राज्यात पुन्हा पाऊस पडणार!

  200

मुंबई : या वर्षभरात जवळपास दर महिन्याला हजेरी लावणारा पाऊस डिसेंबरच्या शेवटीही पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यात २८ डिसेंबरला औरंगाबाद, जालना आणि मराठवाड्याच्या काही भागात पाऊस बरसणार आहे. याशिवाय राज्यातील उत्तर भागातही पाऊस होणार आहे. जळगाव, धुळे या भागात काही ठिकाणी हवामान ढगाळ राहिल. तर गोंदिया, भंडारा, वर्धा, नागपूर, अमरावती, अकोला जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित आहे.


पश्चिम महाराष्ट्रत तुरळक पाऊस होईल, असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. वारा (३० ते ४० किमी ताशी) वेगाने पुढे सरकेल. तर २७ डिसेंबरला विर्दभात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


राज्यात यावर्षी पावसाळ्यासह उन्हाळा आणि हिवाळ्यातही पाऊस बरसला. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यासाठी भरपाई देण्याची मागणी विरोधीपक्षांनी केली आहे. सध्या काही ठिकाणी पंचनामे सुरू आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पैसे जमा होणार असल्याची माहिती सरकारच्या वतीने देण्यात आली.


डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाही राज्यात पावसाच्या सरी बरसल्या होत्या. नुकतीच थंडी सुरू झाल्याने सर्वत्र तापमान खालावले आहे. मात्र पावसामुळे काही काळासाठी थंडी कमी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या