अमेठीतील जनतेचा वापर केवळ मतांसाठीच

  77

नवी दिल्ली : “गांधी कुटुंबाने अमेठीतील जनतेचा फक्त मतासांठी वापर केला. अमेठीच नाही, तर रायबरेलीची देखील हीच अवस्था आहे. दोन्ही मतदारसंघात पायाभूत सुविधांचा अभाव आहे. हे दोन्ही मतदारसंघ महामार्गाशी जोडण्यासाठी त्यांनी काहीच केले नाही,” अशी टीका स्मृती इराणी यांनी सोनिया आणि राहुल गांधी यांच्यावर केली आहे. एका मुलाखतीत बोलताना स्मृती इराणी यांनी ही टीका केली.



अमेठीच्या जनतेला मागच्या तीन-चार दशकांपासून फक्त आश्वासनेच मिळाली होती. वैद्यकीय महाविद्यालयाचे देखील आश्वासन देण्यात आलेले पण, ते अस्तित्वात मात्र आले नव्हते. गेली अनेक वर्षे अमेठीला ज्या गोष्टींची आश्वासने मिळाली होती, त्या सगळ्या गोष्टी आज अस्तित्वात आहेत,” असेही त्या यावेळी म्हणाल्या.



पहिल्यांदा जेव्हा अमेठीत आले तेव्हा येथे जिल्हाधिकारी कार्यालय नव्हते, मुख्य वैद्यकीय अधिकारी कार्यालयात अनुपस्थित होते, मुख्य शिक्षणाधिकारी कार्यालय नव्हते अस्तित्वात नव्हते. एवढेच नव्हे तर इथे रुग्णालयात मूलभूत सुविधा उपलब्ध नव्हत्या, ट्रॉमा सेंटर नव्हते, महिला आणि मुलांसाठी विशेष रुग्णालये नव्हती, योग्य अग्निशमन केंद्र नव्हते, अशी टीकाही इराणी यांनी यावेळी केली.

Comments
Add Comment

श्री दत्तात्रेयाच्या गिरनार पर्वतावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

येत्या २ जुलै रोजी स्थानिक प्रशासन घेणार योग्य खबरदारी जुनागढ : गुजरातमधील जुनागड येथे असलेल्या गिरनार

"अंतराळातून भारत खूप भव्य दिसतो" अंतराळवीर शुभांशू शुक्लाने मारल्या पंतप्रधान मोदींशी गप्पा

अंतराळातील सर्वात मोठे आव्हान काय आहे? पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लासोबत संवाद नवी

मोठी बातमी: आयपीएस पराग जैन भारताचे नवे 'RAW' प्रमुख

प्रतिनिधी: भारताची परकीय गुप्तचर संस्था म्हणून जगभरातही ख्याती असलेल्या रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (Research and Analysis Wing (RAW)

Local Train Derails: तामिळनाडू पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली, प्रवाशांमध्ये गोंधळ

चित्तेरी स्थानकावरून ट्रेन सुटल्यानंतर काही वेळातच मोठा आवाज ऐकू आला चेन्नई: तामिळनाडूच्या रानीपेट जिल्ह्यात

भाजपने ३ राज्यात नेमले निवडणूक अधिकारी

नवी दिल्ली  : महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी

देशभरात पुढील ७ दिवसांत मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : देशभरात पुढील ७ दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय.