एसटी कर्मचाऱ्यांकडून राज्य सरकारचा निषेध

  105

नाशिक : एसटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्तीला सुरुवात झाल्यानंतर नाशिकमधील डेपोबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी फलक फडकावून राज्य सरकारच्या या कृतीचा निषेध केला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला ६३ दिवस उलटून गेले असून अद्यापही विलीनीकरणाचा तिढा सुटलेला नाही. संप मोडीत काढण्यासाठी एसटी प्रशासनातर्फे अनेक प्रयत्न झाले. निलंबन, सेवासमाप्ती, बदल्यांतून दबावतंत्राचाही वापर करण्यात आला. मात्र, आंदोलक कर्मचाऱ्यांवर कुठलाही प्रभाव पडत नसल्याची सध्याची स्थिती आहे. तर आजपासून थेट एसटी कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमधील आगारात फलकबाजीतून सरकारचा निषेध नोंदवण्यात आला आहे.

यामध्ये सरकारी सेवेत विलीनीकरणाचा प्रत्येकाचा हट्ट पूर्ण करता येणार नाही, असे स्पष्ट करीत विलीनीकरणाचा विषय एसटी कर्मचाऱ्यांनी डोक्यातून काढून टाकावा, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला होता. या वक्तव्याचा निषेध म्हणून देखील फलकबाजी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे नाशिकमधून अद्यापही अनेक कर्मचारी संपात सहभागी असल्याचे चित्र आहे. अजित पवार यांच्या मोठ्या वक्तव्यानंतरही राज्यातील अनेक आगारांमध्ये एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत.
Comments
Add Comment

शिवसेना आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला

संगमनेर : संगमनेर विधानसभेचे शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला झाल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी ७.४०

विरार दुर्घटना : मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत जाहीर

मुंबई : विरार भागात एक इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झालेला आहे, याबद्दल मुख्यमंत्री

Dagdusheth Halwai Ganpati Atharvashirsha : दगडूशेठ गणपतीसमोर ३५ हजार महिलांचे एकत्रित अथर्वशीर्ष पठण; खासदार सुनेत्रा पवारांचीदेखील खास उपस्थिती

पुणे : गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात पुण्यात भक्तिभाव आणि मंत्रोच्चारांच्या गजरात झाली. शहरातील

गडचिरोली जिल्ह्यात चकमक, एवढे जहाल नक्षलवादी ठार

गडचिरोली : महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात सुरक्षा पथक आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत चार जहाल

Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis : “शिवनेरीवरून शब्द देतो...” मनोज जरांगे पाटलांचा फडणवीसांना थेट इशारा!

पुणे : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे, या प्रमुख मागणीसाठी अंतरवाली सराटीतून २७ ऑगस्ट रोजी मुंबईच्या

विरार इमारत दुर्घटना, मृतांचा आकडा १५ वर

वसई: वसई तालुक्याच्या विरार येथील नारंगी रोडवरील रमाबाई अपार्टमेंट इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा