सोलापूर : नागरिकांना कर्नाटक राज्यात प्रवेश देण्याबाबत कर्नाटक सरकारची भूमिका नेहमीच आडमुठेपणाची राहिली आहे. कोरोना लसीचे दोन डोस घेतलेले असतील देशात, परदेशांतही प्रवेश दिला जात असताना आरटीपीसीआरची सक्ती करून नागरिकांना परत पाठवण्याची कर्नाटक सरकारचा निर्णय योग्य नाही. याबाबत मी स्वत: कर्नाटक सरकारला पत्र पाठवून विनंती करणार आहे, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
कर्नाटक सरकारकडून कोगनोळी टोल नाक्यावर कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांनाही आरटीपीसीआर चाचणीची सक्ती करून परत पाठवले जात आहे. याबाबत पालकमंत्री सतेज पाटील बोलत होते. ते म्हणाले, केंद्र सरकारने राज्यांमधील प्रवेशाबाबत काही निकष घालून दिलेले आहेत. दोन डोस किंवा आरटीपीसीआर चाचणी अहवाल असा निकष आहे. दोन डोस झाले असतील देशात, परदेशात कुठेही फिरता येते, मग कर्नाटकात प्रवेश का दिला जात नाही? कर्नाटकमध्ये नागरिकांना रोज ये-जा करावी लागते, व्यवहार करायचे असतात. गडहिंग्लज, चंदगडला कोगनोळीवरून जावे लागते. असे असताना राष्ट्रीय महामार्ग बंद करणे चुकीचे आहे. याबाबत मी स्वत: कर्नाटक सरकारशी पत्र व्यवहार करून विनंती करणार आहे.
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…