दहावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

  115

मुंबई : दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक बोर्डाने आज जाहीर केले. उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र आणि माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या होत्या. त्यानंतर आता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून याची माहिती दिली आहे.


चार मार्च ते सात एप्रिल २०२२ या कालावधीत बारावीची तर १५ मार्च ते १८ एप्रिल २०२२ या कालावधीत दहावीची लेखी परीक्षा होणार असल्याचे त्यांनी याआधी सांगितले होते. दोन्ही परीक्षा प्रत्यक्ष केंद्रावर होणार आहेत. कोरोनामुळे अभ्यासक्रमात कपात करण्यात आली आहे.


कोरोनाच्या निर्बंधांचे आणि प्रोटोकॉलचे पालन करूनच सर्व परीक्षा घेण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य राहणार असून आवश्यक त्या सूचना शाळा आणि मुख्याध्यापक, शिक्षक यांना देण्यात आल्या असल्याचेही वर्षा गायकवाड यांनी म्हटले.


तसेच निकालाबाबतही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे. बारावीचा निकाल हा जुनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत तर दहावीचा निकाल हा जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जाहीर करण्याचा प्रयत्न असेल, असे त्या म्हणाल्या.

दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक


15 मार्च : प्रथम भाषा (मराठी, हिंदी उर्दू, गुजराती आणि इतर प्रथम भाषा)


16 मार्च : द्वितीय वा तृतीय भाषा


19 मार्च : इंग्रजी


21 मार्च : हिंदी ( द्वितीय किंवा तृतीय भाषा)


22 मार्च : संस्कृत, उर्दू ,गुजराती व इतर द्वितीय वा तृतीय विषय (द्वितीय किंवा तृतीय भाषा)


24 मार्च : गणित भाग - 1


26 मार्च : गणित भाग 2


28 मार्च : विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1


30 मार्च : विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2


1 एप्रिल : सामाजिक शास्त्र पेपर 1


4 एप्रिल : सामाजिक शास्त्र पेपर 2

Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक