बुलढाणा ग्रामपंचायत पोटनिवडणुकीला हिंसाचाराचे गालबोट; दोन गटात हाणामारी

बुलढाणा : राज्यात आज नगरपंचायतीच्या निवडणुकांसोबतच ग्रामपंचायतीच्याही पोटनिवडणुका पार पडत आहे. राज्यात शांततेत मतदान सुरू असताना बुलढाण्यातील मतदानाला मात्र, हिंसाचाराचे गालबोट लागले आहे. जलंब ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत दोन गटात हाणामारी झाली. या हाणामारीत चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर शेगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


जलंब येथे आज सकाळपासून ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी मतदान सुरू होते. त्यानंतर दोन गटात सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर अचानक एका गटाने दुसऱ्या गटावर हल्ला केल्याने तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये चार जण जखमी झाले असून यात एका महिलेचा समावेश आहे.


या घटनेनंतर तणाव निर्माण झाला असून गावात पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून मतदान सुरळीत सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Comments
Add Comment

नागपूरला मिळणार आधुनिक मासळी बाजार- मुख्यमंत्र्यांनी मानले मंत्री नितेश राणेंचे आभार; नाथूबाबा यांचे नाव देण्याबाबत सकारात्मक विचार

नागपूर : "प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत नागपूर शहरात आधुनिक मासळी बाजार केंद्र उभारले जाणार आहे. आमचे

'फनेल झोन'सह मुंबईतील प्रतिबंधित क्षेत्रांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा - हाऊसिंग फॉर ऑल’ योजनेची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा; दहिसर आणि जुहूतील रडारचे स्थलांतर होणार

नागपूर : 'फनेल झोन'सह मुंबईतील प्रतिबंधित क्षेत्रांच्या पुनर्विकासाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. त्यासाठी राज्य

महाराष्ट्राची सागरी सुरक्षा बळकट होणार- मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे; १५ हाय स्पीड गस्ती नौका लवकरच दाखल होणार

नागपूर : परराज्यातून महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रात येणाऱ्या मच्छिमार नौकांमुळे राज्यातील मच्छिमारांचे

मत्स्यव्यवसाय संस्थांच्या नोंदणीला स्थगिती - मंत्री नितेश राणेंची नागपुरात मोठी घोषणा; मच्छीमार बांधवांच्या वतीने भव्य सत्कार

नागपूर : राज्यातील भूजलाशयीन मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांच्या नोंदणीसाठी दि. १२ मे २०२३ च्या शासन निर्णयाला

लाडक्या बहिणींना 'ई-केवायसी' दुरुस्तीसाठी मिळणार एकच संधी

मंत्री अदिती तटकरे; ३१ डिसेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक नागपूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण

बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिंदे सरकारचा 'मास्टरस्ट्रोक'; गृहनिर्माण क्षेत्रात ऐतिहासिक निर्णय, लाखो मुंबईकरांना मोठा दिलासा

नागपूर : "मुंबईबाहेर गेलेला चाकरमानी पुन्हा मुंबईत परतला पाहिजे, हीच स्व. बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती आणि ती