली

सलग आगीच्या घटनांनी खळबळ! नवी मुंबई व पनवेलकर चिंतेत

रायगड : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई व पनवेल परिसरात सलग लागलेल्या दोन आगीच्या घटनांनी नागरिकांमध्ये

राजगडची उमराटकर वस्ती उजळली; तब्बल ७८ वर्षांनी वीज मिळाली

पुणे : राजगडच्या दुर्गम वस्त्यांमध्ये तब्बल ७८ वर्षांनी वीज आली आहे. उमराटकर-मोरे वस्तीला जणू काही दिवाळी भेट

Maharashtra Weather Update : यंदाची दिवाळी पावसातचं? राज्यभर पुढील ४ दिवस वादळी पावसाचे थैमान; IMD चा 'हा' इशारा वाचून घ्या.

मुंबई : देशभरातून नैऋत्य मोसमी पावसाने (Southwest Monsoon) माघार घेतल्यामुळे दिलासा मिळाला असतानाच, आता महाराष्ट्रावर