थंडीची तीव्रता कायम

नाशिक (प्रतिनिधी) : जिल्ह्यामध्ये दुसऱ्या दिवशीही थंडीची तीव्रता कायम आहे.मंगळवारी सकाळी जिल्ह्याचे तापमान १०.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. थंडीमुळे नाशिककर गारठून गेले आहेत. जिल्ह्यामध्ये सर्वात कमी तापमान निफाडमध्ये नोंदविण्यात आले आहे.



उत्तर भारतामध्ये थंडीची लाट निर्माण झाल्याने त्याचा परिणाम हा उत्तर महाराष्ट्रावरही होत असून थंडीची तीव्रता वाढत आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये थंडीची तीव्रता मोठ्या प्रमाणावर ती वाढली असून दोन दिवसांमध्ये तापमान पाच अंश सेल्सिअसने कमी होऊन सोमवारी सकाळी १०.४ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले.


थंडीची तीव्रता वाढल्यामुळे शहरातील नागरिकांनी वेगवेगळ्या मैदानांवर व्यायाम करण्यासाठी तसेच जॉगिंगसाठी गर्दी केली. तर जागोजागी शेकोट्या देखील पेटविण्यात आल्याचे दिसून येत होते. जिल्ह्यामध्ये सर्वात कमी तापमान निफाडमध्ये नोंदविण्यात आले असून निफाडमध्ये सोमवारी सकाळी ७.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी द्राक्ष वाचविण्यासाठी आता शेकोटी चा सहारा घेतला आहे.

Comments
Add Comment

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी

केंद्राकडून महाराष्ट्राला ६,४१८ कोटी रुपयांचा आगाऊ हप्ता, उपमुख्यमंत्री पवारांकडून आभार

मुंबई : केंद्र सरकारने राज्य सरकारांना कराचे अग्रीम हस्तांतरण केले असून त्यापैकी महाराष्ट्राला ६ हजार ४१८ कोटी