ओमायक्रॉन रुग्णांची संख्या २०० वर

नवी दिल्ली : कोरोनाचा नवीन वेरियंट ओमायक्रॉनने चिंता (omicron) वाढवली आहे. देशातील ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. आता देशातील एकूण रुग्णांची संख्या ही २०० वर पोहोचल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.


देशात ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्र आणि दिल्लीत आढळून आले आहेत. महाराष्ट्रातील ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या ही ५४ वर गेली आहे. यातील २८ रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर दिल्लीतही एकूण रुग्णांची संख्या ही ५४ पर्यंत पोहोचली आहे. यातील १२ रुग्ण बरे झाले आहेत. तेलंगणमध्ये २० रुग्ण आढळले आहेत. कर्नाटकात १९ रुग्ण आढळले. त्यापैकी १५ जण बरे झाले आहेत. राजस्थानमध्ये १८ रुग्ण आढळले आणि सर्वजण बरे झाले आहेत. केरळमध्ये १५, गुजरातमध्ये १४, उत्तर प्रदेशात २ रुग्ण आढळले आणि ते दोन्ही बरे झाले आहेत. आंध्र प्रदेश, छत्तीसगड, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.


दरम्यान, देशात ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत असताना एम्सचे संचाल डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. देशाने कुठल्याही स्थितीचा सामना करण्यासाठी तयार राहिले पाहिजे, असे डॉ. गुलेरिया म्हणाले.


ब्रिटनमध्ये रविवारी एकाच दिवशी ओमायक्रॉनचे १० हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले. याचे उदाहरण देत डॉ. गुलेरिया यांनी इशारा दिला आहे. भारताने कुठल्याही स्थितीचा सामना करण्यासाठी तयार असले पाहिजे. ओमायक्रॉन वेरियंटसंदर्भात आपल्याला अधिक माहितीची गरज आहे, असे ते म्हणाले.


अमेरिका, ब्रिटनमध्ये कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता आपणही सतर्क राहणे गरजेचे आहे. आपण आधीपासूनच तयारी केल्यास हे समजदारीचे पाऊल असेल. आपण स्वतःला कोणत्याही स्थितीचा सामना करण्यासाठी तयार ठेवले पाहिजे, असे डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले.

Comments
Add Comment

वेस्ट इंडिज-भारताच्या सामन्याचा पावसावर ठरणार निकाल

रन रेटवर ठरणार उपांत्य फेरीचा दावेदार नवी दिल्ली : टी-२० वर्ल्ड कपमधील सुपर ८ फेरीचे सामने अंतिम टप्प्यात असून

प्रदूषणाच्या विळख्यात जीवनवाहिन्या?

४६ % नद्यांसोबतच गंगा-यमुनाही दूषित नवी दिल्ली : कोट्यवधी भारतीयांची जीवनवाहिनी आणि श्रद्धेचे प्रतीक असलेल्या

भारत-पाक सीमेवर 'प्रचंड' हेलिकॉप्टरमध्ये सह-वैमानिक म्हणून राष्ट्रपती मुर्मू यांनी रचला इतिहास

जयपूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी राजस्थान मधील जैसलमेर येथे स्वदेशी हलक्या लढाऊ हेलिकॉप्टर

RTO Rules Upadate : चालकांसाठी आरटीओचे 'हे' नवीन नियम; नितीन गडकरी यांची घोषणा

नवी दिल्ली : देशात रस्ते अपघातांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे. गाड्यांच्या धडकेत निष्पाप नागरिक प्राण गमावत

Amit Shah : सीमांचलमधून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी लवकरच विशेष मोहिम - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

सीमांचल भागातून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी लवकरच विशेष मोहिम सुरू केली जाईल, असे विधान करत केंद्रीय

शनिवारपासून सलग पाच दिवस बँका राहणार बंद

मुंबई: तुम्ही जर बँकेत जाऊन काही काम करायचा विचार करत असाल किंवा लोन किंवा इतर काही कामं तुमची राहिली असतील तर