विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं कमी होणार

मुंबई : सर्व विषयांच्या अभ्यासक्रमाचे विद्यार्थ्यांवरील ओझे (School Bag) कमी करण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (NCERT) नवे शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये पाठ्यपुस्तकांचे ओझे हलके करण्याचे ठरवले आहे. ही नवी अभ्यासक्रमाची पुस्तके मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत म्हणजेच नवे शैक्षणिक वर्ष 2022 सुरु होण्याआधी उपलब्ध होण्याची शक्यता असल्याचे NCERT ने सांगितले आहे.

सततच्या शैक्षणिक व्यत्ययांच्या पार्श्वभूमीवर, NCERT ने पुढील वर्षासाठी अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके सर्व टप्प्यांवर तर्कसंगत करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण शालेय शिक्षणासाठी नवीन राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्क (NCF) बाहेर येण्यास वेळ लागू शकतो. अंतर्गत आणि बाह्य तज्ज्ञांचा समावेश असलेले विभाग मंगळवारी तर्कसंगत अभ्यासक्रम सादर करणार आहेत, ज्याच्या आधारे नवीन पाठ्यपुस्तकांची रचना केली जाणार आहे.

NCERT संचालक श्रीधर श्रीवास्तव यांनी जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे की, पाठ्यपुस्तकांच्या अभ्यासक्रमाचे विश्लेषण केल्यानंतर, सर्व सामग्री विभागांनी "28 डिसेंबर 2021 पर्यंत तर्कसंगत करण्यासाठी प्रस्तावित अभ्यासक्रमाचे विश्लेषण अभ्यासक्रम आणि विकास विभागाकडे सुपूर्द करणे आवश्यक आहे. संचालकांनी असेही नमूद केले की 1 जानेवारी 2022 पर्यंत, प्रस्तावित बदलांसह पाठ्यपुस्तके पुन:र्मुद्रणासाठी प्रकाशन विभागाकडे पाठवणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे पुस्तकांचे ओझे कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. 2022-2023 शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिलीच्या अभ्यासक्रमातील चार विषयाचा अभ्यासक्रम एकाच पुस्तकात समाविष्ट करण्यात येणार आहे. यामुळे पहिल्याच्या विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे पुस्तकांचे ओझे कमी होणार आहे. सुरुवातीला ही पद्धत इयत्ता पहिलीसाठी असेल, त्यानंतर सर्व प्राथमिक वर्गांसाठी लागू केली जाईल. यानुसार, इयत्ता पहिलीमध्ये शिकवले जाणारे चार विषय - इंग्रजी, मराठी, गणित आणि खेळा आणि शिका प्रत्येक सत्रासाठी एका पाठ्यपुस्तकात एकत्रित केले गेले आहेत. प्रत्येक विषयाचे पाठ्यपुस्तक वेगळे घेऊन जाण्याऐवजी, विद्यार्थ्याने सत्रानुसार भाग 1, 2, 3 किंवा 4 असे, फक्त एक पाठ्यपुस्तक बाळगणे आवश्यक आहे.
Comments
Add Comment

भावी पिढीला प्रदूषणमुक्त पर्यावरण देण्यासाठी 'नो पीयूसी... नो फ्युएल' उपक्रम राबवणार! म्हणजे नेमकं काय करणार? जाणून घ्या

मुंबई: भविष्यातील पिढीला प्रदूषण मुक्त पर्यावरण देण्यासाठी सध्याच्या पिढीने स्वतः वर पर्यावरण पूरक काही

मनोज जरांगे यांची आणखी एक नवी मागणी... ओबीसी नेत्यांमध्ये मोठी खळबळ

संभाजीनगर: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुंबईतील आझाद मैदानात ५ दिवस उपोषण करत, सरकारकडून आपल्या मागण्या पूर्ण

मंत्रालयातच फसवणूक! सरकारी नोकरीच्या नावाखाली घेतली मुलाखत, आणि...

नागपूर: सरकारी नोकरीचे स्वप्न प्रत्येकांचे असते, त्यासाठी तरुणवर्ग विविध भरती प्रक्रियेची तयारी करतात, मुलाखती

मराठ्यांना कुणबी दाखले देण्यास सुरुवात

भुजबळांचे गैरसमज दूर करणार, शासननिर्णय व आश्वासनांची पूर्तता करण्याचे मंत्रिमंडळ उपसमितीचे

महापालिका प्रभाग रचनेच्या हरकतींवर उद्या सुनावणी

बालगंधर्व रंगमंदिर सज्ज पुणे : पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग

पुणे मेट्रोचे गणेशोत्सवात साडेपाच कोटींचे उत्पन्न

पुणे : मानाच्या प्रमुख बाप्पांचे दर्शन, देखावे आणि विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी गणेशोत्सवातील दहा दिवसांच्या