अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीची घोषणा? - थकबाकीदार शेतकऱ्यांची यादी शिंदे समितीकडे पाठवण्याच्या राज्य सरकारच्या सूचना

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. थकीत कर्जदार शेतकऱ्यांची सविस्तर माहिती 'शिंदे समिती'कडे पाठवण्याच्या सूचना राज्य सरकारने सर्व बँकांना दिल्या आहेत. यामुळे येत्या ६ मार्च रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात राज्यातील बळीराजाला संपूर्ण कर्जमाफी मिळणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

राज्यातील विविध जिल्हा बँकांमार्फत जून २०२५ पर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जिल्ह्यातील सेवा सहकारी सोसायट्या, सचिव, बँकेचे तपास अधिकारी आणि शाखाधिकारी यांच्या माध्यमातून हे संकलन सुरू आहे. या प्रक्रियेत सहनिबंधक आणि निबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांचेही सहकार्य घेतले जात आहे.

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारी ते २५ मार्च २०२६ या कालावधीत मुंबईत पार पडणार आहे. ६ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. कर्जमाफीचा निर्णय घ्यायचा झाल्यास नेमकी किती आर्थिक तरतूद करावी लागेल, यासाठी ही अचूक आकडेवारी महत्त्वाची ठरणार आहे. प्रशासनातील सूत्रांच्या माहितीनुसार, पडताळणी पूर्ण झाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर अंतिम शिक्कामोर्तब होऊ शकते.

शेतकऱ्यांचे डोळे अधिवेशनाकडे


राज्यात गेल्या काही काळापासून नैसर्गिक आपत्ती आणि शेतीमालाच्या दरातील चढ-उतारामुळे शेतकरी अडचणीत आहे. अशा परिस्थितीत ही कर्जमाफी झाल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या हालचालींना मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न

MSRTC : 'आपली बस, आपली सेवा'; एसटी महामंडळाची नवी मोहीम

मुंबई : महाराष्ट्राच्या जीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं

New Rule For Hotel : हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’चा वापराचा उल्लेख बंधनकारक

मुंबई : पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन

Sanjay Nirupam : निरुपम यांच्या कारची हवा काढणाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई : शिवसेनेचे संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा - टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर; ६ जिल्ह्यांना उष्णतेचा, तर १० जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्राचं हवामान बिघडलय आणि याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र