राजापूर तालुका पुन्हा एकदा कोरोनामुक्त

  85

राजापूर :एकीकडे राज्यात ओमायक्रॉन रूग्णांची संख्या वाढत असल्याने चिंतेची परिस्थिती निर्माण झालेली असताना राजापूर तालुकावासीयांसाठी दिलासादायक वातावरण आहे. तालुक्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या पुन्हा एकदा शून्यावर आल्याने राजापूर तालुका आता पुन्हा एकदा कोरोनामुक्त झाला आहे. त्यामुळे आता राजापूर तालुकावासीयांना दिलासा मिळाला असून भविष्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळणार नाही वा ओमायक्रॉनचा फैलाव होणार नाही, याची खबरदारी घेण्याची जबाबदारीही वाढली आहे.

यापूर्वी पहिल्या लाटेत दोन वेळा आणि त्यानंतर दुसऱ्या लाटेतही एक वेळा राजापूर तालुक्यातील कोरोना बाधित रूग्णांचा आकडा शून्यावर येऊन तालुका कोरोनामुक्त झाला होता. मात्र पुन्हा रुग्ण संख्या वाढल्याने हा आकडा वाढला होता. मात्र दुसऱ्या लाटेत पूर्णपणे परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर तालुक्यातील ओणी, रायपाटण येथील कोविड रुग्णालये व धारतळे, हातिवले व रायपाटण येथील कोविड केअर सेंटरही बंद करण्यात आलेले आहेत.

गेल्या आठवडाभरात तालुक्यात एकही कोरोनाबाधित रूग्ण आढळून आलेला नाही. जो एक कोरोनाबाधित रूग्ण होता व ज्याच्यावर उपचार सुरू होते, तो शनिवारी पूर्णपणे बरा झाल्याने तालुक्यातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या आता शून्य झाली आहे. त्यामुळे आरोग्य विभाग आणि जनतेला देखील दिलासा मिळाला आहे.

तालुक्यात आजपर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत एकूण ५ हजार १८८ कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली आहे. यातील ४ हजार ९८४ रुग्ण उपचाराअंती पूर्णपणे बरे झाले आहेत. तर आजपर्यंत तालुक्यात २०४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सध्या एकही रूग्ण तालुक्यात अॅक्टीव्ह नाही. त्यामुळे कोरोनाबाधित रूग्णांची संख्या शून्य इतकी आहे.
Comments
Add Comment

महादेवी हत्तिणीला ‘वनतारा’मध्ये पाठवण्याबाबतचा अहवाल

पेटा संस्थेमार्फत सत्यपरिस्थिती नमूद कोल्हापूर : महादेवी या हत्तिणीला कोल्हापूर मधील एका मठातून वनतारा येथे

हुंड्याऐवजी मुलींसाठी फिक्स डिपॉझिट

मराठा समाजाची लग्न आचारसंहिता अहिल्यानगर : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणानंतर मराठा समाजातील

डॉक्टरांसाठी ‘क्यूआर कोड’ प्रणाली अनिवार्य

बोगस डॉक्टरांना बसणार आळा पुणे : राज्यातील बोगस डॉक्टरांच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी आता

भाऊरायांना राखी पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिस सज्ज, पावसाची चिंता मिटली; राखीसाठी वॉटरप्रूफ लिफाफा

पुणे (वार्ताहर) : दूरगावी असणाऱ्या भावाला आपली प्रेमाची राखी पाठविण्यासाठी सध्या बहिणींची लगबग सुरू आहे. तसेच

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बने उडवण्याची धमकी; आरोपी ताब्यात

नागपूर:  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील निर्मानाधीन निवासस्थान बॉम्बने उडवण्याची