कर्जत उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस सेंटर सुरू करण्याची मागणी

  130

कर्जत : कर्जत तालुक्याचा वाढता विकास पाहता कर्जत व परिसरातील ग्रामस्थांसाठी चांगल्या आरोग्य विषयक सुविधा कर्जत मध्येच मिळाव्यात आणि कुठलाच रुग्ण शहरी भागात उपचारांसाठी जाऊ नये यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतानाच आज कर्जत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस सेंटर उभारण्यात यावे यासाठी वैद्यकीय अधीक्षक मनोज बनसोडे यांची भेट घेत त्यांना विनंती वजा आंदोलनाचे निवेदन दिले.

कर्जत खालापुर तालुक्यातील अनेक लोकांना नियमित डायलिसिस तसेच चांगल्या उपचारांसाठी पनवेल, वाशी, बदलापूर, मुंबई अश्या विविध ठिकाणी जावे लागते. ही बाब लक्षात कर्जत भाजपच्या वतीने कर्जत उप जिल्हा रुग्णालयात डायलिसिस सेंटर सुरू करावे , अशी शासना कडे मागणी केली होती.ती मंजूर देखील झाली होती .परंतु शासकीय दिरंगाईमुळे मुळे डायलिसिस सेंटर चालू झालेले नाही . म्हणुन लोकांची गरज लक्षात घेऊन आज भारतीय जनता पार्टी कर्जतच्या वतीने कर्जत उपजिल्हा रुग्णालय येथे वैद्यकीय अधीक्षक डॉ मनोज मनोज बनसोडे यांनी भेट घेऊन विनंती वजा आंदोलनाचे निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी किसान मोर्चा कोकण संपर्क प्रमुख सुनिल गोगटे , कर्जत शहर अध्यक्ष बळवंत घुमरे, सरचिटणीस प्रकाश पालकर, माजी शहर अध्यक्ष दिनेश सोळंकी, सोशल मीडिया सह संयोजक रायगड सूर्यकांत गुप्ता, सोशल मीडिया संयोजक मिलिंद खंडागळे, युवा मोर्चा शहर चिटणीस सर्वेश गोगटे, विशाल सुर्वे, दर्पण घारे आणि इतर भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Add Comment

हार्बर रेल्वे ठप्प! तांत्रिक बिघाडामुळे नेरूळ ते पनवेल सेवा बंद, संध्याकाळी घरी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल

तांत्रिक बिघाडामुळे आज रविवारी संध्याकाळच्या सुमारास हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत नवी मुंबई: मुंबईतील मध्य

दादरचा ऐतिहासिक कबूतरखाना बंद: मुंबईची एक ओळख काळाच्या पडद्याआड

मुंबई: दादर पश्चिमेचा कबुतरखाना आता कायमचा बंद होणार आहे. एकेकाळी दादरकरांसाठी पत्ता सांगताना कबुतरखाना ही एक

सर्व प्रतिज्ञापत्रांसाठी मुद्रांक शुल्क माफ

महसूलमंत्री बावनकुळे यांची घोषणा मुंबई : सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे पाचशे रुपयांचे

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या सार्वजनिक, वैयक्तिक समस्यांवर थेट सुनावणी

जनतेच्या तक्रारींचे त्वरित निवारण  सिंधुदुर्गनगरी : शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या अनेक

आपल्या देशाचे नाव उंचावण्याची भावी अधिकाऱ्यांची जबाबदारी

खासदार नारायण राणे यांचे यूपीएससी गुणवंतांना मार्गदर्शन मुंबई : येत्या काळात भारत हा चौथ्या अर्थव्यवस्थेवरून

शुक्रवारच्या कारवाईनंतर दादर कबुतर खान्यावर खाद्य देणे सुरूच !

खाद्य विकणाऱ्यांसह दाणे टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतर खान्यांवर