ओमायक्रॉन रुग्णांची संख्या २०० वर

  162

नवी दिल्ली : कोरोनाचा नवीन वेरियंट ओमायक्रॉनने चिंता (omicron) वाढवली आहे. देशातील ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. आता देशातील एकूण रुग्णांची संख्या ही २०० वर पोहोचल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.


देशात ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्र आणि दिल्लीत आढळून आले आहेत. महाराष्ट्रातील ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या ही ५४ वर गेली आहे. यातील २८ रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर दिल्लीतही एकूण रुग्णांची संख्या ही ५४ पर्यंत पोहोचली आहे. यातील १२ रुग्ण बरे झाले आहेत. तेलंगणमध्ये २० रुग्ण आढळले आहेत. कर्नाटकात १९ रुग्ण आढळले. त्यापैकी १५ जण बरे झाले आहेत. राजस्थानमध्ये १८ रुग्ण आढळले आणि सर्वजण बरे झाले आहेत. केरळमध्ये १५, गुजरातमध्ये १४, उत्तर प्रदेशात २ रुग्ण आढळले आणि ते दोन्ही बरे झाले आहेत. आंध्र प्रदेश, छत्तीसगड, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.


दरम्यान, देशात ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत असताना एम्सचे संचाल डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. देशाने कुठल्याही स्थितीचा सामना करण्यासाठी तयार राहिले पाहिजे, असे डॉ. गुलेरिया म्हणाले.


ब्रिटनमध्ये रविवारी एकाच दिवशी ओमायक्रॉनचे १० हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले. याचे उदाहरण देत डॉ. गुलेरिया यांनी इशारा दिला आहे. भारताने कुठल्याही स्थितीचा सामना करण्यासाठी तयार असले पाहिजे. ओमायक्रॉन वेरियंटसंदर्भात आपल्याला अधिक माहितीची गरज आहे, असे ते म्हणाले.


अमेरिका, ब्रिटनमध्ये कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता आपणही सतर्क राहणे गरजेचे आहे. आपण आधीपासूनच तयारी केल्यास हे समजदारीचे पाऊल असेल. आपण स्वतःला कोणत्याही स्थितीचा सामना करण्यासाठी तयार ठेवले पाहिजे, असे डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले.

Comments
Add Comment

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके