दहावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

मुंबई : दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक बोर्डाने आज जाहीर केले. उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र आणि माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या होत्या. त्यानंतर आता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून याची माहिती दिली आहे.


चार मार्च ते सात एप्रिल २०२२ या कालावधीत बारावीची तर १५ मार्च ते १८ एप्रिल २०२२ या कालावधीत दहावीची लेखी परीक्षा होणार असल्याचे त्यांनी याआधी सांगितले होते. दोन्ही परीक्षा प्रत्यक्ष केंद्रावर होणार आहेत. कोरोनामुळे अभ्यासक्रमात कपात करण्यात आली आहे.


कोरोनाच्या निर्बंधांचे आणि प्रोटोकॉलचे पालन करूनच सर्व परीक्षा घेण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य राहणार असून आवश्यक त्या सूचना शाळा आणि मुख्याध्यापक, शिक्षक यांना देण्यात आल्या असल्याचेही वर्षा गायकवाड यांनी म्हटले.


तसेच निकालाबाबतही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे. बारावीचा निकाल हा जुनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत तर दहावीचा निकाल हा जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जाहीर करण्याचा प्रयत्न असेल, असे त्या म्हणाल्या.

दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक


15 मार्च : प्रथम भाषा (मराठी, हिंदी उर्दू, गुजराती आणि इतर प्रथम भाषा)


16 मार्च : द्वितीय वा तृतीय भाषा


19 मार्च : इंग्रजी


21 मार्च : हिंदी ( द्वितीय किंवा तृतीय भाषा)


22 मार्च : संस्कृत, उर्दू ,गुजराती व इतर द्वितीय वा तृतीय विषय (द्वितीय किंवा तृतीय भाषा)


24 मार्च : गणित भाग - 1


26 मार्च : गणित भाग 2


28 मार्च : विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1


30 मार्च : विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2


1 एप्रिल : सामाजिक शास्त्र पेपर 1


4 एप्रिल : सामाजिक शास्त्र पेपर 2

Comments
Add Comment

Nanded Mumbai Flight : प्रतीक्षा संपली! नांदेड-मुंबई, गोवा विमानसेवेचा 'मुहूर्त' ठरला, मुंबई, गोव्याचा प्रवास तासाभरात; पहिलं उड्डाण कधी?

नांदेड : नांदेडमधील प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. बहुप्रतीक्षित नांदेड-मुंबई (Nanded-Mumbai) आणि नांदेड-गोवा

राज्यातील 'या' पाच समुद्रकिनाऱ्यांना मिळणार 'ब्लू फ्लॅग'? नामांकनासाठी किनाऱ्यांचे सुरक्षा ऑडीट होणार लवकरच पूर्ण

महाराष्ट्र: राज्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'ब्ल्यू फ्लॅग'साठी प्रायोगिक तत्त्वावर

कल्याण-डोंबिवलीला फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषणाचा विळखा

केडीएमसीतील नागरिक श्वसनाच्या आजाराने त्रस्त कल्याण (प्रतिनिधी) : नुकताच दिवाळी सण सर्वत्र मोठ्या उत्साहात

परतीच्या पावसाने भातपिके उद्ध्वस्त, बळीराजा आर्थिक अडचणीत

रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले

मुदखेडमध्ये संतप्त शेतकऱ्याचा तहसीलदारांच्या गाडीवर हल्ला: पोलिसांनी घेतले ताब्यात

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे एका संतप्त शेतकऱ्याने तहसीलदारांच्या वाहनाची काच फोडल्याची घटना घडली,

नेरळ–माथेरान मिनी ट्रेन’ पुन्हा रुळावर!

पर्यटकांसाठी ऐतिहासिक रेल्वे सेवा १ नोव्हेंबरपासून रायगड : महाराष्ट्रातील प्रसिद्ध