एसएसपीएम हॉस्पिटलतर्फे १५० रूग्णांची मोफत तपासणी

राजापूर :सिंधुदुर्गातील एसएसपीएम हॉस्पिटलच्यावतीने तालुक्यातील कोंडसर, कशेळी व भालावली गावात मोफत आरोग्य चिकित्सा शिबिर घेण्यात आले. या शिबिरात सुमारे १०० ते १५० रूग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. तसेच शिबिरातील गरजू रूग्णांची एसएसपीएम हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली.



या शिबिरात रूग्णांची नेत्रतपासणी, रक्तदाब तपासणी, गुडघे, सांधेदुखी आदी विविध आजारांची मोफत तपासणी करण्यात आली. एसएसपीएम हॉस्पिटलचे समन्वयक हरिश्चंद्र परब यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर घेण्यात आले. यावेळी डॉ.भुषण पाताडे, डॉ.जोशी यांनी रूग्णांची तपासणी केली. यातील मोतीबिंदू रूग्णांची व गुडघ्याच्या आजाराने त्रस्त रूग्णांची एसएसपीएम हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. काही रूग्णांवर ही शस्त्रक्रिया पार पडली आहे.



कशेळी येथे झालेले हे शिबिर यशस्वीतेसाठी भाजपचे वसंत पाटील, दीपक हळदणकर, वृषाली पाटील, सीमा गोठणकर, पल्लवी सावरे, पद्माकर कशाळकर यांनी विशेष परिश्रम घेतले.भालावली येथे दिलीप मांजरेकर, ज्ञानदेव भोसले, अमोल नार्वेकर, प्रसाद भोसले यांनी या शिबिराचे नियोजन केले होते. या ठिकाणी भाजप जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर यांनी भेट दिली.

Comments
Add Comment

कोकणाच्या विकासासाठी भाजपचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; जयगड बंदर बनणार अर्थव्यवस्थेचं केंद्र

रत्नागिरी: मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते नितेश राणे

रत्नागिरी नाचणेत मुलाकडून आईचा खून, खून करून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

गणेशोत्सवाच्या उत्साहात रत्नागिरी जिल्हा हादरला आहे. शहरातील नाचणे येथे पोटच्या मुलाने आपल्या आईचा निर्घृण

खेडमधील खवटी गावाजवळ खासगी बस आणि कारचा भीषण अपघात, तिघेजण गंभीर जखमी

खेडमधील खवटी गावाजवळ मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास खासगी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या

वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी, वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर, मनसेतून 4 जणांची हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती, वैभव खेडेकर भाजपमध्ये जातील अशीही शक्यता

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत ‘आरटीओ’कडून दर सूची प्रसिद्ध

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दरतक्ता प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात