एसटी कर्मचाऱ्यांकडून राज्य सरकारचा निषेध

नाशिक : एसटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्तीला सुरुवात झाल्यानंतर नाशिकमधील डेपोबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी फलक फडकावून राज्य सरकारच्या या कृतीचा निषेध केला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला ६३ दिवस उलटून गेले असून अद्यापही विलीनीकरणाचा तिढा सुटलेला नाही. संप मोडीत काढण्यासाठी एसटी प्रशासनातर्फे अनेक प्रयत्न झाले. निलंबन, सेवासमाप्ती, बदल्यांतून दबावतंत्राचाही वापर करण्यात आला. मात्र, आंदोलक कर्मचाऱ्यांवर कुठलाही प्रभाव पडत नसल्याची सध्याची स्थिती आहे. तर आजपासून थेट एसटी कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमधील आगारात फलकबाजीतून सरकारचा निषेध नोंदवण्यात आला आहे.

यामध्ये सरकारी सेवेत विलीनीकरणाचा प्रत्येकाचा हट्ट पूर्ण करता येणार नाही, असे स्पष्ट करीत विलीनीकरणाचा विषय एसटी कर्मचाऱ्यांनी डोक्यातून काढून टाकावा, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला होता. या वक्तव्याचा निषेध म्हणून देखील फलकबाजी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे नाशिकमधून अद्यापही अनेक कर्मचारी संपात सहभागी असल्याचे चित्र आहे. अजित पवार यांच्या मोठ्या वक्तव्यानंतरही राज्यातील अनेक आगारांमध्ये एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत.
Comments
Add Comment

मराठा आरक्षण मार्गातील सर्वात मोठा अडथळा दूर

हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ विरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळली मुंबई : हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला

पवारांच्या आमदाराने जरांगेंकडून पुन्हा आंदोलन करवले- छगन भुजबळ

नागपूर : अंतरवली सराटी येथे 2 सप्टेंबर 2023 रोजी झालेल्या लाठीचार्जनंतर मनोज जरांगे यांचे आंदोलन पुन्हा सुरू

Pune Crime Firing : घायवळ गॅंगचा प्रकाश धुमाळांवर गोळीबार, २०० मीटरवर पोलिस स्टेशन तरी पोलिसांना यायला अर्धा तास का लागला?

पुणे : पुणे शहरात गुन्हेगारी टोळ्यांचे थैमान थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. नुकतेच टोळीयुद्धाचे प्रकार घडून

Nanded Accident : ब्रेक फेल अन् ट्रकने उडवली जीप! दुचाक्यांचा चेंदामेदा; नेमकं काय घडलं? थरकाप उडवणारा अपघात

नांदेड : राज्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्यात भर पडली आहे नांदेड (Nanded) जिल्ह्यातील मुखेड

ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचे निधन

मुंबई: ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचे बुधवारी सायंकाळी हृदयविकाराच्या

मोठा प्रश्न? कावळेच नाहीत! पितृपक्षात वाडीला शिवणार कोण?

मुंबई : हिंदू धर्मातील पितृपक्ष काळात पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण करणे हा पवित्र संस्कार आहे. या काळात घराघरांत