राणी बागेतील त्या फलकाबाबत पालिकेचे स्पष्टीकरण

मुंबई : मुंबईतील सगळ्यांचेच आकर्षण असलेल्या राणी बागेचे नाव हजरत हाजी पीर बाबा राणीबाग असे करण्यात आले असल्याच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अफवेबाबत पालिका प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.


राणीबागेत गेले कित्येक दशके असलेल्या दर्ग्याच्या नावाचा फलक नवा लावण्यात आला असून, त्यावरून राणीबागेचे नाव बदलल्याची सोशल मीडियावर अफवा पसरवली होती. यावरून राणीबागेचे नाव वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालय असेच आहे, असे प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी स्पष्ट केले आहे, तर इंग्लंडच्या राणीसाठी मुंबईच्या भायखळा येथे खास उद्यान बनवण्यात आले. त्यात प्राण, पक्षी आणि विविध प्रकारची झाडे आहेत.


सदर उद्यान १८६१ साली म्हणजे स्वातंत्र्यपूर्वकाळात तयार झाले. इंग्लंडच्या राणीसाठी हे उद्यान बनवले असल्याने या उद्यानाचे नाव ‘व्हिक्टोरिया गार्डन’ असे होते, त्याला मराठीमध्ये ‘राणीची बाग’ असे म्हणत. त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात या उद्यानाचे नामांतर ‘वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय’ असे करण्यात आले.


याच राणीबागेत गेले कित्येक दशके ‘हजरत हाजी पीर बाबा’ यांचा दर्गा आहे. ‘हजरत हाजी पीर बाबा’ राणी बागवाले म्हणून त्याची ओळख आहे. राणी बाग आंतरराष्ट्रीय पद्धतीची बनवली जात आहे. राणीबागेचे सुशोभीकरण केले जात असून याचाच एक भाग म्हणून दर्ग्याचा नामफलक नव्याने लावण्यात आला आहे.



उद्यानाचे नाव राणी बाग नाही - डॉ. संजय त्रिपाठी, संचालक प्राणिसंग्रहालय


उद्यानाचे नाव राणी बाग नसून वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय असे आहे. पूर्वीच्या काळापासून लोक उद्यानास राणीबाग म्हणून संबोधत आले आहेत. तसेच जिजामाता उद्यानातील जुन्या दर्ग्याचे नाव ‘हजरत हाजी पीर बाबा ’ असे आहे.
डॉ. संजय त्रिपाठी, संचालक प्राणिसंग्रहालय

Comments
Add Comment

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत