दहावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

  101

मुंबई : दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक बोर्डाने आज जाहीर केले. उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र आणि माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या होत्या. त्यानंतर आता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून याची माहिती दिली आहे.


चार मार्च ते सात एप्रिल २०२२ या कालावधीत बारावीची तर १५ मार्च ते १८ एप्रिल २०२२ या कालावधीत दहावीची लेखी परीक्षा होणार असल्याचे त्यांनी याआधी सांगितले होते. दोन्ही परीक्षा प्रत्यक्ष केंद्रावर होणार आहेत. कोरोनामुळे अभ्यासक्रमात कपात करण्यात आली आहे.


कोरोनाच्या निर्बंधांचे आणि प्रोटोकॉलचे पालन करूनच सर्व परीक्षा घेण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य राहणार असून आवश्यक त्या सूचना शाळा आणि मुख्याध्यापक, शिक्षक यांना देण्यात आल्या असल्याचेही वर्षा गायकवाड यांनी म्हटले.


तसेच निकालाबाबतही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे. बारावीचा निकाल हा जुनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत तर दहावीचा निकाल हा जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जाहीर करण्याचा प्रयत्न असेल, असे त्या म्हणाल्या.

दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक


15 मार्च : प्रथम भाषा (मराठी, हिंदी उर्दू, गुजराती आणि इतर प्रथम भाषा)


16 मार्च : द्वितीय वा तृतीय भाषा


19 मार्च : इंग्रजी


21 मार्च : हिंदी ( द्वितीय किंवा तृतीय भाषा)


22 मार्च : संस्कृत, उर्दू ,गुजराती व इतर द्वितीय वा तृतीय विषय (द्वितीय किंवा तृतीय भाषा)


24 मार्च : गणित भाग - 1


26 मार्च : गणित भाग 2


28 मार्च : विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1


30 मार्च : विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2


1 एप्रिल : सामाजिक शास्त्र पेपर 1


4 एप्रिल : सामाजिक शास्त्र पेपर 2

Comments
Add Comment

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती