सोलापूर , आजोती व तिसंगी या दोन गावांत होणारे अल्पवयीन मुलींचे विवाह तालुका आणि ग्रामीण पोलिसांनी रोखले आहेत. कण्हेरगाव (ता. माढा) येथील एका १३ वर्षीय मुलीचा आजोती येथील युवकाशी तर अकलूज (ता. माळशिरस) येथील १५ वर्षीय मुलीचा बालविवाह मस्के वस्ती, तिसंगी येथील युवकाशी होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मिलिंद पाटील, अंमलदार परशुराम शिंदे यांनी आजोती येथे जाऊन बालविवाह थांबवला. मुलीच्या पालकांचे समुपदेशन केले. त्या मुलीस सोलापूर येथील महिला व बालकल्याण समितीसमोर हजर केले. तसेच पोलिस निरीक्षक धनंजय जाधव, पोलिस उपनिरीक्षक केदार यांनी तिसंगी येथे जाऊन होणारा बालविवाह रोखला. यातील मुलीलाही महिला व बालकल्याण समितीसमोर हजर केले.
सेवाव्रती: शिबानी जोशी ईशान्य भारतातील सात राज्ये निसर्ग संपन्नतेने नटलेली राज्य; परंतु सीमारेषा जवळ असल्यामुळे…
मुंबई : आधीच महागाईने बेजार झालेल्या सर्वसामान्य मुंबईकरांना आणखीन महागाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. सीएनजी…
मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने आयसीसी टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर या फॉरमॅटला अलविदा म्हटले…
महाराष्ट्रातील १० कॉलेजचा त्यात समावेश मुंबई : वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी परदेशामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या…
वॉशिंग्टन : अमेरिकेत आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. वाढती बेरोजगारी आणि आयटीतील एआयचा वाढता यामुळे…
मुंबई: केसगळती(hair fall) ही सध्याची मोठी समस्या बनली आहे. थोडेफार केस गळणे ही सामान्य बाब…